शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

रेल्वेच्या हद्दीतील गर्डरसह स्लॅब ओतण्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:16 IST

शिवाजी नगर उड्डाणपूल : तर बांधकाम विभागाचे ५० टक्केच काम पूर्ण जळगाव : शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या ...

शिवाजी नगर उड्डाणपूल : तर बांधकाम विभागाचे ५० टक्केच काम पूर्ण

जळगाव : शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या ठिकाणी रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वेच्या हद्दीतील मुख्य पुलावरील गर्डरसह स्लॅब ओतण्याचेही काम पूर्ण झाले आहे. मात्र, बांधकाम विभागातर्फे सुरू असलेले पुलाच्या उभारणीचे काम दोन वर्षात फक्त ५० टक्केच झाले आहे.

जीर्ण झालेल्या शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारणीचे काम रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू आहे. सध्या पुलाच्या दोन्ही बाजूने पायाभरणीचे व बीम उभारण्याचे काम बांधकाम विभागाने नेमलेल्या मक्तेदारातर्फे पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, सुरुवातीपासूनच या पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने कामाची मुदत संपायला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही पूर्ण झालेले नाही. गेल्या वर्षी कोरोना मुळे हे काम सहा महिने बंद होते. त्यामुळे यंदा फेब्रुवारीमध्ये या कामाची मुदत संपल्यानंतर, पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या हे काम ५० टक्केच पूर्ण झाले असून, मुदतवाढीनंतर येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण होणार का, असा प्रश्न जळगावकरांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो :

रेल्वेच्या हद्दीतील काम पूर्ण

या पुलाच्या ठिकाणी रेल्वेच्या हद्दीतील काम फारसे मोठे नसले तरी, मोठ्या प्रमाणावर अवघड होते. मुख्य रेल्वे लाईनवर हे काम असल्याने अतिशय खबरदारीने हे काम करण्यात येते. यासाठी स्वतः रेल्वेचे अधिकारी कामाच्या ठिकाणी थांबून होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनातर्फे मुख्य लाईनवर हजारो टन क्षमतेचे गर्डरसह स्लॅब ओतण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे रेल्वे उप मुख्य अभियंता पंकज डावरे यांनी सांगितले. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कामाला रेल्वेचा कुठलाही अडथळा येणार नसल्याचे सांगितले.

इन्फो :

तर विद्युत खांबांमुळे पुलाचे बाहेरील काम रखडले

आधीच या-ना त्या कारणामुळे शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या कामाला विलंब होत असून, त्यात गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद जवळील महावितरणचे अडथळा ठरणारे विद्युत खांब अद्याप हटविण्यात आलेले नाहीत. हे खांब हटविण्याबाबत बांधकाम विभागातर्फे अनेकवेळा प्रशासन व महावितरणला पत्र देण्यात आले. मात्र, हटविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यावरून हे काम रखडले आहे. याचा परिणाम बांधकाम विभागाच्या बाहेरील कामावर मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे.