शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
बंगालमध्ये आणखी एक सामूहिक बलात्कार, सातवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; तिघांना अटक
3
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
5
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
6
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
7
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
8
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
9
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
10
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
11
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
12
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
13
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
14
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
15
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
16
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
17
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
18
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
19
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
20
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी

स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:15 IST

जळगावकरांना सलाम : रस्ते, विविध चौक निर्मनुष्य, बाजारपेठ कडकडीत बंद, बसची चाकेही थांबली, हॉटेल-लॉजही ओस औद्योगिक वसाहतीमध्ये शुकशुकाट, संयम व संकल्पपूर्तीचे दर्शन

जळगाव : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवार, २२ मार्च रोजी पाळण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कडकडीत बंद पाळत ‘कोरोना’ला रोखण्यासाठी आपली एकजूट दाखवून दिली. ‘जनता कर्फ्यू’ला भरघोस प्रतिसाद देत शहरवासीयांनी ‘न भूतो....’ असा बंद पाळला. यामुळे शहरातील रस्ते, विविध चौक सकाळापासूनच सामसूम होते. रस्त्यावर केवळ पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारी मंडळीच असल्याने सर्वत्र शांतता पसरली होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत नागरिकांनीच ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन केले. त्यास सर्वच स्तरातून पाठिंबा मिळण्यासह नागरिकांनी स्वत: सहभागी होत कोरोनाला हद्पार करण्याचा निर्धार केला व सर्वांनी घरात राहणे पसंत केले. यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते सामसुम होते. त्याचबरोबर बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट होता.

बाजारपेठ कडकडीत बंदव्यापारनगरी असलेल्या जळगावातील बाजारपेठाच बंद ठेवण्याचा निर्णय विविध व्यापारी संघटनांनी घेतला व तो प्रत्यक्षात उतरवूनदेखील दाखविला. तसेच औद्योगिक वसाहत, विविध दुकाने, हॉटेल व इतर सर्व अस्थापना बंद ठेवून कोणीही घराबाहेर पडणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेले शहरातील महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट, बी.जे. मार्केट, सुभाष चौक परिसर, सराफ बाजार, दाणा बाजार इत्यादी प्रमुख व्यापारी ठिकाण पूर्णपणे बंद होती.

‘न भूतो.....’ असा कडकडीत बंदअनेक वेळा वेगवेगळ््या कारणांनी बंद पुकारण्यात येतो. त्याला कमी-अधिक प्रतिसाद मिळत असतो. मात्र सध्या कोरोनामुळे देशवासीयांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने स्वत:च्या कुटुंबासह देशवासीयांच्या आरोग्यासाठी सर्व जळगावकर एकवटले. त्यामुळे कोणीच बाहेर पडत नसल्याने शहरातील टॉवर चौक, चित्रा चौक, नेहरु चौक, रथ चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेट बँक चौक, कोर्ट चौक, काव्यरत्नावली चौक हे सर्व सामसूम होते. इतकेच नव्हे शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य होते. त्यामुळे शहरात सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत व त्यानंतर पुन्हा ५.०५ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वत्र शांतता होती.सहभाग कौतुकास्पदआदेश न देता जिल्हावासीयांनी जनता कर्फ्यूमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, हे कौतुकास्पद आहे. सुदैवाने जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण नाही, मात्र सर्वांना काळजी घेण्याबाबतचे गांभीर्य समजले असून यापुढेही सर्वांनी सहकार्य करावे. हे सर्वांचे हिताचे आहे.-डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारीजनतेचे कौतुकजनता कर्फ्यू चे पालन करुन जनता खरच कौतुकास पात्र ठरली आहे. यापुढचा काळ आणखी गंभीर असणार आहे. कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर जनतेने असेच सहकार्य करावे. एकजुटीने हा लढा उभारायचा आहे. हा जनता कर्फ्यू पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आला. आजपासून कलम १४४ लागू आहे.-डॉ.पंजाबराव उगले,पोलीस अधीक्षकदुपारच्या सुमारास मेडिकलही ‘लॉक’अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे़ शिवाय जनता कफ़र्युच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच सेवा ठप्प होत्या़ यात अनेक परिसरातील अनेक मेडिकल दुकाने बंद होते़ दुपारी चित्र बघितले असता संपूर्ण गांधी मार्केटमध्ये केवळ एकच मेडिकल सुरू होते़ नेहमीच्या औषधींशिवाय अत्यावश्यक असलेल्या रक्तदाब व मधुमेहाच्या औषधींसह मास्क व सॅनिटायझर घेण्यासाठी काही नागरिक दुकानावर गेले होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव