शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मोबाइलवर बोलून त्याने घेतली नदीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

जामनेर : मोबाइलवर कुणाशी तरी बोलल्यानंतर भुसावळ येथील श्रीरामनगरमधील आकाश शशिकांत बोरोले (२५) या तरुणाने गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या ...

जामनेर : मोबाइलवर कुणाशी तरी बोलल्यानंतर भुसावळ येथील श्रीरामनगरमधील आकाश शशिकांत बोरोले (२५) या तरुणाने गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गंगापुरी (ता. जामनेर) जवळील सूर नदीच्या पुलावरून वाघूरच्या बॅक वाॅटरमध्ये उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली.

आकाश मोबाइलवर कुणाशी बोलला व त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले असावे, हे यासंदर्भात गूढ निर्माण झाले असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहे.

या धक्कादायक घटनेची जामनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रात्री बोरोले हा सूर नदीच्या पुलावर आला. त्या ठिकाणी असलेल्या मासेमारांकडून त्याने मोबाइल घेतला व कुणाशी तरी तो बोलला. यानंतर त्याने मोबाइल परत दिला. जवळच दुचाकी लावली व क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली.

झालेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या मासेमारांनी तत्काळ त्याने लावलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी कुर्हे पानाचे (ता. भुसावळ) गाठले व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी भुसावळला वरिष्ठांना कळविले. घटना जामनेर हद्दीत घडल्याने त्यांना कळविण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व रियाज शेख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

दुचाकी व पाण्याची बाटली

घटनास्थळी भेट दिलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी लावलेली दुचाकी व पाण्याची बाटली आढळून आली. घटनेची माहिती नातेवाइकांना देण्यात आली. शुक्रवारी सकाळी आकाशचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विलास चव्हाण तपास करीत आहे.

----

फोटो - २९सीडीजे ६