शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. कर्मचाऱ्यांनी अंत पाहु नये - अजित पवार यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 13:58 IST

जळगाव : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यांना शेजारच्या राज्यांप्रमाणेच मानधन मिळते. एस.टी.चे शासनात विलनीकरण करण्यासाठी समिती गठीत ...

जळगाव : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यांना शेजारच्या राज्यांप्रमाणेच मानधन मिळते. एस.टी.चे शासनात विलनीकरण करण्यासाठी समिती गठीत आहे. त्या समितीचा अहवाल येत नाही. तोपर्यंत त्यावर निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांनी आता टोकाची भुमिका घ्यायला लावु नये, आता सहनशिलता संपण्याची वेळ आली असून त्यांनी कामाला सुरूवात करावी,अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकऱ्यांना इशारा दिला आहे.

उपमुख्यंत्री अजित पवार हे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, राज्यात एस.टी कर्मचाऱ्यांच्या मानधन आणि वेतनात वाढ करण्यात आली आहे.. मात्र जर नवीन भरती सुरू झाली तर काय होईल, याचा विचार संपकऱ्यांनी करावा. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वेळच्या वेळी होतील, असा शब्द देखील देण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांनी देखील समंजस भुमिका घ्यावी, असेही पवार म्हणाले.कर्जमाफीवर ते म्हणाले की, नियमीत कर्ज भरणाऱ्यांना आणि दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. मात्र कोविडची परिस्थिती निवळल्यावर आणि सरकारची आर्थिकस्थिती पुर्वपदावर आल्यावर त्यावर निर्णय घेतला जाईल.’ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर पवार यांनी सांगितले की, ५४ टक्के वर्गाला वंचित ठेवणे हे योग्य नाही. ३ महिन्यात जनगणना करु. त्यासाठी ओबीसी आयोगाला निधी दिला जाईल. एप्रिल किंवा मे मध्ये निवडणुका होऊ शकतात. तसेच मागासवर्गिय आयोगाला आवश्यक निधी तातडीने दिला आहे. उर्वरीत पुरवणी मागण्यांसाठी विधी मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे.’शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना महावितरणची फक्त चालु थकबाकी भरायची आहे. त्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील पानमळ्यांच्या नुकसानीबद्दल लवकरच चर्चा करू, असेही पवार यांनी सांगितले.