शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

येणे सुखे रूचे एकांताचा वास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 12:50 IST

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या अभंगातील ध्रुव चरणाचा आपण विचार करणार आहोत. ज्यामध्ये संत तुकाराम ...

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या अभंगातील ध्रुव चरणाचा आपण विचार करणार आहोत. ज्यामध्ये संत तुकाराम महाराजांना एकांत हा सुखकर आणि रुचकर वाटतो, त्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केलंय ‘नाही गुण दोष अंगा येत’.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाउनच्या काळात विश्वातील लोक चार भिंतीच्या आत बंद झाले आहेत. धावपळीच्या युगात जगणाऱ्या काही लोकांना जरी हे बंदिस्त जीवन कंटाळवाणे वाटत असले तरी साधकाच्या दृष्टिकोनातून मात्र हा पर्वकाळ आहे. त्यांना ही एक साधनेसाठी मिळालेली सुवर्णसंधी आहे. कारण लोकांतात राहून ज्या गोष्टी घडत नाही त्या एकांतात घडतात.काळ सारावा चिंतने ‘एकांतवासे गंगास्नाने’’तुका म्हणे आम्हा एकांताचा वास’ ब्रम्ही ब्रम्हरस सेवू सदा ।।तुकाराम महाराज म्हणतात, लोकांमध्ये राहून कदाचित एखाद्यातील चांगली कला पाहून मन त्या गुणांकडे आकर्षित होईल. एखादा नास्तिक असला तर त्याला एखाद्यातील दोष आत्मसात करण्याची इच्छा होईल. परंतु एकांतात राहिल्यानंतर जनसंपर्कच नसल्यामुळे ना कुणाचे गुण दिसणार, ना कुणाचे दोष. कधी कधी तर संत महात्मे स्वत:ला वेगळं ठेवण्यासाठी स्वत:चा अधिकार व मोठेपणा बाजूला ठेऊन सामान्यत्व दाखवतात.चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी, जगामाजी!जगे अवज्ञाच करावी, संबंधी सोय न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु!गर्भवती मातेने जेवण केल्यानंतर त्या गभार्तील जीवाला वेगळे जेवण करण्याची गरज नसते, त्याची तृप्ती आपोआप होते. त्याप्रमाणे संत वचन मानल्याने भगवंत सुखावतो, भगवंताचीच सेवा घडते.-मंगेश महाराज, दाताळा

टॅग्स :Jalgaonजळगाव