शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विमानसेवेचा १७ सप्टेंबरला प्रारंभ

By admin | Updated: May 25, 2017 00:48 IST

१८ सिटर डेक्कन चार्टर्डद्वारे सेवा : विमानतळावर विविध सुविधांबाबत प्राधिकरणाच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : नव्याने जाहीर करण्यात आलेल्या विमान मार्गात जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आला असल्याने तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरवासीयांना २५०० रुपयात विमान प्रवास करता येणार आहे. या सेवेचा येत्या १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून त्या संदर्भातील पत्र येथील विमानतळ प्रशासनास प्राप्त झाले आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या उड्डाण योजनेत नवे ४५ विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून जळगाव येथेही विमानसेवा प्रस्तावित करण्यात आली आहे. जळगाव ते मुंबईचे अंतर या सेवेमुळे आणखी कमी होणार असून उद्योजक, व्यापारी, अधिकारी तसेच नागरिकांसाठी ही सेवा मोठी उपलब्धी ठरणार आहे. सात वर्षांपासून प्रतीक्षा२०१० मध्ये जळगाव विमानतळ पूर्ण होऊन तत्कालीन राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून विमानसेवेबाबत प्रतीक्षा होती. यासाठी विविध विमान कंपन्यांशी स्थानिक उद्योजकांनी संपर्क साधून सेवा मिळावी असे प्रयत्न केले होते मात्र त्यात यश येऊ शकले नव्हते. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील १० विमानतळांचा विस्तार व तेथून विमान सेवा सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यात जळगाव विमानतळाचाही समावेश होता. कंपन्यांची नकार घंटा पुरेसे प्रवासी मिळणे शक्य होणार नाही या शक्यतेने विविध विमानसेवा देणाºया कंपन्यांकडून विमानतळ विकास प्राधिकरणास नकारच मिळत होता. स्थानिक उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेऊन जेट, किंगफिशर सारख्या कंपन्यांशी तीन वर्षांपूर्वी  संपर्क साधला. जेटतर्फे यासाठी सर्वेक्षणही झाले होते. मात्र नंतर या कंपनीनेही नकार घंटा वाजविली होती. सुसज्ज विमानतळजळगावपासून पाच कि.मी. अंतरावरील कुसुंबा गावाजवळ ३०३ हेक्टर जमिनीवर विमानतळाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम २०१० मध्ये पूर्ण झाले आहे. विमानतळासाठी प्राप्त ६१ कोटींच्या निधीतून विविध कामे झाली आहेत. यात  प्रवासी टर्मिनल पूर्ण झाले आहे. या टर्मिनलची विद्युत उपकरणे ही सौर ऊर्जेवर चालणार आहेत. प्रवासी टर्मिनलमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी दोन कक्ष, प्रवाशांसाठी                 मोठे प्रतीक्षालय, सुरक्षा तपासणी केंद्र आहे. विमानतळासाठी स्वतंत्र वीज फिडर बसविण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली आहे. अहवाल दिल्लीला दिलासंयुक्त समितीने जळगाव विमानतळावर पाहणी केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल स्थानीय संपर्क अभियान समिती, नवी दिल्ली येथे पाठविला होता. त्यावरून जळगावला विमान सेवा देण्याचा निर्णय झाला आहे. विमातळ प्रशासनास सूचनाविमानतळ विकास प्राधिकरणाकडून स्थानिक अधिकाºयांना नुकतेच एक पत्र प्राप्त झाले असून १७ सप्टेंबरपासून विमान सेवा सुरू करण्याबाबत कळविण्यात आले आहे. जळगाव येथून पहिल्या टप्प्यात मुंबई येथे ही सेवा देण्यात येणार आहे. दिवसाला एक विमानपहिल्या टप्प्यात जळगाव येथे सकाळी एक  १८ सिटर डेक्कन चार्टर्ड विमान रोज येणार आहे.  दुपारी ३ वाजेच्या दरम्यान हे             विमान मुंबईकडे रवाना होईल. या सेवेसाठी योग्य ती सुरक्षा व्यवस्था व अन्य            अनुषंगिक बाबींची पूर्तता केली जावी असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार स्थानिक अधिकाºयांकडून विविध कामांना गती देण्यात आली आहे. १७०० मीटर लांब धावपट्टीसध्या असलेली १७०० मीटर लांब व ४५ मीटर रुंदीची धावपट्टी येथे तयार असून सेवा सुरू  होऊन प्रतिसाद मिळू लागल्यावर  भविष्यात धावपट्टी  विस्तारित करण्याचाही प्रस्ताव होता. हे काम झाल्यावर जळगावला बोर्इंग विमानदेखील उतरू शकेल असे नियोजन होते. विमान उतरल्यानंतर ते अ‍ॅप्रनवर येईल. तिथून प्रवाशांना टर्मिनलपर्यंत आणण्यासाठी चारचाकी वाहने ठेवण्यात येतील त्या दृष्टीनेही कामे झालेली आहे.