शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:15 IST

जळगावकरांना सलाम : रस्ते, विविध चौक निर्मनुष्य, बाजारपेठ कडकडीत बंद, बसची चाकेही थांबली, हॉटेल-लॉजही ओस औद्योगिक वसाहतीमध्ये शुकशुकाट, संयम व संकल्पपूर्तीचे दर्शन

जळगाव : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवार, २२ मार्च रोजी पाळण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कडकडीत बंद पाळत ‘कोरोना’ला रोखण्यासाठी आपली एकजूट दाखवून दिली. ‘जनता कर्फ्यू’ला भरघोस प्रतिसाद देत शहरवासीयांनी ‘न भूतो....’ असा बंद पाळला. यामुळे शहरातील रस्ते, विविध चौक सकाळापासूनच सामसूम होते. रस्त्यावर केवळ पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारी मंडळीच असल्याने सर्वत्र शांतता पसरली होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत नागरिकांनीच ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन केले. त्यास सर्वच स्तरातून पाठिंबा मिळण्यासह नागरिकांनी स्वत: सहभागी होत कोरोनाला हद्पार करण्याचा निर्धार केला व सर्वांनी घरात राहणे पसंत केले. यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते सामसुम होते. त्याचबरोबर बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट होता.

बाजारपेठ कडकडीत बंदव्यापारनगरी असलेल्या जळगावातील बाजारपेठाच बंद ठेवण्याचा निर्णय विविध व्यापारी संघटनांनी घेतला व तो प्रत्यक्षात उतरवूनदेखील दाखविला. तसेच औद्योगिक वसाहत, विविध दुकाने, हॉटेल व इतर सर्व अस्थापना बंद ठेवून कोणीही घराबाहेर पडणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेले शहरातील महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट, बी.जे. मार्केट, सुभाष चौक परिसर, सराफ बाजार, दाणा बाजार इत्यादी प्रमुख व्यापारी ठिकाण पूर्णपणे बंद होती.

‘न भूतो.....’ असा कडकडीत बंदअनेक वेळा वेगवेगळ््या कारणांनी बंद पुकारण्यात येतो. त्याला कमी-अधिक प्रतिसाद मिळत असतो. मात्र सध्या कोरोनामुळे देशवासीयांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने स्वत:च्या कुटुंबासह देशवासीयांच्या आरोग्यासाठी सर्व जळगावकर एकवटले. त्यामुळे कोणीच बाहेर पडत नसल्याने शहरातील टॉवर चौक, चित्रा चौक, नेहरु चौक, रथ चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेट बँक चौक, कोर्ट चौक, काव्यरत्नावली चौक हे सर्व सामसूम होते. इतकेच नव्हे शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य होते. त्यामुळे शहरात सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत व त्यानंतर पुन्हा ५.०५ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वत्र शांतता होती.सहभाग कौतुकास्पदआदेश न देता जिल्हावासीयांनी जनता कर्फ्यूमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, हे कौतुकास्पद आहे. सुदैवाने जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण नाही, मात्र सर्वांना काळजी घेण्याबाबतचे गांभीर्य समजले असून यापुढेही सर्वांनी सहकार्य करावे. हे सर्वांचे हिताचे आहे.-डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारीजनतेचे कौतुकजनता कर्फ्यू चे पालन करुन जनता खरच कौतुकास पात्र ठरली आहे. यापुढचा काळ आणखी गंभीर असणार आहे. कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर जनतेने असेच सहकार्य करावे. एकजुटीने हा लढा उभारायचा आहे. हा जनता कर्फ्यू पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आला. आजपासून कलम १४४ लागू आहे.-डॉ.पंजाबराव उगले,पोलीस अधीक्षकदुपारच्या सुमारास मेडिकलही ‘लॉक’अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे़ शिवाय जनता कफ़र्युच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच सेवा ठप्प होत्या़ यात अनेक परिसरातील अनेक मेडिकल दुकाने बंद होते़ दुपारी चित्र बघितले असता संपूर्ण गांधी मार्केटमध्ये केवळ एकच मेडिकल सुरू होते़ नेहमीच्या औषधींशिवाय अत्यावश्यक असलेल्या रक्तदाब व मधुमेहाच्या औषधींसह मास्क व सॅनिटायझर घेण्यासाठी काही नागरिक दुकानावर गेले होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव