शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गाव पाणीदार झाल्याचे सर्वाधिक समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 20:49 IST

राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेत तयारीनिशी उतरलो, पण पारोळा तालुकास्तरावर समाधान, नाला खोलीकरणामुळे विहिरी भरल्या

पारोळा, जि.जळगाव : पहिल्यादा चोरवड गावातील सारे जण श्रमदानासाठी अहोरात्र एकत्र आले. गावाला सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत राजस्तरीय बक्षीस मिळवायचे या जिद्दीने उतरले पण बक्षीस तालुकास्तरीय मिळाले, तरी सर्व ग्रामस्थ खुश आहेत. कारण गाव यामुळे ‘पाणीदार तर झाले,’ अशी माहिती चोरवड, ता.पारोळा येथील ग्र्रामस्थ तथा जि.प.सदस्य डॉ.हर्षल माने यांनी पारोळा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पारोळा तालुक्यातून वॉटर कप स्पर्धेत तालुका स्तरावर १५ लाखांचे बक्षीस मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना डॉ.माने यांनी ही माहिती दिली. गावात यासाठी १९ ग्रामसभा घेतल्या. त्यात मनसंधारण केले. मग श्रमदानातून जलसंधारणाची कामे कशी करतात याचा व्हिडीओ पडद्यावर दाखविला आणि गावकऱ्यांचे मन याकडे वळविले. २८ गुण यासाठी लागतात म्हणून पहिल्या दिवसापासून ग्रामस्थांनी स्पर्धेसाठी श्रम घेतले. नर्सरी निर्माण केली. शोषखड्डे तयार केले. गावातील सर्व सांडपाणी त्यात जिरविले. निर्माण केलेल्या नर्सरीत ८ ते १० हजार रोपे तयार केली. गाव आगपेटी मुक्त केले. गावातील वा शेत शिवारातील कचरा जाळायचा नाही, तो शेतात खड्डे करून पुरायचा, अशी संकल्पना राबविली.८ एप्रिल रोजी गावातून ७०० पुरुष, ८०० महिला एकत्र येऊन मशाली घेऊन बैलगाडी व ट्रॅक्टरमधून गेले. श्रमदानातून नाला खोलीकरण व इतर जलसंधारणाची कामे केली असल्याची माहिती डॉ.हर्षल माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.या वेळी ग्रामस्थांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी यासाठी खासदार ए. टी. पाटील, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार वंदना खरमाळे यांनीही रात्री १२ वाजता चोरवड गावी श्रमदान केले होते.चोरवड ग्रामस्थांच्या ४५ दिवसांच्या अथक परिश्रमातून हे काम उभे राहिल्याची माहिती त्यांनी दिली. पारोळा तालुक्यात पाणी फाउंडेशनप्रमुख अमीर खान व किरण राव आले. त्यांना चोरवड गावी येण्यासाठी आम्ही आग्रह धरला, पण ते आले नाही. आम्ही सर्व जण नाराज होत नैराश्य आले. नैराश्याने आणि रागाने काही ग्रामस्थांनी या स्पर्धेतून बाहेर पडण्याबाबत बोलू लागले. पण सर्वांची समजूत काढली आणि अमीर खान याना गावाचे बक्षीस मिळवूनच बक्षीस घेताना भेटू, असा चंग बांधला आणि पुन्हा जोमाने जोरदारपणे प्रयत्न केला आणि गावाचा तालुक्यात पहिला नंबर आला. राज्यात नंबर आला नाही, याची खंत नाही, पण गाव गावकºयांच्या अथक परिश्रमातून गाव पाणीदार झाले याचे भूषण मात्र सर्वांना आहे, असे डॉ.माने यांनी या वेळी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले.या वेळी म्हलार कुंभार, अ‍ॅड. भूषण माने, संदेश माने, रोहिदास नगराज पाटील, महेंद्र नितीन पाटील, राजेंद्र पाटील, भालेराव पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते

टॅग्स :water shortageपाणीटंचाईParolaपारोळा