शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मोबाइलवर बोलून त्याने घेतली नदीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

जामनेर : मोबाइलवर कुणाशी तरी बोलल्यानंतर भुसावळ येथील श्रीरामनगरमधील आकाश शशिकांत बोरोले (२५) या तरुणाने गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या ...

जामनेर : मोबाइलवर कुणाशी तरी बोलल्यानंतर भुसावळ येथील श्रीरामनगरमधील आकाश शशिकांत बोरोले (२५) या तरुणाने गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गंगापुरी (ता. जामनेर) जवळील सूर नदीच्या पुलावरून वाघूरच्या बॅक वाॅटरमध्ये उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली.

आकाश मोबाइलवर कुणाशी बोलला व त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले असावे, हे यासंदर्भात गूढ निर्माण झाले असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहे.

या धक्कादायक घटनेची जामनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रात्री बोरोले हा सूर नदीच्या पुलावर आला. त्या ठिकाणी असलेल्या मासेमारांकडून त्याने मोबाइल घेतला व कुणाशी तरी तो बोलला. यानंतर त्याने मोबाइल परत दिला. जवळच दुचाकी लावली व क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली.

झालेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या मासेमारांनी तत्काळ त्याने लावलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी कुर्हे पानाचे (ता. भुसावळ) गाठले व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी भुसावळला वरिष्ठांना कळविले. घटना जामनेर हद्दीत घडल्याने त्यांना कळविण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व रियाज शेख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

दुचाकी व पाण्याची बाटली

घटनास्थळी भेट दिलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी लावलेली दुचाकी व पाण्याची बाटली आढळून आली. घटनेची माहिती नातेवाइकांना देण्यात आली. शुक्रवारी सकाळी आकाशचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विलास चव्हाण तपास करीत आहे.

----

फोटो - २९सीडीजे ६