शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
3
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
4
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
5
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
6
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
7
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
8
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
9
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
10
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
11
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
12
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
13
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
14
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
15
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
16
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
17
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
18
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
19
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
20
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!

मतदान वाढविण्यासाठी तीन घटकांवर विशेष लक्ष - निवडणूक निरीक्षक डॉ़ पार्थसारथी मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:29 IST

जनजागृतीवर भर

जळगाव : लोकशाहीत निवडणूक हा एक उत्सव असतो व हा उत्सव लोकसहभागानेच अधिक फुलतो, त्यासाठी अधिकाधिक मतदान होणे आवश्यक आहे़ मतदानाचा टक्का वाढावा म्हणून नवमतदार, अशिक्षित मतदार व नोकर वर्ग या तिघांवर लक्ष केंद्रीत करुन जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जळगावात आलेले निवडणूक निरीक्षक डॉ़ पार्थसारथी मिश्रा यांनी दिली़मतदानाबाबत करण्यात येत असलेल्या जनजागृतीबाबत डॉ़ मिश्रा यांनी मंगळवारी सायंकाळी ‘लोकमत’शी संवाद साधला़ त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी :प्रश्न: जागृती खूप होते मात्र मतदानाचा टक्का वाढत नाही, यासाठी काय विशेष उपाययोजना?डॉ़ मिश्रा: निवडणुका यशस्वी तर लोकशाही यशस्वी, जेव्हा मुक्तपणे, कुठल्याही दबावाला बळी न पडता अधिक मतदान होते तेव्हा निवडणुका यशस्वी होतात़एका उत्सवाप्रमाणे यात सहभाग वाढणे महत्त्वाचे आहे़ यासाठी नवमतदारांना प्रोत्साहीत करणे, त्यांना महत्त्व समजावणे, यासह ज्या मतदारांना आपल्या अधिकाराबाबत माहितीही नसते त्यांना प्रोत्साहित करणे व नोकरवर्ग जो आहे तो यापासून वंचित राहू नये याबाबत सतर्क राहणे, याबाबींवर अधिक भर दिला जात आहे. आपण स्वत: शहरातील सहा ते सात महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठात, गुरूद्वारा येथे जावून तरूणांना मतदानाचे महत्त्व सांगितले़ एका सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले़प्रश्न : काळजी म्हणून काय उपाययोजना असतातडॉ़ मिश्रा: आचारसंहितेसंदर्भात नियमावली ठरवून दिलेली असते़ निवडणुकीतील उमेदवार व पक्षांनी ती पाळणे बंधनकारक असते़ त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण यंत्रणा असतेच, याव्यतिरिक्त उमेदवारांना प्रत्येक बाबींचा खर्च ठरवून दिलेला असतो तो तेवढाच करायचा असतो़ तसेच एखादवेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास केंद्रीय पोलीस दल, राज्य पोलीस दल हे नेहमी सतर्क असते, विविध भागातून फलॅग मार्च काढून पोलीस सतर्क असल्याचा संदेश दिला जातो़या निवडणुकीत नवीन काय ?अनेक बाबींचे फॉरमॅट बदलले आहेत़ डिजिटलायझेशन वाढले आहे़ अ‍ॅप्स उपलब्ध करून देण्यात आले आहे़ आयटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत़ या व्यतिरिक्त निवडणुकीशी संबधित अधिकाऱ्यांना आता दररोज रिपोर्ट द्यावा लागतो, दर दोन तासांनी रिर्पोटींग करावे लागते़ निवडणुका पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व उपायोजना केल्या जात आहेत़

टॅग्स :Jalgaonजळगाव