शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काटेरी झुडपांनी केल्या साईटपट्ट्या गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:49 IST

रस्ता झाला अरुंद : मैल कामगार नसल्याने उद्भवली स्थिती, वाहनचालकांचा जीव टांगणीला

रावेर : बºहाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावर रावेर ते बºहाणपूर दरम्यान काटेरी बाभळांच्या मोठमोठ्या झुडपांच्या फांद्यांनी साईडपट्टीसह मुळ रस्त्याही व्यापला आहे. यामुळे अरूंद झालेल्या या रस्त्यावर दुतर्फा वाहतूकीतील ओव्हरटेक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे लहान वाहनचालकांचा जीव टांगणीला आहे.या राज्य महामार्गावरील वाढती रहदारी पाहता या राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करून त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गत १० ते १५ वर्षांपासून भिजत घोंगडे पडून आहे. एकंदरित या राज्य महामार्गावरील वाढती रहदारी पाहता या रस्त्याचे रूंदीकरण होणे गरजेचे असताना दोन्ही बाजूच्या साईडपट्टीसह या रस्त्याचा दोन्ही बाजूंचा किनारा काटेरी झुडपांनी व्यापल्याने अरूंद झालेला हा राज्य महामार्ग वाढत्या अपघातातील मृत्यूचा सापळा बनला आहे.या अरूंद झालेल्या राज्य महामार्गावर एका अवजड वाहनाला दुसºया अवजड वाहनाकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला जात असताना समोरून येणारी साधी दुचाकी वा पायी चालणाºयालाही काटेरी झुडपांच्या आक्रमणामुळे खाली साईडपट्टीवर सुरक्षेच्या दृष्टीने उतरणे दुरापास्त ठरत असल्याने वाहनचालकांचा जीव काटेरी झुडूपांत तथा ओव्हरटेक करणाºया अवजड वाहनाखाली टांगणीला घातला आहे.यासंबंधी लोकमत ने अनेकदा ठळक वृत्त प्रसिद्ध करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाले. त्याच अनुषंगाने आमदार शिरीष चौधरी यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे या जटील प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता इम्रान शेख यांनी रस्त्यावरील मैल कामगार बंद करण्यात आल्याने व काटेरी झुडपांची छाटणी करण्यासाठी विशेष तरतूद नसल्यामुळे त्यांचे हात बांधले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.दरम्यान, वाघोड येथील एका पांथस्थांचा मॉर्निंग वॉक दरम्यान तर दुसºयाचा एकापाठोपाठ झालेल्या मोटार वाहन अपघातात दोन बळी गेल्याचे औचित्य साधून रावेर पोलिस स्टेशनतर्फे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला काटेरी झुडपांखालील साईडपट्टी मोकळी करण्याची ताकीद देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासन ढिम्म असल्याने जनसामान्यांमधून कमालीचा तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.आमदार शिरीष चौधरी यांनी जनता दरबारात मांडलेल्या ज्वलंत प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी होत आहे.