शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

तर व्यापाऱ्यांचे अर्थकारणच संपेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सद्यःस्थितीत सर्व व्यवसायात आता कुठेतरी नियमितता येत आहे. त्यात पुन्हा लॉकडाऊन लागल्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सद्यःस्थितीत सर्व व्यवसायात आता कुठेतरी नियमितता येत आहे. त्यात पुन्हा लॉकडाऊन लागल्यास व्यापाऱ्यांचे अर्थकारण संपणार आहे. सध्या व्यवसायात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी जरी लॉकडाऊन मान्य आहे. तर सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते सहा अशी व्यवसाय करण्याची वेळ ठरवून देण्याची मागणी व्यापारी शिष्टमंडळाने केली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

या शिष्टमंडळाने गुरूवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली त्यावेळी खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, संत हरदासराम मर्चंट असोसिएशन, संत कवरलाल मार्केट पदाधिकारी, सेंट्रल फुले मार्केट व्यापारी संघ, संत गोधडीवाला रेडिमेट कापड मार्केट संघ, शहर ऑप्टिकल दुकानदार संघटना यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच चाळीसगाव सराफा असोसिएशनचे नीलेश सराफ, चाळीसगाव रेडीमेड व्यापारी संघटनेचे सुरेश तलरेजा, प्रिंटिंग प्रेस असोसिएशनचे नीलेश पिंगळे, विवेक येवले, जळगाव येथील व्यापारी मोहन मंदानी, संजय विसराणी,राकेश पिंजानी, विलास माळी, दिलीप मेहता, शंकर तलरेजा, नामदेव मंधानी, भूषण शिंपी विविध व्यापारी असोसिएशनचे उपस्थित होते.

कर्जाचे हप्ते, व्यावसायिक बँक खात्याचा भरणा,कर्मचाऱ्यांचे पगार, कालबाह्य होणारे मालाचा स्टॉक अशा अनेक समस्यांनी व्यापारी, उद्योजक, कामगार घेरला गेला आहे. यातून मार्ग काढावा लागेल. शनिवार रविवार लॉकडाऊन मान्य असुन सोमवार ते शुक्रवार दहा ते सहा अशी वेळ ठरवून द्या. अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केली.

यावेळी व्यापाऱ्यांच्या मागण्या रास्ता असून त्यांना विशिष्ट वेळ ठरवून दिल्यास त्यावेळेस ती त्यांची व्यापारी आस्थापने सुरू ठेवतील. शासन आणि व्यापारी समन्वयाची गरज असून आम्ही लोकप्रतिनिधी देखील आपल्या सोबत असून मार्ग काढावा लागेल, अशी विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केली.

त्यासोबतच व्यापाऱ्यांनीही आपल्या भावना मांडल्या. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी समन्वयातून मार्ग काढू, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी व्यापाऱ्यांना सहकार्य केले जाईल असे सांगितले.