शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

तर भाजपप्रमाणेच सेनेच्या गर्वाचे घर होईल खाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

जळगाव महापालिकेत सुमारे दोन महिन्यांपूर्वी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करीत त्यांचे ५७ पैकी २७ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने सत्ता मिळविली. ...

जळगाव महापालिकेत सुमारे दोन महिन्यांपूर्वी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करीत त्यांचे ५७ पैकी २७ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने सत्ता मिळविली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर पालिकेतही भाजपचे नगरसेवक शिवसेनेने गळाला लावले, तर आता जळगाव महापालिकेत भाजपच्या उर्वरित ३० पैकी आणखी तीन नगरसेवकांना गळाला लावत त्यांना शिवबंधन बांधले आहे. भाजपने केंद्र व राज्यातील सत्तेच्या जिवावर मनपातील सत्ता मिळविण्यासाठी जे केले, त्याच मार्गाने शिवसेना जाताना दिसत आहे. फरक एवढाच की भाजपने साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच आयुधांचा त्यासाठी वापर केला, तर सेना विकासकामे या गोंडस नावाखाली नगरसेवक गळाला लावत आहेत. मात्र, भाजपने जी आश्वासने दिली होती, त्याची पूर्तता न केल्यानेच हे नगरसेवक सेनेकडे आले आहेत. त्यामुळे सेनेने शब्द पाळला नाही तर भाजपप्रमाणेच सेनेचीही गत व्हायला वेळ लागणार नाही.

जळगाव पालिका व महापालिकेवर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची सातत्याने सत्ता होती. अगदी २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी सुरेशदादा जळगावात नसतानाही भाजपलाही महापालिका जिंकणे शक्य झाले नव्हते. त्यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपकडून ही महापालिका जिंकण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, तरीही ते शक्य झाले नव्हते. मात्र, मागील निवडणुकीवेळी केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने भाजपने महापालिका जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. त्यासाठी खान्देश विकास आघाडी म्हणजेच सेनेकडील व राष्ट्रवादीकडील निवडून येण्याची क्षमता असलेले जेवढे उमेदवार गळाला लागतील, त्या सगळ्यांना गळाला लावण्यात आले. अगदी खाविआचे महापौरही भाजपच्या गळाला लागले. यासाठी भाजपने साम, दाम, दंड भेद सगळ्यांचा वापर केला. तसेच केंद्र व राज्यात सत्ता असल्याने भाजपची सत्ता आली तर विकासकामे वेगाने होतील, असेही चित्र निर्माण केले. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी तर सुभाष चौकातील जाहीर सभेत भाजपला मनपाची सत्ता दिली, तर जळगाव शहराचा एका वर्षात कायापालट करून दाखवू, अन्यथा विधानसभा निवडणुकीत मत मागण्यासाठी येणार नाही, अशी घोषणा करीत आमदार भोळे यांची आमदारकी पणाला लावून टाकली होती. मात्र, वर्ष काय तीन वर्ष होत आली तरीही शहराचा कायापालट होऊ शकला नाही. उलट रखडलेल्या अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था बिकट होऊन नागरिकांची तीव्र नाराजी निर्माण झाली. अर्थात तरीही आमदार भोळे हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले, हा भाग वेगळा. पण भाजप आश्वासन पाळू शकली नाही, हे मात्र स्पष्ट झाले. आमदार महाजन यांनी नंतर जळगाव महापालिकेतील विकासकामांबाबत वैयक्तिक लक्ष घातले नाही, तर आमदार भोळे यांना सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन चालणे जमले नाही, त्यामुळे नाराजी वाढत गेली. त्यामुळेच अवघ्या दोन-अडीच वर्षांतच भाजपला सत्ता गमाविण्याची वेळ आली. आता सेनेने विकासकामे करण्याचे आमिष दाखवीत भाजपचे नगरसेवक गळाला लावले आहेत. मात्र, साधा शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे खांब स्थलांतरित करण्याचा विषय महिनोंमहिने रखडत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने रस्त्यांची कामे ठप्प आहेत. अशा परिस्थितीत विकासकामे करण्याचे आश्वासन पाळणे सेनेलाही अवघड जाणार आहे. त्यातच सेनेतही अंतर्गत चढाओढ सुरू असल्याने सेनेने आश्वासन न पाळल्यास भाजपसारखीच स्थिती व्हायला वेळ लागणार नाही, हे स्पष्ट आहे.