शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी गळतीला बसणार आळा

By admin | Updated: August 1, 2014 15:21 IST

पाण्याची नासाडी कमी करण्यासाठीच प्रायोगिक तत्त्वावर शहरात २00 ठिकाणी वितरण वाहिन्यांवर वॉटर मीटर बसविण्यास गुरूवारी प्रारंभ झाला.

जळगाव : मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचेपर्यंत त्यातील ४७ टक्के पाणी वाया जात असल्याचा अहवाल सुजल निर्मल अभियानांतर्गत नेमलेल्या नागपूरच्या एडीसीसी इन्फोकॅड प्रा.लि. या मक्तेदार कंपनीने सर्वेक्षणाअंती सादर केला आहे. ही पाण्याची नासाडी कमी करण्यासाठीच या अभियानांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर शहरात २00 ठिकाणी वितरण वाहिन्यांवर वॉटर मीटर बसविण्यास गुरूवारी प्रारंभ झाला. 

२ महिने ठेवणार मीटर
वितरण वाहिन्यांवर शहरातील विविध २00 ठिकाणी वॉटर मीटर बसविण्यास तब्बल १ महिन्याचा कालावधी लागणार आहे. हे मीटर २ महिने ठेवून पाण्याच्या नोंदी घेतल्या जाणार आहे. त्यामुळे मनपा टाकीतून किती पाणी पुरविते व नागरिकांपर्यंत किती पोहोचते? याची आकडेवारी समोर येणार आहे.
अवैध नळकनेक्शनही सापडणार
या प्राथमिक सर्वेक्षणानुसार मनपाकडील २0११-१२ मधील नळजोडणीची अधिकृत संख्या ५९५७७ असताना प्रत्यक्षात ६२ हजार ३५७ नळजोडणी असल्याचे आढळले आहे. त्यापैकी काही नळजोडणी ही या वर्षात झालेली असण्याची शक्यता आहे. त्याची कागदोपत्री पडताळणी केल्यानंतर अवैध नळकनेक्शन कोणते? व किती? याची माहिती उपलब्ध होईल. तसेच एसएमएसद्वारे अवैध नळकनेक्शनबाबत माहिती मागविण्यात येणार आहे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. 
त्यामुळे अवैध नळकनेक्शन धारकांकडून दंड वसूल करून ते नियमित करून घेतले जातील. परिणामी मनपाच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
उत्पन्नात ३१ टक्के नुकसान
गळत्या, यंत्रसामुग्रीची निगा न राखणे, अवैध नळ कनेक्शन, वसुलीत येणारी घट आदी कारणांमुळे मनपाला पाणीपट्टीच्या उत्पन्नात ३१ टक्के नुकसान सोसावे लागत आहे. त्यापैकी बिल तयार करण्यातील नुकसान ४ टक्के आहे. म्हणजेच अवैध नळ कनेक्शनमुळे ४ टक्के बिले दिलीच जात नाहीत. तर वसुलीतील नुकसान २७ टक्के आहे. 
मनपाची पाणीपट्टीची सध्याची एकूण मागणी २३.५0 कोटी असताना एकूण पाणी वितरणावर २६ कोटी रुपये खर्च होत आहे. सुजल निर्मल अभियानांतर्गत ४२ टक्क्यांपैकी किमान ३0 टक्के पाणी गळती रोखण्यात यश येईल. त्यामुळे महसुली खर्च ७ कोटी रुपयांनी कमी होऊन पाणी योजनेचा खर्च केवळ १९ कोटींवर येणार आहे. टाक्यांवर बसविले ३१ मीटर याच अभियानांतर्गत आधी वाघूर धरणातून उपसा करणार्‍या पंपींग स्टेशनपासून ते शहरातील पाण्याच्या टाक्यांदरम्यानची पाणी गळती मोजण्यासाठी पंपींग स्टेशन व टाक्यांवर एकूण ३१ वॉटर मीटर बसविण्यात आले आहेत. तर जलशुद्धीकरण केंद्रावर २ वॉटर मीटर बसविणे बाकी आहे. नासाडीची आकडेवारी ■ धरणातून येणार्‍या रॉ-वॉटरची व एमबीआर टाकीवरून नासाडी- १२ टक्के
■ वितरण वाहिनीवरील नासाडी- ३२.३७ टक्के
■ एकूण पाण्याची नासाडी- ४७ टक्के.
■ एकूण पाणीपट्टीच्या उत्पन्नातील नुकसान- ३१ टक्के.