शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एस.टी. कर्मचाऱ्यांनी अंत पाहु नये - अजित पवार यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 13:58 IST

जळगाव : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यांना शेजारच्या राज्यांप्रमाणेच मानधन मिळते. एस.टी.चे शासनात विलनीकरण करण्यासाठी समिती गठीत ...

जळगाव : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यांना शेजारच्या राज्यांप्रमाणेच मानधन मिळते. एस.टी.चे शासनात विलनीकरण करण्यासाठी समिती गठीत आहे. त्या समितीचा अहवाल येत नाही. तोपर्यंत त्यावर निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांनी आता टोकाची भुमिका घ्यायला लावु नये, आता सहनशिलता संपण्याची वेळ आली असून त्यांनी कामाला सुरूवात करावी,अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकऱ्यांना इशारा दिला आहे.

उपमुख्यंत्री अजित पवार हे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, राज्यात एस.टी कर्मचाऱ्यांच्या मानधन आणि वेतनात वाढ करण्यात आली आहे.. मात्र जर नवीन भरती सुरू झाली तर काय होईल, याचा विचार संपकऱ्यांनी करावा. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वेळच्या वेळी होतील, असा शब्द देखील देण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांनी देखील समंजस भुमिका घ्यावी, असेही पवार म्हणाले.कर्जमाफीवर ते म्हणाले की, नियमीत कर्ज भरणाऱ्यांना आणि दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. मात्र कोविडची परिस्थिती निवळल्यावर आणि सरकारची आर्थिकस्थिती पुर्वपदावर आल्यावर त्यावर निर्णय घेतला जाईल.’ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर पवार यांनी सांगितले की, ५४ टक्के वर्गाला वंचित ठेवणे हे योग्य नाही. ३ महिन्यात जनगणना करु. त्यासाठी ओबीसी आयोगाला निधी दिला जाईल. एप्रिल किंवा मे मध्ये निवडणुका होऊ शकतात. तसेच मागासवर्गिय आयोगाला आवश्यक निधी तातडीने दिला आहे. उर्वरीत पुरवणी मागण्यांसाठी विधी मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे.’शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना महावितरणची फक्त चालु थकबाकी भरायची आहे. त्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील पानमळ्यांच्या नुकसानीबद्दल लवकरच चर्चा करू, असेही पवार यांनी सांगितले.