शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
5
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
6
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
7
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

काटेरी झुडपांनी केल्या साईटपट्ट्या गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:49 IST

रस्ता झाला अरुंद : मैल कामगार नसल्याने उद्भवली स्थिती, वाहनचालकांचा जीव टांगणीला

रावेर : बºहाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावर रावेर ते बºहाणपूर दरम्यान काटेरी बाभळांच्या मोठमोठ्या झुडपांच्या फांद्यांनी साईडपट्टीसह मुळ रस्त्याही व्यापला आहे. यामुळे अरूंद झालेल्या या रस्त्यावर दुतर्फा वाहतूकीतील ओव्हरटेक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे लहान वाहनचालकांचा जीव टांगणीला आहे.या राज्य महामार्गावरील वाढती रहदारी पाहता या राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करून त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गत १० ते १५ वर्षांपासून भिजत घोंगडे पडून आहे. एकंदरित या राज्य महामार्गावरील वाढती रहदारी पाहता या रस्त्याचे रूंदीकरण होणे गरजेचे असताना दोन्ही बाजूच्या साईडपट्टीसह या रस्त्याचा दोन्ही बाजूंचा किनारा काटेरी झुडपांनी व्यापल्याने अरूंद झालेला हा राज्य महामार्ग वाढत्या अपघातातील मृत्यूचा सापळा बनला आहे.या अरूंद झालेल्या राज्य महामार्गावर एका अवजड वाहनाला दुसºया अवजड वाहनाकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला जात असताना समोरून येणारी साधी दुचाकी वा पायी चालणाºयालाही काटेरी झुडपांच्या आक्रमणामुळे खाली साईडपट्टीवर सुरक्षेच्या दृष्टीने उतरणे दुरापास्त ठरत असल्याने वाहनचालकांचा जीव काटेरी झुडूपांत तथा ओव्हरटेक करणाºया अवजड वाहनाखाली टांगणीला घातला आहे.यासंबंधी लोकमत ने अनेकदा ठळक वृत्त प्रसिद्ध करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाले. त्याच अनुषंगाने आमदार शिरीष चौधरी यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे या जटील प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता इम्रान शेख यांनी रस्त्यावरील मैल कामगार बंद करण्यात आल्याने व काटेरी झुडपांची छाटणी करण्यासाठी विशेष तरतूद नसल्यामुळे त्यांचे हात बांधले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.दरम्यान, वाघोड येथील एका पांथस्थांचा मॉर्निंग वॉक दरम्यान तर दुसºयाचा एकापाठोपाठ झालेल्या मोटार वाहन अपघातात दोन बळी गेल्याचे औचित्य साधून रावेर पोलिस स्टेशनतर्फे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला काटेरी झुडपांखालील साईडपट्टी मोकळी करण्याची ताकीद देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासन ढिम्म असल्याने जनसामान्यांमधून कमालीचा तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.आमदार शिरीष चौधरी यांनी जनता दरबारात मांडलेल्या ज्वलंत प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी होत आहे.