शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

एस.टी. कर्मचाऱ्यांनी अंत पाहु नये - अजित पवार यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 13:58 IST

जळगाव : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यांना शेजारच्या राज्यांप्रमाणेच मानधन मिळते. एस.टी.चे शासनात विलनीकरण करण्यासाठी समिती गठीत ...

जळगाव : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यांना शेजारच्या राज्यांप्रमाणेच मानधन मिळते. एस.टी.चे शासनात विलनीकरण करण्यासाठी समिती गठीत आहे. त्या समितीचा अहवाल येत नाही. तोपर्यंत त्यावर निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांनी आता टोकाची भुमिका घ्यायला लावु नये, आता सहनशिलता संपण्याची वेळ आली असून त्यांनी कामाला सुरूवात करावी,अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकऱ्यांना इशारा दिला आहे.

उपमुख्यंत्री अजित पवार हे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, राज्यात एस.टी कर्मचाऱ्यांच्या मानधन आणि वेतनात वाढ करण्यात आली आहे.. मात्र जर नवीन भरती सुरू झाली तर काय होईल, याचा विचार संपकऱ्यांनी करावा. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वेळच्या वेळी होतील, असा शब्द देखील देण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांनी देखील समंजस भुमिका घ्यावी, असेही पवार म्हणाले.कर्जमाफीवर ते म्हणाले की, नियमीत कर्ज भरणाऱ्यांना आणि दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. मात्र कोविडची परिस्थिती निवळल्यावर आणि सरकारची आर्थिकस्थिती पुर्वपदावर आल्यावर त्यावर निर्णय घेतला जाईल.’ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर पवार यांनी सांगितले की, ५४ टक्के वर्गाला वंचित ठेवणे हे योग्य नाही. ३ महिन्यात जनगणना करु. त्यासाठी ओबीसी आयोगाला निधी दिला जाईल. एप्रिल किंवा मे मध्ये निवडणुका होऊ शकतात. तसेच मागासवर्गिय आयोगाला आवश्यक निधी तातडीने दिला आहे. उर्वरीत पुरवणी मागण्यांसाठी विधी मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे.’शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना महावितरणची फक्त चालु थकबाकी भरायची आहे. त्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील पानमळ्यांच्या नुकसानीबद्दल लवकरच चर्चा करू, असेही पवार यांनी सांगितले.