शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 20:52 IST

निकृष्ट दर्जाचे काम : चहार्डी येथील साठवण बंधाऱ्याची स्थिती, त्वरित दुरुस्तीची गरज

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील चंपावती नदीवर जलसंधारण व मृदा संधारण विभागातर्फे ५६ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सहा महिन्यांपूर्वी बांधलेल्या या बंधाऱ्याला भिंतींमधूनच गळती लागली आहे.जलसिंचनासह जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, या उद्देशाने हा बंधारा बांधला होता. मात्र, निकृष्ट कामाने त्याचा उपयोग होत नसल्याचे दिसते. नदी पुनरुज्जीवन अंतर्गत तालुक्यात चहार्डी येथील चंपावती (चहार्डी-अकुलखेडा २) नदीवर सिमेंट साठवण बंधारा गेल्या सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आला. बांधकामासाठी तापी नदीची वाळू न वापरता याच नदीतील माती मिश्रीत वाळू वापरण्यात आल्याने या बंधाºयाला गळती लागली आहे. बंधाºयासाठी खर्च झालेले ५६.१७ लाख रुपये पाण्यात जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.याच नदीवर असाच आणि एवढ्याच खर्चाचा दुसरा बंधाराही अकुलखेडा शिवारात बांधण्यात आला आहे. बांधकामावेळी तापी नदीवरील वाळू लिलाव झालेला नव्हता. त्यामुळे कंत्राटदाराने याच नदीतील माती मिश्रीत वाळू वापरली. यामुळेच बंधाºयाला गळती लागली, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.या बंधाºयात यावर्षी पाऊस चांगला झाल्याने व अकुलखेडा येथे हतनूर कालव्याचे आऊटलेट असल्याने हतनूर धरणातून थेट कालव्याद्वारे या नदीत पाणी सोडले जाते. म्हणून पाणी चांगले अडविले गेले असते तर सिंचन होऊन भूगर्भातील पातळी वाढली असती. मात्र आता अडविलेले पाणी गळतीतून वाहून जात असल्याचे दिसत आहे.गेल्या वर्षापर्यंत चहार्डी आणि परिसरातील गावांना भीषण पाणी टंचाई सहन करावी लागली होती. टंचाई निवारण्यासाठी या दोन्ही बंधाऱ्यांमधील अडविलेले पाणी उपयोगात आले असते. त्यामुळे हा बंधारा दुरुस्त होणे गरजेचे आहे.