शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची संथ गती नागरिकांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 13:04 IST

जळगाव : शहरात गेल्या काही वर्षांपासून विकासाचा रथ गाळात रुतला असून जे कामे सुरु आहे, त्या कामांचा वेग पाहिला ...

जळगाव : शहरात गेल्या काही वर्षांपासून विकासाचा रथ गाळात रुतला असून जे कामे सुरु आहे, त्या कामांचा वेग पाहिला तर तो वेगही जळगावकरांसाठी त्रासदायक ठरत आहे. लहान-लहान कामांसाठीही महापालिकेचे मक्तेदार आठ-आठ महिने लावत असून ती कामेदेखील अतिशय सुमार दर्जाचे होत असल्याचे चित्र सध्या शहरात निर्माण झाले आहे. विकासाची ही संथ गती जळगावकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे नसून अडचण असून खोळंबा अशीच स्थिती शहरातील विकासकामांची झाली आहे.शहरात १ हजारहून अधिक कोटींची कामे आणल्याचा दावा आमदार सुरेश भोळे यांनी गेल्या वर्षभरापुर्वी केला होता. मात्र, यापैकी अनेक कामे अजूनही झालेली नाहीत. ५०० कोटींच्या अमृत योजनेचे काम ेअजूनही सुरुच आहेत. २५ कोटींचा शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम मध्ये-मध्ये ब्रेक घेवून मुदत संपण्याची चिंता न करता सुरु आहे. घनकचरा प्रकल्प असो वा इतर कामे सर्वच कामे वर्ष होवूनही अजूनही अपुर्णावस्थेतच आहेत. मोठ्या कामांप्रमाणेच लहान-लहान कामांनाही अनेक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने जळगावकरांना हा विकासाचा वेग न परवडण्याजोगाच दिसून येत आहे.मनपा फंडातून कामे होत असल्याने मक्तेदारांची टाळाटाळअनेक कामे २५ कोटींच्या निधीतून करण्यात येणार होती. मात्र, ३१ मेपर्यंत हा निधी खर्च न झाल्याने १५ कोटींचा अखर्चित निधी शासनाने परत मागविला आहे. त्यामुळे जी कामे सुरु आहेत, ती कामे आता मनपा फंडातून करण्यात येणार आहे. मनपा फंडातून कामे होत असल्याने बिलांची रक्कम उशिरा मिळेल म्हणून मक्तेदार काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या उशिरा होणाऱ्या कामांचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे. मनपातील लिफ्टचे कामदेखील रखडले असून, इच्छादेवी चौक ते डीमार्टपर्यंतच्या दुभाजकांचे काम देखील सात महिन्यांनंतर आता पूर्ण झाले आहे.पदाधिकारी, नगरसेवकांनीच कामे घेतल्याने बोलणार कोण ? ... शहरात सुरु असलेले अनेक कामे मनपातील पदाधिकारी व नगरसेवकांनीच घेतली आहेत. त्यामुळे मक्तेदारांकडून उशीराने होत असलेल्या कामांबाबत कोणत्याही पदाधिकाऱ्यांकडून मक्तेदाराला खडेबोल देखील सुनावले जात नाही. तसेच मनपाचे अधिकारी देखील याबाबत चुप्पी साधून आहेत.सुमार दर्जाचे कामे, पावसातच होतेय पितळ उघडेजे काही कामे आतापर्यंत झाली आहेत त्यापैकी अनेक कामांचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने महिनाभराच्या पावसातच या कामांचे पितळ उघडे पडले आहे. बळीराम पेठेत तीन महिन्यांपूर्वी तयार केलेली गटार गुरुवारी पावसात वाहून गेली. तसेच पावसाळ्याचा तोंडावर जून महिन्यात मनपाने मुख्य भागातील रस्त्यांच्या केलेल्या दुरुस्तीचेही या पावसात पितळ उघडे पडले. गेल्यावर्षांप्रमाणे यावर्षी देखील खड्डे व चिखल तुडवतच मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे.दुध फेडरेशन रस्त्यावरील दुभाजकांचे सहा महिनेहोवूनही सुरुच-काम - शिवाजीनगरकडून दूध फेडरेशकडे येणाºया रस्त्यालगत दुभाजक बांधणे-सुरुवात - फेब्रुवारी २०२०-कामाची लांबी - ८०० मीटर-सध्यस्थिती - सहा महिने होवूनही या रस्त्यालगत दुभाजकांचे काम अजूनही अपूर्णावस्थेतच पडून आहे. दुभाजकांच्या कामामुळे रस्ता मधोमध खोदण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याचा दोन्हीही बाजूला डांबर, खडीचा मलबा पडून आहे. त्यातच मलनिस्सारण योजनेमुळे रस्ता खोदण्यात आल्याने या रस्त्यालगत वाहने चालविणे कठीण झाले.३०० मीटरचा नाल्याचे काम एक वर्षांपासून सुरुच-काम - एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील नाला काही प्रमाणात सरकवून नाला अरुंद करणे-सुरुवात - आॅगस्ट २०१९-कामाची लांबी - ३०० मीटर-सध्यस्थिती - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन महापौर सीमा भोळे यांच्याहस्ते या कामाचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र, एक वर्षापासून या नाल्याचे केवळ १०० मीटरचे काम अद्याप झाले आहे. तसेच गेल्यावर्षी नव्याने तयार करण्यात आलेली संरक्षण भिंत पावसात वाहून गेली होती. नाल्याचे काम थांबल्याने अनेक याभागातील घरांमध्ये पावसाचे पाणी नेहमीच शिरते.शिवाजीनगर शौचालयांचे कामही होईना-काम - शिवाजीनगर भागातील हमाल वाड्यात २४ शौचालयांचे काम-सुरुवात - मार्च २०२०-शौचालयांची संख्या - २४-सध्यस्थिती - २० शौचालये उभारण्यात आले आहेत. मात्र, प्लास्टरचे काम अजूनही शिल्लक. काम अपुर्ण असल्याने नागरिकांना उघड्यावर शौच करावे लागत आहे. त्यामुळे मनपाच्या हगणदारी मुक्तीच्या मोहीमेला हरताळ फासला जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव