शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

जळगावात वसुंधरा महोत्सवाला थाटात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 12:43 IST

निसर्ग भ्रमण, पोस्टर व फेस पेंटिंग स्पर्धा आणि लघुपट शुक्रवारी होणार सादरीकरण

ठळक मुद्देवडाच्या रोपट्याला पाणी देऊन महोत्सवाचे उद्घाटनटेंपल आॅफ टायगर्स हा लघुपटही दाखविलाबिबट्याबाबत शासनास संहिता देणार

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ८ : समर्पण संस्था संचलित पर्यावरण शाळेतर्फे कांताई सभागृहात आयोजित तीन दिवसीय वसुंधरा महोत्सवाला गुरुवारी सायंकाळी थाटात प्रारंभ झाला़ या वेळी पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºयांना वसुंधरा पुरस्काराने गौरविण्यात आले़महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन हे होते़ व्यासपीठावर महापौर ललित कोल्हे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, रोटरी क्लब ईस्टचे अध्यक्ष डॉ. गोविंद मंत्री, वन्यजीव अभ्यासक अभय उजागरे, समर्पण संस्थेचे सचिव संजय भावसार यांची उपस्थिती होती. या वेळी उपस्थितांचे रोप देऊन स्वागत करण्यात आली. व्यासपीठार वडाच्या रोपट्याला पाणी देऊन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.महापौर ललित कोल्हे, पुरस्कारार्थी डॉ़ राधेश्याम चौधरी, डॉ़ गोविंद मंत्री यांनीही मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन अर्चना उजागरे व मेघना भंडारी यांनी केले. उद्घाटनानंतर टेंपल आॅफ टायगर्स हा लघुपटही दाखविला. जुन्या परंपरा, संस्कृती नष्ट होताना या आधुनिक काळात वाघांची एक नवीन पिढी या मध्य भारतातील बांधवगढ या परिसरात राज्य करत असून यावर चित्रपटाची अंत्यत चित्तथरारक कहाणीने उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.सामान्यांच्या क र्तृत्वाला पुरस्कारआपण जन्म घेऊन पृथ्वीवर आल्यावर या विश्वासाठी काही करून जावे या विचारानेच जैन उद्योग समूहाचे संस्थापक स्व.भवरलाल जैन हे जगले. त्यानुसारच आमची पुढची वाटचाल सुरू असल्याचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यावेळी म्हणाले. लिमजीवाला हे निसर्गप्रेमी होते़ त्यामुळे त्यांच्या नावाने वसुंधरा महोत्सवात पुरस्कार देण्याची कल्पना सुचली़ ही त्यांना खरी श्रद्धांजली असून महोत्सवात दरवर्षी व्यक्ती, संस्थांना पुरस्कार दिले जाणार असल्याचे ते म्हणाले़ सामान्य माणसांच्या कर्तृत्वाला हा पुरस्कार असल्याचेही अशोक जैन यांनी या वेळी सांगितले़पर्यावरणाबद्दल जनजागृती करून जीवन समृध्द करू याया वेळी भरत अमळकर म्हणाले की वसुंधरा महोत्सव ही एक चळवळ असून इथे एकत्र येऊन पर्यावरणाच्या विविध विषयांवर चर्चा होते़ ही चळवळ म्हणजे विश्वाची काळजी घेणारी रचना उत्पन्न करण्याची प्रक्रिया आहे. आजच्या काळात वन्यजीवांना मारू नका व मारा असे दोन गट म्हणणारे समोर आहे़ वाघ, बिबटे, वृक्ष हे संकट होता कामा नये, यासाठी जनजागृती करू या आणि जीवन समृद्ध करूया, पर्यावरण प्रेम हे मानवतेच्या मुळावर आणि मानवता ही पर्यावरणाच्या मुळावर उठायला नको, अशी अपेक्षाही अमळकर यांनी व्यक्त केली.बिबट्याबाबत शासनास संहिता देणारवसुंधरा महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सातवा बळी बिबट्याने घेतला आहे. बिबट्यांवर कोणतेही शासनाचे धोरण नाही यावर सविस्तर चर्चा करणार असून त्याबाबत कागदोपत्री संहिता शासनाला देणार आहोत़ या महोत्सवाने सर्व पर्यावरणवादी एकत्र आले. हा फक्त इव्हेंट नाही तर चळवळ झाली असल्याचेही सांगितले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव