शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी गळतीला बसणार आळा

By admin | Updated: August 1, 2014 15:21 IST

पाण्याची नासाडी कमी करण्यासाठीच प्रायोगिक तत्त्वावर शहरात २00 ठिकाणी वितरण वाहिन्यांवर वॉटर मीटर बसविण्यास गुरूवारी प्रारंभ झाला.

जळगाव : मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचेपर्यंत त्यातील ४७ टक्के पाणी वाया जात असल्याचा अहवाल सुजल निर्मल अभियानांतर्गत नेमलेल्या नागपूरच्या एडीसीसी इन्फोकॅड प्रा.लि. या मक्तेदार कंपनीने सर्वेक्षणाअंती सादर केला आहे. ही पाण्याची नासाडी कमी करण्यासाठीच या अभियानांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर शहरात २00 ठिकाणी वितरण वाहिन्यांवर वॉटर मीटर बसविण्यास गुरूवारी प्रारंभ झाला. 

२ महिने ठेवणार मीटर
वितरण वाहिन्यांवर शहरातील विविध २00 ठिकाणी वॉटर मीटर बसविण्यास तब्बल १ महिन्याचा कालावधी लागणार आहे. हे मीटर २ महिने ठेवून पाण्याच्या नोंदी घेतल्या जाणार आहे. त्यामुळे मनपा टाकीतून किती पाणी पुरविते व नागरिकांपर्यंत किती पोहोचते? याची आकडेवारी समोर येणार आहे.
अवैध नळकनेक्शनही सापडणार
या प्राथमिक सर्वेक्षणानुसार मनपाकडील २0११-१२ मधील नळजोडणीची अधिकृत संख्या ५९५७७ असताना प्रत्यक्षात ६२ हजार ३५७ नळजोडणी असल्याचे आढळले आहे. त्यापैकी काही नळजोडणी ही या वर्षात झालेली असण्याची शक्यता आहे. त्याची कागदोपत्री पडताळणी केल्यानंतर अवैध नळकनेक्शन कोणते? व किती? याची माहिती उपलब्ध होईल. तसेच एसएमएसद्वारे अवैध नळकनेक्शनबाबत माहिती मागविण्यात येणार आहे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. 
त्यामुळे अवैध नळकनेक्शन धारकांकडून दंड वसूल करून ते नियमित करून घेतले जातील. परिणामी मनपाच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
उत्पन्नात ३१ टक्के नुकसान
गळत्या, यंत्रसामुग्रीची निगा न राखणे, अवैध नळ कनेक्शन, वसुलीत येणारी घट आदी कारणांमुळे मनपाला पाणीपट्टीच्या उत्पन्नात ३१ टक्के नुकसान सोसावे लागत आहे. त्यापैकी बिल तयार करण्यातील नुकसान ४ टक्के आहे. म्हणजेच अवैध नळ कनेक्शनमुळे ४ टक्के बिले दिलीच जात नाहीत. तर वसुलीतील नुकसान २७ टक्के आहे. 
मनपाची पाणीपट्टीची सध्याची एकूण मागणी २३.५0 कोटी असताना एकूण पाणी वितरणावर २६ कोटी रुपये खर्च होत आहे. सुजल निर्मल अभियानांतर्गत ४२ टक्क्यांपैकी किमान ३0 टक्के पाणी गळती रोखण्यात यश येईल. त्यामुळे महसुली खर्च ७ कोटी रुपयांनी कमी होऊन पाणी योजनेचा खर्च केवळ १९ कोटींवर येणार आहे. टाक्यांवर बसविले ३१ मीटर याच अभियानांतर्गत आधी वाघूर धरणातून उपसा करणार्‍या पंपींग स्टेशनपासून ते शहरातील पाण्याच्या टाक्यांदरम्यानची पाणी गळती मोजण्यासाठी पंपींग स्टेशन व टाक्यांवर एकूण ३१ वॉटर मीटर बसविण्यात आले आहेत. तर जलशुद्धीकरण केंद्रावर २ वॉटर मीटर बसविणे बाकी आहे. नासाडीची आकडेवारी ■ धरणातून येणार्‍या रॉ-वॉटरची व एमबीआर टाकीवरून नासाडी- १२ टक्के
■ वितरण वाहिनीवरील नासाडी- ३२.३७ टक्के
■ एकूण पाण्याची नासाडी- ४७ टक्के.
■ एकूण पाणीपट्टीच्या उत्पन्नातील नुकसान- ३१ टक्के.