शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक शवदाहिनीचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST

केशवस्मृती प्रतिष्ठानाचा पुढाकार : पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत ...

केशवस्मृती प्रतिष्ठानाचा पुढाकार : पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे अत्याधुनिक शवदाहिनी बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील आठवड्यात या आधुनिक शवदाहिनीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या शवदाहिनी बसविण्याच्या कामाला सात महिन्यांपूर्वी सुरुवात झाली होती. अखेर काम आता पूर्ण झाले असून, आठवडाभरातच या शवदाहिनीमध्ये मृतदेहावर तत्काळ अंत्यसंस्कार करता येणार आहेत. यामुळे लाकूड व इतर इंधनाचा खर्चदेखील वाचणार असल्याची माहिती केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी दिली.

आधुनिक शवदाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी नेरी नाका स्मशानभूमीच्या आवारात झालेल्या पत्रकार परिषदेत अमळकर बोलत होते. यावेळी प्रकल्प प्रमुख नंदू अडवाणी, जनता बँकेचे अध्यक्ष प्रा.अनिल राव, रिखबराज बाफना, उद्योजक दिलीप चोपडा, केशव स्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, समन्वयक सागर येवले आदी उपस्थित होते. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मृतांची संख्यादेखील वाढत होती. जून महिन्यात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शहरात मनपाच्यावतीने विद्युतदाहिनी बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचना देऊनही मनपा प्रशासनाने फारसे लक्ष दिले नव्हते. त्यानंतर तत्कालीन स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांनी केशव स्मृती प्रतिष्ठानच्या सहकार्याने स्मशानभूमीत गॅसदाहिनी बसविण्याचा प्रस्ताव दिला होता. केशव स्मृती प्रतीष्ठाननेदेखील मनपाचा प्रस्ताव मान्य करत कामाला सुरुवात केली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केशव स्मृती प्रतिष्ठानने शहरात गॅसदाहिनी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला होता. या सभेत प्रस्तावाला मंजुरीदेखील देण्यात आली होती. मात्र, मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर हा प्रस्ताव रखडला होता. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर मनपाने केशव स्मृती प्रतिष्ठानच्या संचालकांशी चर्चा करत, आवश्यक मशिनरी उपलब्ध करून दिली.

पर्यावरणाचे होणार संवर्धन

एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही झाडांची कत्तल करावी लागते. तसेच पावसाळ्यात लाकडांसाठी अनेक अडचणींचा सामनादेखील करावा लागतो. नेरी नाका स्मशानभूमीत दिवसभरात १० ते १२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असतात. या अत्याधुनिक शवदाहिनीमुळे झाडांची होणारी कत्तल थांबणार असून, पर्यावरणाची बचत होणार असल्याची माहिती रिखबराज बाफना यांनी दिली. रिखबराज बाफना, दिलीप चोपडा यांनीही या शवदाहिनीसाठी देणगी दिल्याची माहिती नंदू अडवाणी यांनी दिली.

शवदाहिनीची काय आहेत वैशिष्ट्ये...

१. गॅसदाहिनीसाठी अंदाजे ५० लाखांपर्यंतचा खर्च लागला आहे.

२. एका मृतदेहावर ४५ मिनिटात अंत्यसंस्कार होणार आहेत.

३. शवदाहिनी पूर्णपणे एलपीजी गॅसवर कार्यान्वित राहणार.

४. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर २ तासांनी अस्थी उपलब्ध होणार.

५. एका दिवसात ८ ते १० मृतदेहांवर होऊ शकतात अंत्यसंस्कार.

६. मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी १५०० रुपयांचे शुल्क संस्थेकडून आकारले जाणार आहे.

७. शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी मिळून स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून चालणार काम.

८. बडोदा येथील विश्वकर्मा कंपनीने तयार केली शवदाहिनी.