शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती : सत्तांतरानंतर जामनेरचे टेक्सटाईल पार्कचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 23:37 IST

सत्ता बदलाचा मोठा फटका टेक्सटाईल पार्कच्या उभारणीस बसला असून, काम थंडावले आहे.

ठळक मुद्देनगरपालिकेच्या कामांनाही निधीचा ब्रेकवाघूर उपसा योजनेला निधी नाही

मोहन सारस्वत/सैयद लियाकतजामनेर : राज्यात सत्ताबदल होऊन एक वर्ष झाल्यानंतर राज्य शासनाकडून नवीन कामांना मंजुरी मिळाली नाही व सुरु असलेल्या कामांसाठी मंजूर झालेल्या निधीतील राहिलेली रक्कम मिळत नसल्याने विकास कामे ठप्प पडली आहे. सत्ता बदलाचा मोठा फटका टेक्सटाईल पार्कच्या उभारणीस बसला असून, काम थंडावले आहे.तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पहिले टेक्सटाईल पार्क जामनेरला होईल, अशी घोषणा केली होती. घोषणेनंतर पार्क उभारणीच्या कामाला गती मिळाली होती. असली  महाजन यांनी केलेल्या औद्योगिक वसाहतीच्या जागेच्या भूमिपूजनानंतर जमीन सपाटीकरणास इतर कामे वेगात झाली.टेक्सटाईल पार्कसाठी अंबिलहोळ, गारखेडे व होळहवेली परिसरातील खासगी व शासकीय वनजमीन अधिग्रहणाची प्रक्रीया झाली. खाजगी जमीनधारकांकडून करारपत्र करण्यात आले असूून अद्याप मोबदला वाटप झालेला नाही. मोबदला देण्यासाठी एमआयडीसीकडे रकमेची मागणी केली असुन यानंतरच पुढील कामे सुरू होऊ शकतात. वाघूर उपसा सिंचन योजनेला निधी नाही वाघूर धरणातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरविणाऱ्या उपसा सिंचन योजनेचे काम माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पूर्णत्वाकडे नेले. अंतिम टप्प्यातील कामासाठी लागणारा निधी मिळत नसल्याने योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. नगरपालिकेच्या कामांनाही ब्रेक जामनेर नगरपालिकेसाठी महाजन यांनी युती शासन काळात विकास कामांसाठी निधीची तरतूद केल्याने पाण पुरवठा, भूमिगत गटार व सोनबरडी टेकडी विकास योजनेच्या कामांना सुरुवात झाली.  मंजूर झालेल्या ३५ कोटी निधीपैकी साडेनऊ कोटीचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर कामांना सुरुवात झाली. दुसऱ्या टप्यातील निधीची मागणी केली आहे.  निधीअभावी रस्ता दुरुस्तीचे  काम रखडल्याचे पालिका पपदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सोनबरडी विकासासाठी मंजूर १४.५ कोटीपैकी फक्त दीड कोटीचा निधी मिळाला आहे. निधीअभावी कामे ठप्प पडली आहे.

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने टेक्सटाईल पार्क होणे गरजेचे आहे. शासनाच्या आडमुठे धोरणामुळे निधी मिळत नाही. ५० टक्के तरी निधी द्यावा जेणेकरुन काम सुरू होऊ शकेल. जळगांव येथील मेडिकल कॉलेजच्या उर्वरीत कामासाठी ७५० कोटीचा निधी आमच्या शासन काळात मंजूर करुन या कामांचे टेंडरदेखील निघाले, मात्र सध्याच्या शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे काम रखडले आहे. महाविकास आघाडी शासनाच्या एक वर्षाच्या काळात कोणतेही नवीन काम सुरू झाले नाही व सुरू असलेल्या कामांना निधी न देता ती रोखून धरली गेली.      - गिरीश महाजन, माजीमंत्री, आमदार

टॅग्स :cottonकापूसJamnerजामनेर