शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

सोशल मीडिया आपल्या भल्यासाठी, त्याचा विवेकशील वापर गरजेचा - विनायक पाचलग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:36 IST

सोशल मीडियाचा वापर करण्याची पद्धती, वेळ लक्षात आली म्हणजे होणारे नुकसान टाळता येते.

भुसावळ : संपूर्ण विश्व आपल्या एका क्लिकवर आले आहे. यात माहिती व तंत्रज्ञानाचा मोठा साठा आहे. या सोशल मीडियाचा वापर करण्याची पद्धती, वेळ लक्षात आली म्हणजे होणारे नुकसान टाळता येते. तसेच सोशल मीडिया हा आपल्यासाठी भल्यासाठी आहे. त्याचा विवेकशील वापर होणे गरजेचे असल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे माहिती सल्लागार विनायक पाचलग यांनी सांगितले.रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्यावतीने शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी द्वंद जीवनाचे या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानाचे सहावे पुष्प सोमवारी कोल्हापूर येथील मूळचे, पण सध्या पुणे येथे स्थायिक झालेले विनायक पाचलग यांनी गुंफले. प्रास्ताविक प्रेसिडेंट सुधाकर सनांसे यांनी केले. वक्त्यांंचा परिचय सुनील वानखेडे यांनी करून दिला.यावेळी बोलताना विनायक पाचलग म्हणाले की, इंटरनेट साधन हे केव्हा वापरले पाहिजे हे ठरलेले आहे. सोशल मीडिया वापरण्याची मात्र वेळ नाही हे केव्हाही आपण त्याचा वापर करतो. या सोशल मीडियाचे वेगळे वेगळे लेव्हल असून, गुगलही त्याची बालवाडी आहे. गुगलमध्ये जवळपास ५५ वेगळे त्यांचे प्रॉडक्ट असून, त्याचा वापर योग्य पद्धतीने कसा करायचा याबाबतची माहिती त्यांनी दिली. यामध्ये गुगल सर्च, गुगल ट्रेन्डस, गुगल इमेजेस तसेच यू ट्यूब, स्कॉलर गुगल, गुगल कीप असे विविध अ‍ॅपची माहिती दिली. फेसबूक ट्विटर इंस्टाग्राम हे चांगले वाटत असले तरी यामध्ये आभासी चित्र निर्माण केले जाते. यामध्ये असलेले सर्वच खरे असेल असे नाही. आपण एखादी पोस्ट व्हाट्सअप पाहिली तर ती व्हायरल करण्यापूर्वी थोडा विचार करा. याबाबतची पडताळणी करा. नंतरच पुढे पाठवा. म्हणजे यामधून विघातक होणारे परिणाम टाळता येऊ शकतात. तसेच आपल्याला एखादा विषय मांडायचा असेल तर 'चेंज डॉट ओआरजी' या वेबसाईटवर मांडा. त्याची दखल संपूर्ण विश्वात घेतली जाते. वेळप्रसंगी त्यावर ती चर्चा होत असते.फेसबुक, ट्विटर वापरण्याच्या ट्रिक्स यावेळी त्यांनी दिल्या. तसेच आपल्या अकाउंटचे टू स्टेप व्हेरिफिकेशन नेहमी आॅन असले पाहिजे. त्यामुळे आपल्याला अकाउंटला हॅक कोणीही करू शकत नाही किंवा प्रयत्न झाला तत्काळ याची माहिती मिळते. तसेच फेक अकाउंटसुद्धा ओळखता आले पाहिजे. त्याबाबतची माहिती यावेळी दिली.लिंकइन, मिक्स, पिन्टत्रेस्ट, टेलिग्राम, क्वोरा, इंस्टाग्राम टेड, पॉकेट, गुगल कीप या अ‍ॅपची माहिती सांगून सोशल मीडियावरून वाचणारा वेळ याठिकाणी घालवला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात माहितीचा खजाना मिळतो. आपले ज्ञान वाढते. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या लोकांचे संभाषण व आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे यावर असतात. त्यामुळे प्रत्येकाने याचा वापर केलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितल.ेसूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी, तर आभार डॉ.गोपाळ सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅलीचे सेक्रेटरी राम पंजाबी, प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रदीप सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Information & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालयBhusawalभुसावळ