शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवर बोलून त्याने घेतली नदीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

जामनेर : मोबाइलवर कुणाशी तरी बोलल्यानंतर भुसावळ येथील श्रीरामनगरमधील आकाश शशिकांत बोरोले (२५) या तरुणाने गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या ...

जामनेर : मोबाइलवर कुणाशी तरी बोलल्यानंतर भुसावळ येथील श्रीरामनगरमधील आकाश शशिकांत बोरोले (२५) या तरुणाने गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गंगापुरी (ता. जामनेर) जवळील सूर नदीच्या पुलावरून वाघूरच्या बॅक वाॅटरमध्ये उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली.

आकाश मोबाइलवर कुणाशी बोलला व त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले असावे, हे यासंदर्भात गूढ निर्माण झाले असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहे.

या धक्कादायक घटनेची जामनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रात्री बोरोले हा सूर नदीच्या पुलावर आला. त्या ठिकाणी असलेल्या मासेमारांकडून त्याने मोबाइल घेतला व कुणाशी तरी तो बोलला. यानंतर त्याने मोबाइल परत दिला. जवळच दुचाकी लावली व क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली.

झालेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या मासेमारांनी तत्काळ त्याने लावलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी कुर्हे पानाचे (ता. भुसावळ) गाठले व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी भुसावळला वरिष्ठांना कळविले. घटना जामनेर हद्दीत घडल्याने त्यांना कळविण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व रियाज शेख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

दुचाकी व पाण्याची बाटली

घटनास्थळी भेट दिलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी लावलेली दुचाकी व पाण्याची बाटली आढळून आली. घटनेची माहिती नातेवाइकांना देण्यात आली. शुक्रवारी सकाळी आकाशचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विलास चव्हाण तपास करीत आहे.

----

फोटो - २९सीडीजे ६