शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : गुरुनानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म ...

जळगाव : गुरुनानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे, अशी त्यांची इच्छा होती. एकदा त्यांनी बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी कुणीही हिंदु नाही आणि कुणीही मुसलमान नाही. सर्व जण मानव आहोत, असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच परमात्मा आहे. असे त्यांचे म्हणणे होते, धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी अनेक केंद्राची साखळी त्यांनी निर्माण केली. त्यांनी एकता, श्रद्धा व धर्माचे तत्त्वज्ञान मांडले, ते क्रांतिकारी विचारांचे होते, त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला. गुरुनानक हे भक्ती रसाबद्दल नेहमी बोलत, त्यांनी स्वतःला भक्तीयोगामध्ये वाहून घेतले होते. तर गुरुगोविंद सिंगजी कर्मयोगी होते. त्यांची कर्म करणे हाच मुक्तीचा मार्ग आहे, यावर श्रद्धा होती. येथे आपण भक्ती ते कर्म अशी प्रगती पाहू शकतो,बाह्य घडामोडीत अडकून परमेश्वराला विसरू नका, परमेश्वराचे नाम समरण करा, अंतर्मुख व्हा, हा संदेश गुरुनानक यांनी दिला. लोकांना त्यांनी या साठी प्रवृत्त केले. त्यांचे संपूर्ण जीवन ज्ञान, प्रेम व शौर्य यांनी युक्त होते. समस्त विश्व ओंकारातून निर्माण झाले आहे. आपल्या आजूबाजूला जे निर्माण झाले आहे. ते निव्वळ ओंकाराच्या तरंगातून निर्माण झाले आहे. हा ओम तुम्ही गुरूकृपामुळेच जाणू शकता, जे आहे ते सर्वत्र आहे. पण ते जाणण्यासाठी गुरूंची फार गरज आहे, चेतनेच्या मुळाशी जो स्थायी धून आहे, तो ओमकार आहे.

निरूपण : संत गुरुनानक देव