शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

शिंदी परिसरात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST

पीकस्थिती चांगली असली तरी वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना रात्रीसुद्धा शेतात मुक्काम करावा लागत असल्याचे ...

पीकस्थिती चांगली असली तरी वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना रात्रीसुद्धा शेतात मुक्काम करावा लागत असल्याचे दिसून येते. नीलगाय, हरीण, रानडुकरे यांचा शेतीशिवारात मोठ्या प्रमाणावर त्रास असून वनविभागाने यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांचा त्रास काहीअंशी नक्कीच कमी होईल, असे शेतकरीवर्गातून सांगण्यात आले.

सध्या परिसरात कपाशी हे महत्त्वाचे नगदी पीक असून त्यासोबत ज्वारी, सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग ही पिकेसुद्धा शेतीशिवारात चांगल्या प्रकारे दिसून येत आहेत. मात्र, जोरदार पाऊस होत नसल्याने नदी, नाले आजही वाहून निघालेले नाहीत. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही.

जंगलशिवारातील, शेतीशिवारातील तलाव पूर्ण क्षमतेने अजूनही भरलेले नाहीत. त्यामुळे भविष्यातील रब्बी हंगामासाठी विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणे गरजेचे आहे.

गुराढोरांना शेती व जंगलशिवारात हिरवा चारा उपलब्ध झाल्याने चाऱ्याची टंचाई मिटली आहे. शेतीशिवारात मजुरांना कामे उपलब्ध असून कोळपणी, निंदणी, रासायनिक खते देणे, इत्यादी कामे सुरू आहेत. महिलांना दीडशे ते दोनशे रुपये मजुरी मिळत असून पुरुषांना अडीचशे रुपयांपर्यंत दररोज सरासरी मजुरी मिळत असल्याचे सांगण्यात आले.

रासायनिक खते, बी-बियाणे, फवारणी यासाठी लागणारी औषधे यांच्या किमती काही प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे हंगामाचे काहीसे बजेट कोलमडले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. साधारणपणे दरवर्षी शेतीहंगामासाठी विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जाची उचल करीत असतो आणि हंगाम झाल्यानंतर कर्ज फेडत असतो. मात्र, मागील अनेक वर्षांतील अनुभव पाहता शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी न होता वाढतच असल्याने शेतकरी शेतीपासून काहीसा दुरावत असून अनेक शेतकऱ्यांनी बटाईने जमीन देणे, इतर भागांतून आलेले गोरगरीब कुटुंब यांना जमीन कसायला देणे, अशा पद्धतीने काही शेतकरी शेती करीत असतात. वेळोवेळी गरजेनुसार मजूर उपलब्ध न होणे, मजुरांची टंचाई जाणवणे, परिसरातून नियमित रोजगारासाठी शहरांकडे जाणे, हेसुद्धा त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. कोरडवाहू परिसर असल्याने पाण्याची सातत्याने टंचाई या भागात असते.