शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

काटेरी झुडपांनी केल्या साईटपट्ट्या गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:49 IST

रस्ता झाला अरुंद : मैल कामगार नसल्याने उद्भवली स्थिती, वाहनचालकांचा जीव टांगणीला

रावेर : बºहाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावर रावेर ते बºहाणपूर दरम्यान काटेरी बाभळांच्या मोठमोठ्या झुडपांच्या फांद्यांनी साईडपट्टीसह मुळ रस्त्याही व्यापला आहे. यामुळे अरूंद झालेल्या या रस्त्यावर दुतर्फा वाहतूकीतील ओव्हरटेक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे लहान वाहनचालकांचा जीव टांगणीला आहे.या राज्य महामार्गावरील वाढती रहदारी पाहता या राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करून त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गत १० ते १५ वर्षांपासून भिजत घोंगडे पडून आहे. एकंदरित या राज्य महामार्गावरील वाढती रहदारी पाहता या रस्त्याचे रूंदीकरण होणे गरजेचे असताना दोन्ही बाजूच्या साईडपट्टीसह या रस्त्याचा दोन्ही बाजूंचा किनारा काटेरी झुडपांनी व्यापल्याने अरूंद झालेला हा राज्य महामार्ग वाढत्या अपघातातील मृत्यूचा सापळा बनला आहे.या अरूंद झालेल्या राज्य महामार्गावर एका अवजड वाहनाला दुसºया अवजड वाहनाकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला जात असताना समोरून येणारी साधी दुचाकी वा पायी चालणाºयालाही काटेरी झुडपांच्या आक्रमणामुळे खाली साईडपट्टीवर सुरक्षेच्या दृष्टीने उतरणे दुरापास्त ठरत असल्याने वाहनचालकांचा जीव काटेरी झुडूपांत तथा ओव्हरटेक करणाºया अवजड वाहनाखाली टांगणीला घातला आहे.यासंबंधी लोकमत ने अनेकदा ठळक वृत्त प्रसिद्ध करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाले. त्याच अनुषंगाने आमदार शिरीष चौधरी यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे या जटील प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता इम्रान शेख यांनी रस्त्यावरील मैल कामगार बंद करण्यात आल्याने व काटेरी झुडपांची छाटणी करण्यासाठी विशेष तरतूद नसल्यामुळे त्यांचे हात बांधले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.दरम्यान, वाघोड येथील एका पांथस्थांचा मॉर्निंग वॉक दरम्यान तर दुसºयाचा एकापाठोपाठ झालेल्या मोटार वाहन अपघातात दोन बळी गेल्याचे औचित्य साधून रावेर पोलिस स्टेशनतर्फे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला काटेरी झुडपांखालील साईडपट्टी मोकळी करण्याची ताकीद देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासन ढिम्म असल्याने जनसामान्यांमधून कमालीचा तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.आमदार शिरीष चौधरी यांनी जनता दरबारात मांडलेल्या ज्वलंत प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी होत आहे.