शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : गुरुनानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म ...

जळगाव : गुरुनानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे, अशी त्यांची इच्छा होती. एकदा त्यांनी बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी कुणीही हिंदु नाही आणि कुणीही मुसलमान नाही. सर्व जण मानव आहोत, असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच परमात्मा आहे. असे त्यांचे म्हणणे होते, धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी अनेक केंद्राची साखळी त्यांनी निर्माण केली. त्यांनी एकता, श्रद्धा व धर्माचे तत्त्वज्ञान मांडले, ते क्रांतिकारी विचारांचे होते, त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला. गुरुनानक हे भक्ती रसाबद्दल नेहमी बोलत, त्यांनी स्वतःला भक्तीयोगामध्ये वाहून घेतले होते. तर गुरुगोविंद सिंगजी कर्मयोगी होते. त्यांची कर्म करणे हाच मुक्तीचा मार्ग आहे, यावर श्रद्धा होती. येथे आपण भक्ती ते कर्म अशी प्रगती पाहू शकतो,बाह्य घडामोडीत अडकून परमेश्वराला विसरू नका, परमेश्वराचे नाम समरण करा, अंतर्मुख व्हा, हा संदेश गुरुनानक यांनी दिला. लोकांना त्यांनी या साठी प्रवृत्त केले. त्यांचे संपूर्ण जीवन ज्ञान, प्रेम व शौर्य यांनी युक्त होते. समस्त विश्व ओंकारातून निर्माण झाले आहे. आपल्या आजूबाजूला जे निर्माण झाले आहे. ते निव्वळ ओंकाराच्या तरंगातून निर्माण झाले आहे. हा ओम तुम्ही गुरूकृपामुळेच जाणू शकता, जे आहे ते सर्वत्र आहे. पण ते जाणण्यासाठी गुरूंची फार गरज आहे, चेतनेच्या मुळाशी जो स्थायी धून आहे, तो ओमकार आहे.

निरूपण : संत गुरुनानक देव