शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

रेल्वेच्या हद्दीतील गर्डरसह स्लॅब ओतण्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:16 IST

शिवाजी नगर उड्डाणपूल : तर बांधकाम विभागाचे ५० टक्केच काम पूर्ण जळगाव : शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या ...

शिवाजी नगर उड्डाणपूल : तर बांधकाम विभागाचे ५० टक्केच काम पूर्ण

जळगाव : शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या ठिकाणी रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वेच्या हद्दीतील मुख्य पुलावरील गर्डरसह स्लॅब ओतण्याचेही काम पूर्ण झाले आहे. मात्र, बांधकाम विभागातर्फे सुरू असलेले पुलाच्या उभारणीचे काम दोन वर्षात फक्त ५० टक्केच झाले आहे.

जीर्ण झालेल्या शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारणीचे काम रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू आहे. सध्या पुलाच्या दोन्ही बाजूने पायाभरणीचे व बीम उभारण्याचे काम बांधकाम विभागाने नेमलेल्या मक्तेदारातर्फे पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, सुरुवातीपासूनच या पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने कामाची मुदत संपायला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही पूर्ण झालेले नाही. गेल्या वर्षी कोरोना मुळे हे काम सहा महिने बंद होते. त्यामुळे यंदा फेब्रुवारीमध्ये या कामाची मुदत संपल्यानंतर, पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या हे काम ५० टक्केच पूर्ण झाले असून, मुदतवाढीनंतर येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण होणार का, असा प्रश्न जळगावकरांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो :

रेल्वेच्या हद्दीतील काम पूर्ण

या पुलाच्या ठिकाणी रेल्वेच्या हद्दीतील काम फारसे मोठे नसले तरी, मोठ्या प्रमाणावर अवघड होते. मुख्य रेल्वे लाईनवर हे काम असल्याने अतिशय खबरदारीने हे काम करण्यात येते. यासाठी स्वतः रेल्वेचे अधिकारी कामाच्या ठिकाणी थांबून होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनातर्फे मुख्य लाईनवर हजारो टन क्षमतेचे गर्डरसह स्लॅब ओतण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे रेल्वे उप मुख्य अभियंता पंकज डावरे यांनी सांगितले. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कामाला रेल्वेचा कुठलाही अडथळा येणार नसल्याचे सांगितले.

इन्फो :

तर विद्युत खांबांमुळे पुलाचे बाहेरील काम रखडले

आधीच या-ना त्या कारणामुळे शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या कामाला विलंब होत असून, त्यात गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद जवळील महावितरणचे अडथळा ठरणारे विद्युत खांब अद्याप हटविण्यात आलेले नाहीत. हे खांब हटविण्याबाबत बांधकाम विभागातर्फे अनेकवेळा प्रशासन व महावितरणला पत्र देण्यात आले. मात्र, हटविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यावरून हे काम रखडले आहे. याचा परिणाम बांधकाम विभागाच्या बाहेरील कामावर मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे.