शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वसुंधरा महोत्सवाला थाटात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 12:43 IST

निसर्ग भ्रमण, पोस्टर व फेस पेंटिंग स्पर्धा आणि लघुपट शुक्रवारी होणार सादरीकरण

ठळक मुद्देवडाच्या रोपट्याला पाणी देऊन महोत्सवाचे उद्घाटनटेंपल आॅफ टायगर्स हा लघुपटही दाखविलाबिबट्याबाबत शासनास संहिता देणार

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ८ : समर्पण संस्था संचलित पर्यावरण शाळेतर्फे कांताई सभागृहात आयोजित तीन दिवसीय वसुंधरा महोत्सवाला गुरुवारी सायंकाळी थाटात प्रारंभ झाला़ या वेळी पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºयांना वसुंधरा पुरस्काराने गौरविण्यात आले़महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन हे होते़ व्यासपीठावर महापौर ललित कोल्हे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, रोटरी क्लब ईस्टचे अध्यक्ष डॉ. गोविंद मंत्री, वन्यजीव अभ्यासक अभय उजागरे, समर्पण संस्थेचे सचिव संजय भावसार यांची उपस्थिती होती. या वेळी उपस्थितांचे रोप देऊन स्वागत करण्यात आली. व्यासपीठार वडाच्या रोपट्याला पाणी देऊन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.महापौर ललित कोल्हे, पुरस्कारार्थी डॉ़ राधेश्याम चौधरी, डॉ़ गोविंद मंत्री यांनीही मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन अर्चना उजागरे व मेघना भंडारी यांनी केले. उद्घाटनानंतर टेंपल आॅफ टायगर्स हा लघुपटही दाखविला. जुन्या परंपरा, संस्कृती नष्ट होताना या आधुनिक काळात वाघांची एक नवीन पिढी या मध्य भारतातील बांधवगढ या परिसरात राज्य करत असून यावर चित्रपटाची अंत्यत चित्तथरारक कहाणीने उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.सामान्यांच्या क र्तृत्वाला पुरस्कारआपण जन्म घेऊन पृथ्वीवर आल्यावर या विश्वासाठी काही करून जावे या विचारानेच जैन उद्योग समूहाचे संस्थापक स्व.भवरलाल जैन हे जगले. त्यानुसारच आमची पुढची वाटचाल सुरू असल्याचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यावेळी म्हणाले. लिमजीवाला हे निसर्गप्रेमी होते़ त्यामुळे त्यांच्या नावाने वसुंधरा महोत्सवात पुरस्कार देण्याची कल्पना सुचली़ ही त्यांना खरी श्रद्धांजली असून महोत्सवात दरवर्षी व्यक्ती, संस्थांना पुरस्कार दिले जाणार असल्याचे ते म्हणाले़ सामान्य माणसांच्या कर्तृत्वाला हा पुरस्कार असल्याचेही अशोक जैन यांनी या वेळी सांगितले़पर्यावरणाबद्दल जनजागृती करून जीवन समृध्द करू याया वेळी भरत अमळकर म्हणाले की वसुंधरा महोत्सव ही एक चळवळ असून इथे एकत्र येऊन पर्यावरणाच्या विविध विषयांवर चर्चा होते़ ही चळवळ म्हणजे विश्वाची काळजी घेणारी रचना उत्पन्न करण्याची प्रक्रिया आहे. आजच्या काळात वन्यजीवांना मारू नका व मारा असे दोन गट म्हणणारे समोर आहे़ वाघ, बिबटे, वृक्ष हे संकट होता कामा नये, यासाठी जनजागृती करू या आणि जीवन समृद्ध करूया, पर्यावरण प्रेम हे मानवतेच्या मुळावर आणि मानवता ही पर्यावरणाच्या मुळावर उठायला नको, अशी अपेक्षाही अमळकर यांनी व्यक्त केली.बिबट्याबाबत शासनास संहिता देणारवसुंधरा महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सातवा बळी बिबट्याने घेतला आहे. बिबट्यांवर कोणतेही शासनाचे धोरण नाही यावर सविस्तर चर्चा करणार असून त्याबाबत कागदोपत्री संहिता शासनाला देणार आहोत़ या महोत्सवाने सर्व पर्यावरणवादी एकत्र आले. हा फक्त इव्हेंट नाही तर चळवळ झाली असल्याचेही सांगितले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव