शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

राज्याची तांत्रिक समिती घेणार अमृतच्या कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी मुंबईत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी मुंबईत राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत जळगाव शहरातील अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. याच बैठकीत मनपाकडून शहरातील वाढीव भागातील कामांचा प्रस्ताव देखील सादर केला जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेची कामे राज्यातील काही महानगरपालिका व नगरपालिकांच्या हद्दीत सुरू आहेत. त्यापैकी ज्या महानगरपालिकांमधील पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनांची कामे संपण्यात आली आहेत किंवा संपली आहेत. अशा महानगरपालिका व नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक राज्यस्तरीय तांत्रिक समितीचे अधिकारी घेणार आहेत. या दोन्ही योजनांमधील बचतीमधून अतिरिक्त कामे करण्यात येणार असून, या अतिरिक्त कामांच्या प्रस्तावांच्या अनुषंगाने ही बैठक घेतली जात आहे. ही बैठक मंगळवारी होणार होती; मात्र काही अडचणी निर्माण झाल्याने ही बैठक आता बुधवारी होणार आहे. या बैठकीत मनपाचे प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

‘त्या’ १६५ कॉलन्यांमधील रखडलेल्या कामाला मिळू शकते मंजुरी

शहरात अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत या योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, मनपाने शहरातील वाढीव भागांचा समावेश आधीच्या प्रस्तावात न केल्यामुळे शहरातील तब्बल १६५ कॉलन्यांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले नव्हते. मनपाने नवीन प्रस्ताव तयार करून, अमृत योजनेतील बचत झालेल्या रकमेतून आता १६५ कॉलन्यांमधील १८५ किमीचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानुसार मनपाने ३० कोटींचे अंदाजपत्रक देखील तयार केले होते. मजीप्राच्या तांत्रिक समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, आता राज्याचा तांत्रिक समितीच्या मंजुरीची प्रतीक्षा असून, या बैठकीत काही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.