शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

युद्धाने स्वस्ताईचे स्वप्न भंग, चांदी पुन्हा ७० हजार; सोने ५९ हजारांच्या उंबरठ्यावर

By विजय.सैतवाल | Updated: October 11, 2023 16:05 IST

सोन्याचे भावही ५८ हजार ८०० रुपये प्रति तोळा होऊन ते ५९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

जळगाव : दिवाळीपर्यंत सोने-चांदीचे भाव कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात असताना हमास व इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे स्वस्ताईचे स्वप्न भंगले असून या मौल्यवान धातूंच्या दरात दररोज वाढ होत आहे. बुधावर, ११ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ती पुन्हा ७० हजार रुपये प्रति किलो झाली. सोन्याचे भावही ५८ हजार ८०० रुपये प्रति तोळा होऊन ते ५९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

पितृपक्ष सुरू झाल्यानंतर सोने-चांदीचे भाव कमी होऊ लागले. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती पाहता हे भाव दिवाळीपर्यंत आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. असे असताना मध्येच हमास व इस्त्रायल यांच्यातील युद्ध भडकले व त्याचा मोठा परिणाम होऊ लागला. त्यामुळे गेल्या आठवड्यात कमी होत जाणारे भाव आता पुन्हा वाढू लागले आहे.

१० दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात एकाच दिवसात ८०० रुपयांची घसरण झाली व तेव्हापासून त्याचे भाव कमी होत जाऊन ५७ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत खाली आले होते. मात्र हे युद्ध भडकले आणि पुन्हा भाववाढ होण्यास सुरुवात झाली. त्यानुसार ६ ऑक्टोबर रोजी ५८ हजार ६०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ७ रोजी ३०० रुपयांची, ८ रोजी ६०० रुपयांची वाढ झाली. १० व ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा भाववाढ होऊन सोने ५८ हजार ८०० रुपये प्रति तोळा झाले.

पाच दिवसात चांदी २१०० रुपयांनी वधारली

सोन्यासोबतच चांदीच्याही भावात वाढ होत आहे. ६ ऑक्टोबर रोजी ६७ हजार ९०० रुपये प्रति किलोवर असलेल्या चांदीच्या भावात ७ रोजी एकाच दिवसात एक हजार ६०० रुपयांची वाढ होऊन ती ६९ हजार ५०० रुपये प्रति किलो झाली. ९ ऑक्टोबर रोजी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली. १० रोजी ३०० रुपयांची घसरण झाली मात्र ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. पाच दिवसात चांदीत दोन हजार १०० रुपयांची वाढ झाली आहे.

६० हजारांच्या पुढे जाणार सोने

गेल्या १० दिवसांपूर्वी काही दिवस सोने-चांदीचे भाव कमी झाले होते. मात्र हमास व इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे हे भाव पुन्हा वाढू लागले आहे. दिवाळीपर्यंत सोने ६० हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकते.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सुवर्ण बाजार असोसिएशन.

टॅग्स :GoldसोनंSilverचांदी