शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

रस्त्याची संथ ‘गती’ व्यापार, उद्योगाच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:49 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : जळगाव -औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे जळगावच्या उद्योग, व्यापार क्षेत्राला मोठा फटका बसत असून या रस्त्याच्या संथ ...

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे जळगावच्या उद्योग, व्यापार क्षेत्राला मोठा फटका बसत असून या रस्त्याच्या संथ गतीचामुळे सर्व हैराण झाले आहेत. त्यामुळे हा रस्त्याच्या गती येणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेचा फटका वाहनधारकांसह उद्योग क्षेत्रांना बसू लागला असून जळगावातील दालमिलमधून मराठवाड्यात दररोज जाणाऱ्या २०० टन डाळचीही वाहतूक गेल्या सहा महिन्यांपासून थांबली आहे. सोबतच लातूरसह वेगवेगळ््या भागातून येणारा कच्चामालही येत नसल्याने दालमिलला दुहेरी फटका बसत आहे.जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी या रस्त्याचे काम जवळपास दीड वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. त्यात जामनेर तालुक्यातील नेरीपासून या कामाला सुरुवात होऊन हळूहळू थेट औरंगाबादपर्यंत संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूने खोदून ठेवण्यात आला. रस्ता तर खोदला गेला मात्र काँक्रीटीकरण, डांबरीकरणाच्या कामाने गती काही घेतली नाही. त्यामुळे गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून वाहनधारकांसह व्यापारी, उद्योजकांना या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.जळगावातील दालमिलमधून विदेशात डाळ निर्यात होण्यासह देशातही विविध भागात जाते. त्यात शेजारीच असलेल्या मराठवाड्यात दालमिलचा माल मोठ्या प्रमाणात जातो. मात्र जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे अवजड वाहतूक करणे जिकरीची ठरत आहे. परिणामी या मार्गावरून डाळ, धान्याची वाहतूक करणे सध्या वाहनधारक टाळत आहे. जळगाव येथून पहूरसह सिल्लोड, औरंगाबाद, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणात डाळ जाते. सोबतच मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यात तिला मागणी आहे. त्यामुळे जळगावातून दररोज १५ ते २० ट्रकद्वारे त्या भागात डाळची वाहतूक केली जात असे. मात्र रस्त्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली व जवळपास २०० टन डाळीची वाहतूक थांबली आहे.जळगावात ५० ते ५५ दालमिल असून येथे दररोज ७०० ते ८०० टन कच्चा माल लागतो. आधीच सरकारने एप्रिल महिन्यात कडधान्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याने केवळ १५ टक्केच कच्चा माल विदेशातून आयात करता येत आहे. हे प्रमाण कमी होण्यासह आता औरंगाबाद, लातूर, सिल्लोड या भागातून येणारा हरभरा, तूरही येत नसल्याने त्याचा परिणाम होत आहे. लातूर येथील तूरला अधिक मागणी असल्याने तेथील कच्च्यामालापासून तयार तूर डाळ उत्पादनावरही अधिक भर असतो. मात्र सध्या या तुरीसह कच्चामालही येत नसल्याने दालमिलला दुहेरी फटका बसत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव