शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बोल... सदानंदाचा येळकोट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:32 IST

मार्गशीर्ष महिना भगवंतांची विभूती मानला जातो. ‘मासानां मार्गशीर्षोहं’ असे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगूनच ठेवले आहे. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी ...

मार्गशीर्ष महिना भगवंतांची विभूती मानला जातो. ‘मासानां मार्गशीर्षोहं’ असे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगूनच ठेवले आहे. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी असे सहा दिवस खंडोबाची नवरात्र असते. महाराष्ट्रात खंडोबा हे अनेकांचे कुलदैवत असून जेजुरी, निमगाव, पाली, नळदुर्ग आदी ठिकाणी खंडोबाची प्रसिध्द तीर्थक्षेत्रे आहेत. खंडोबाच्या नवरात्रात पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात. हा सहावा दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा होय. याच दिवशी भगवान शंकराने मणि आणि मल्ल दैत्यांचा संहार केला. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे उन्मत्त झालेल्या दैत्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करून दैत्याशी सहा दिवस युध्द केले. शेवटी मणि दैत्य शरण आला व मल्ल ठार झाला. त्याच्याच प्रार्थनेनुसार मार्तंड भैरवाने आपल्या नावापुढे त्याचे नाव लावून मल्ल+अरि (शत्रू) मल्लारी-मल्हारी असे नाव धारण केले.चंपाषष्ठीला मल्हारी पूजनानंतर तालिका पूजन (तळीची पूजा) करतात. तळीतली भंडारा देवाला वाहतात व तळी उचलून खाली ठेवतात. बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. प्रसादाचा काही भाग श्वानांना दिला जातो. कारण कुत्र्याला खंडोबाचा अवतार मानतात. चंपाषष्ठी अशारितीने आपणास भूतदयेचा संदेश देते. ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिते भगवंत’ हे भक्तीचे वर्म चंपाषष्ठी आपल्याला समजावते.मणि आणि मल्ल हे दैत्य प्रत्यक्षात होते किंवा नाही, हे सांगता येणार नाही, पण आजही हे पैसा आणि दमन शक्तीच्या रुपात ‘मनी आणि मसल’ या रुपात अस्तित्वात आहेत. पैसा हा मणीचा तर गुंडगिरी हा मल्लाचा अवतार आहे. या दैत्यांचा उच्छाद आज सर्वत्र पहायला मिळतो आहे. सन्मार्गाने जीवन जगणे, या दैत्यांनी मुश्किल केले आहे. त्यांचा नि:पात करण्यासाठी तुमच्या माझ्यातला मल्हारी मार्तंड प्रकट झाला पाहिजे, हाच खरा चंपाषष्ठीचा संदेश आहे. गरीबाच्या ताटात भाजी - भाकरीचा नैवेद्य दररोज पडावा, कुणी उपाशी झोपू नये, भुकेलेल्यास अन्न मिळावे, तहानलेल्यास पाणी द्यावे, सर्वाभूती ईश्वर पहा. असे झाले तरच ‘सर्वेत्र सुखिन: सन्तु’ ही वेदांची प्रार्थना सार्थ होईल. त्याचदिवशी खऱ्या अर्थाने चंपाषष्ठीचे फळ प्राप्त होईल. त्याासाठी आपण संकल्प करू या...- प्रा. सी. एस. पाटील, धरणगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव