शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

चाळीसगावला ६८ हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : पाऊस लांबल्याने ६८ हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २२ टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : पाऊस लांबल्याने ६८ हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २२ टक्के पेरा झाला आहे. आभाळभरोसे धूळपेरणी केलेल्या पिकांची स्थिती ठीक असली तरी, पावसाने अशीच उसंत घेतली तर ‘दुबार पेरणी’चे सावट गडद होणार आहे. मृग नक्षत्रातील दमदार पावसाची बळीराजाला प्रतीक्षा आहे. कोरडवाहू क्षेत्रासह ६८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या थांबल्या आहेत. कोरोना महामारीत आभाळमायाही बरसत नसल्याने शेतकरी कमालीचे हवालदिल झाले आहे.

चाळीसगाव तालुक्यात यंदा ९० हजाराहून अधिक हेक्टरवर खरिपाची लागवड होणे अपेक्षित आहे. रोहिणी नक्षत्रावर घाई करणाऱ्या पावसाने शेतकऱ्याच्या अपेक्षा चांगल्याच उंचावल्या. ७३ मिमी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी मका, कपाशीचा धूळपेरा केला. मृग नक्षत्राच्या दमदार पावसात हा पेरा तगून जाईल हेच गणित शेतकऱ्यांचे असते. मात्र मृग नक्षत्र सुरू होऊन १२ दिवस उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडेच एकवटले आहेत. पेरणीयोग्य पाऊस नसल्याने कोरवाडवाहू क्षेत्रावरील पेरण्यांनादेखील ब्रेक लागला आहे.

चौकट

धूळपेरणीवरील सावट गडद

मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच धूळपेरणी केली जाते. यावर्षी हा पेरा चार ते पाच हजार हेक्टरवर झाला आहे. पावसाने घेतलेली उसंत या पेरणीसाठी घातक ठरणार आहे. जमिनीत काहीअंशी ओल निर्माण झाल्याने ही पिके तगून आहेत. तथापि, अजून पाऊस लांबल्यास हा पेरा जुगार ठरण्याची शक्यता आहे.

चौकट

१४ मध्यम प्रकल्पांमध्ये ठणठणाट

बागायती क्षेत्रावर २२ हजार हेक्टर पेरा झाला आहे. एकूण खरीप लागवडीच्या उद्दिष्टापैकी हा पेरा केवळ २० टक्के असून ६८ टक्के क्षेत्रावरील पेरणी पावसाअभावी होऊ शकलेली नाही. १६ व १७ रोजी झालेल्या पावसाने काही अंशी बागायती पेरणीला दिलासा मिळाला असला, तरी पावसाची ओढ लांबल्यास ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.

- तालुक्यातील १४ मध्यम प्रकल्पही कोरडेठाक पडले आहेत.

- गेल्यावर्षीच्या पर्जन्यमानात देवळी-भोरस ७७ टक्के वगळता हातगाव एक व दोन, खडकीसीम, पिंप्री उंबरहोळ, ब्राह्मणशेवगे, वाघला एक व दोन, पिंपरखेड, कुंझर, बोरखेडे, वलठाण, राजदेहरे, पथराड, कृष्णपुरी व पाटबंधारे विभागातील मुंदखेडे, कोदगाव हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. मात्र सद्यस्थितीत ते शून्यावर आले आहे. त्यामुळे वाहून निघणाऱ्या कोसळधार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

- गिरणा धरणात ३२ टक्के तर मन्याड धरणातही सात टक्के जलसाठा शिल्लक आहे. १ ते २० पर्यंत १०३ मिमी पाऊस १६ व १७ रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यात सर्वाधिक बहाळ मंडळात २२ मिमी तर चाळीसगाव पाच, मेहुणबारे आठ, हातले पाच, तळेगाव दोन, शिरसगाव पाच, खडकी नऊ अशी मंडळनिहाय पावसाची नोंद महसूल विभागाने केली आहे. एक ते २० पर्यंत १०३.९६ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हे प्रमाण कमी आहे.

-मध्यंतरी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी, पेरणी योग्य पाऊस अद्याप झालेला नाही. बागायती पिकांची स्थिती चांगली आहे. कोरडवाहू क्षेत्रावरील पेरणी मात्र खोळंबली आहे. धूळपेरणीतील पिके बऱ्या स्थितीत आहे. पावसाची ओढ त्यांच्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.

-सी. डी. साठे,

तालुका कृषी अधिकारी, चाळीसगाव.

चौकट

तालुक्याचे खरीप रिपोर्ट कार्ड

एकूण लागवडीचे उद्दिष्ट ९० हजार ३८४ हेक्टर

२० अखेर पेरणी झालेले क्षेत्र २२ हजार

१ ते २० पर्यंत एकूण झालेले पर्जन्यमान १०३.९६ मिमी

पाऊस नसल्याने ६८ हजार हेक्टरवरील पेरणीला ब्रेक

१४ मध्यम प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के

गिरणा ३२ तर मन्याडमध्ये सात टक्के जलसाठा