शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आभाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:45 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात चोपडा येथील शिक्षिका लिहिताहेत...

न कोसळताच पुढे निघून गेलेलं आभाळ फुरगटून बसलेल्या राधेच्या डोळ्यात तरी सापडत असावं का नंतर? काही क्षणापूर्वीच तर पदराचं एक टोक दातात घेतलेल्या राधेच्या तळव्याखाली एकवटले होते सारे ढग.नखाने माती दूर सारण्याचा अवकाश आणि मग सुरू होईल कोसळधार, असं वाटून उगाच घाई केली कृष्णाने हात हातात घेण्याची. तिच्या कानातले डूल उगाच जरा हेलकावले आणि वाऱ्याला मिळाला अवकाश हवं तसं बागडायला.कृष्णाच्या मोरपीसाचे रंग आणि राधेच्या कांकणांच्या काचांचे बिलोरी स्वप्न हे शेवटी एकाच कॅनव्हासवर येणार आहेत हे पावसाला तरी कुठे ठाऊक होतं म्हणा. तो पाच पावलं पुढे जाऊन विसावला जरा आणि इकडे मात्र मनधरणीचा सायंउत्सव सुरू झाला. राधेला पाऊस हवाय आणि मुरलीच्या स्वरात भिजलेला कृष्णही! कृष्णाला राधा हवीय आणि पावसाची तिच्या डोळ्यात उतरलेली रिमझीमही !!एका क्षणी राग विसरून कृष्णाभोवती हात लपेटून उभी असलेली राधा पावसाला इंद्रधनूसारखी वाटली आणि तो परतून आला त्याच्याही नकळत. यमुनेच्या किनारी उमटलेल्या राधा कृष्णाच्या पाऊलखुणा पावसाने ओंजळीत घेतल्या... आणि रानातल्या प्रत्येक पानावर लिहून टाकल्या कायमच्याच !रात्रभर तो हवा तसा कोसळला, हवा तसा बागडला. रामप्रहरी स्वत:च स्वत:ला ऐकत निवांत पहुडलेला पाऊस मात्र दोघांनाही सापडलेला नाही आजवर कधीही ! न कोसळता पुढे निघून गेलेलं आभाळ आणि कोसळूनही हाती न आलेलं आभाळ हे जन्मोजन्मीचं संचित आजही कुठल्याच राधा आणि कृष्णाला चुकलेलं नाहीय म्हणे !-योगिता पाटील, चोपडा

टॅग्स :literatureसाहित्यChopdaचोपडा