शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

...म्हणून फिरविली विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खासगी व शासकीय आयटीआयमधील प्रवेश प्रक्रियेस विद्यार्थ्यांकडून यंदा कमी प्रतिसाद मिळाला. यामुळे संस्थांमधील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : खासगी व शासकीय आयटीआयमधील प्रवेश प्रक्रियेस विद्यार्थ्यांकडून यंदा कमी प्रतिसाद मिळाला. यामुळे संस्थांमधील प्रवेश शंभर टक्के होतील यादृष्टीने ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येत आहे. मात्र, एकीकडे कोरोनामुळे पालकांनी आलेली आर्थिक अडचण व दुसरीकडे कमी शुल्कात डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांची आयटीआयकडे पाठ फिरविली असावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया ही १ ऑगस्टपासून सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ३० शासकीय व खासगी आयटीआय आहेत. या आयटीआयमधील जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मागील वर्षी १६ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केले होते. मात्र, यंदा १० हजार ३७९ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. त्यापैकी १० हजार ७५ विद्यार्थ्यांनी अर्जांची पुष्टी केली आहे. दरम्यान, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत राज्यातील खासगी व शासकीय आयटीआयमधील प्रवेशासाठी अर्जांचा ओघ घटलेला आहे. यामुळे संस्थांमधील प्रवेश शंभर टक्के होतील, या दृष्टीने ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येत आहे.

यंदा मूल्यमापन पद्धतीनुसार दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाला. यात विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले. यामुळे विद्यार्थ्यांनी डिप्लोमा अभ्यासक्रमाकडे आपली पावले वळविली आहेत. दुसरीकडे आयटीआयमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात. कोरोनामुळे या विद्यार्थ्यांचे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही खाजगी आयटीआयमधील शुल्क भरणे हे पालकांना शक्य नाही. त्यामुळे डिप्लोमाचे कमी शुल्क असल्याने विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रसंती दिली. त्यातच प्लेसमेंट नसल्याचाही फटका आयटीआयला बसला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले; परंतु अर्जांचा ओघ घटला असून, आयटीआयमधील संपूर्ण जागा भरल्या जातील, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अर्जासाठी ३१ पर्यंत मुदत

आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागामार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र आयोजित केले जात आहे. दुर्गम व ग्रामीण भागात प्रवेशाबाबत माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे, तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत, त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

- जिल्ह्यातील आयटीआय महाविद्यालय : ३० (सुमारे)

- आतापर्यंत नोंदणी केलेले विद्यार्थी : १०,३७९

- अर्जांची पुष्टी केलेले विद्यार्थी: १०,०७५

- मागील वर्षी आलेले अर्ज :१६,५१३