शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गांभीर्य नसल्याने स्थिती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 11:58 IST

देवेंद्र फडणवीस : कोरोना रुग्णसंख्या व मृत्यू रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची वाढत जाणारी रुग्णसंख्या आणि मृत्यूदर पाहता ही स्थिती काळजी करण्यासारखी असून येथे मोठ्या प्रमाणात तपासण्या (टेस्टिंग) वाढवून उपाययोजनाही वाढविण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील स्थिती पाहून व्यक्त केले. पुरेशा रुग्णवाहिकांची उपलब्धता नसणे, कोरोना रुग्णालयातील उपाययोजनांकडे दुर्लक्ष, टेस्टिंगचे कमी प्रमाण, अहवालाला विलंब अशा बाबींबाबत गांभीर्य नसल्याने येथील स्थिती चिंताजनक होत असल्याची टीकादेखील फडणवीस यांनी या वेळी केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर आले असताना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हे मत व्यक्त केले.मृत्यूवर नियंत्रण शक्यजिल्ह्यात तपासणीचे प्रमाण कमी व त्यात तपासणी अहवालदेखील तीन-चार दिवस येत नाही. त्यामुळे स्वॅब घेतले तरी अहवाल येईपर्यंत लक्षणे वाढत जाऊन प्रकृती खालावत जाते व मृत्यू ओढावतो. त्यामुळे २४ तासात अहवाल येणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. तीन-चार दिवस अहवाल येत नसेल तर हे गंभीर असल्याचे ते म्हणाले.पाहिजे त्या प्रमाणात तपासणी नाही-जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्यासह मृत्यूही मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथे तपासण्याही वाढविणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी या वेळी नमूद केले. येथील तपासण्या पाहता सध्या आयसीएमआरच्या निर्देशानुसार ज्या प्रमाणात टेस्टिंग व्हायला पाहिजे, त्याच्या तुलनेत कमी टेस्टिंग होत असल्याचे फडणवीस यांनी सांगत या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात टेस्टिंग वाढविण्याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या असल्याचे फडणवीस म्हणाले.नातेवाईकांचा वावरही धक्कादायक- कोरोना रुग्णालयात दाखल रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांचाही वावर धक्कादायक प्रकार असल्याचे फडणवीस म्हणाले. रुग्णांजवळ नातेवाईक गेल्यास संसर्ग वाढण्याची भीती असताना असे प्रकार घडणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी आता ‘बेड असिस्टंट’ नियुक्त केले असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले, असे फडणवीस म्हणाले. काही दिवसांपूर्वी येथे डॉक्टर मिळाले, तरीदेखील ही संख्या कमी असून डॉक्टर नियुक्ती बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.स्वपक्षाबाबत बोलणे टाळलेकोरोनाच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर टीका करीत आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात ज्या शहरांमधील महापालिका, नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे, तेथेच कोरोनाचा विस्फोट होऊन तेथे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली असल्याच्या मुद्यावर फडणवीस म्हणाले, कोरोना हा जगाचा प्रश्न असून त्यासाठी पक्ष पाहून आपण राजकारण करीत नाही, असे सांगत स्वपक्षाची सत्ता असलेल्या शहरांबद्दल बोलणे टाळले.‘नॉन कोविड’ रुग्णांची समस्या मोठी... जळगाव जिल्ह्यात कोविड रुग्णांपेक्षा कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांची (नॉन कोविड) समस्या मोठी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. शासकीय रुग्णालय पूर्णपणे कोविड रुग्णालय म्हणून घोषित केल्याने नॉन कोविड रुग्णांचे हाल होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. नॉन कोविड रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याच्याही तक्रारी आल्या असल्याचे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव