शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची संथ ‘गती’ व्यापार, उद्योगाच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:49 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : जळगाव -औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे जळगावच्या उद्योग, व्यापार क्षेत्राला मोठा फटका बसत असून या रस्त्याच्या संथ ...

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे जळगावच्या उद्योग, व्यापार क्षेत्राला मोठा फटका बसत असून या रस्त्याच्या संथ गतीचामुळे सर्व हैराण झाले आहेत. त्यामुळे हा रस्त्याच्या गती येणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेचा फटका वाहनधारकांसह उद्योग क्षेत्रांना बसू लागला असून जळगावातील दालमिलमधून मराठवाड्यात दररोज जाणाऱ्या २०० टन डाळचीही वाहतूक गेल्या सहा महिन्यांपासून थांबली आहे. सोबतच लातूरसह वेगवेगळ््या भागातून येणारा कच्चामालही येत नसल्याने दालमिलला दुहेरी फटका बसत आहे.जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी या रस्त्याचे काम जवळपास दीड वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. त्यात जामनेर तालुक्यातील नेरीपासून या कामाला सुरुवात होऊन हळूहळू थेट औरंगाबादपर्यंत संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूने खोदून ठेवण्यात आला. रस्ता तर खोदला गेला मात्र काँक्रीटीकरण, डांबरीकरणाच्या कामाने गती काही घेतली नाही. त्यामुळे गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून वाहनधारकांसह व्यापारी, उद्योजकांना या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.जळगावातील दालमिलमधून विदेशात डाळ निर्यात होण्यासह देशातही विविध भागात जाते. त्यात शेजारीच असलेल्या मराठवाड्यात दालमिलचा माल मोठ्या प्रमाणात जातो. मात्र जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे अवजड वाहतूक करणे जिकरीची ठरत आहे. परिणामी या मार्गावरून डाळ, धान्याची वाहतूक करणे सध्या वाहनधारक टाळत आहे. जळगाव येथून पहूरसह सिल्लोड, औरंगाबाद, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणात डाळ जाते. सोबतच मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यात तिला मागणी आहे. त्यामुळे जळगावातून दररोज १५ ते २० ट्रकद्वारे त्या भागात डाळची वाहतूक केली जात असे. मात्र रस्त्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली व जवळपास २०० टन डाळीची वाहतूक थांबली आहे.जळगावात ५० ते ५५ दालमिल असून येथे दररोज ७०० ते ८०० टन कच्चा माल लागतो. आधीच सरकारने एप्रिल महिन्यात कडधान्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याने केवळ १५ टक्केच कच्चा माल विदेशातून आयात करता येत आहे. हे प्रमाण कमी होण्यासह आता औरंगाबाद, लातूर, सिल्लोड या भागातून येणारा हरभरा, तूरही येत नसल्याने त्याचा परिणाम होत आहे. लातूर येथील तूरला अधिक मागणी असल्याने तेथील कच्च्यामालापासून तयार तूर डाळ उत्पादनावरही अधिक भर असतो. मात्र सध्या या तुरीसह कच्चामालही येत नसल्याने दालमिलला दुहेरी फटका बसत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव