शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

तापीचा रावेर तालुक्यातील सहा गावांना वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:35 IST

  भुसावळ/रावेर/ऐनपूर/वरणगाव : तापी नदीला आलेल्या महापूराने रूद्रावतार धारण केला असून बºहाणूपर शहरालगतच्या इंदूर - अमरावती महामार्गावरील जुन्या पुलावरून ...

 

भुसावळ/रावेर/ऐनपूर/वरणगाव : तापी नदीला आलेल्या महापूराने रूद्रावतार धारण केला असून बºहाणूपर शहरालगतच्या इंदूर - अमरावती महामार्गावरील जुन्या पुलावरून पुराचे पाणी जात होते. परिणामत: तालूक्यातील तापी नदी काठच्या नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर गावांचे रस्ते व पुलांवर या धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी शिरून परिसराला वेढा पडल्याने या सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांनी महापूराच्या प्रभावित गावांना भेटी देऊन नदीकाठालगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून संबंधित तलाठी व ग्रामसेवक तथा मंडळाधिकारी यांना मुख्यालयावर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आल्याने भुसावळ परिसरातही नदी पात्रात प्रचंड प्रवाह दिसत आहे.रावेरसह तापी काठच्या गावांना रविवारी रात्री तसेच सोमवारी पाऊस सुरू होता. रावेर तालूक्यात रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने सोमवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत व पुन्हा सायंकाळी झडी सुरूच होती. रावेर तालूक्यात सरासरी ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली.तापी-पूर्णाला पूरतापी व पुर्णा नदीच्या उगमस्थानाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी पहाटे ८ वाजता व त्यानंतर ६४० मि. मी. पावसाची नोंद झाल्याने तापी नदीला महापूर आला. बºहाणपूर इंदूर, अमरावती महामार्गावरील जून्या पुलावरून सुमारे दोन ते तीन पुरूष वरून पाणी वाहत होते.सहा गावांना वेढाया पुरामुळे रावेर तालूक्यातील नेहता, खिरवड, निंभोरासीम,विटवे, निंबोल, ऐनपूर या सहा गावांना तापी नदीतील महापूराच्या बॅकवॉटरचा वेढा पडला असून रावेरशी संपर्क तुटला आहे.हतनूरचे ४१ दरवाजे उघडले४हतनूर धरणाची पुर्ण ४१ दरवाजे उघडून २ लाख १८ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होवूनही तापीच्या महापूराचा रूद्रावतार रात्री उशिरापर्यंत कायम राहण्याची शक्यता हतनूर प्रकल्पाचे उप कार्यकारी अभियंता एम. पी. महाजन यांनी व्यक्त केली. दरम्यान, तापी नदीच्या महापूरातील बॅकवॉटरखाली नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर शिवारातील सुमारे २०० हेक्टर शेतजमीनीतील खरीपाची व बागायती केळी तथा फळबागा बुडाल्याने शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे.काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा४तापी नदीकाठच्या बाधित गावातील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासारखी बिकट परिस्थिती नसली तरी संबंधित रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून तलाठी व ग्रामसेवक यांना मुख्यालयावर हजर राहण्याची सक्त ताकीद तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांनी दिली आहे.४तापी नदीला मोठा पूर आल्याने भुसावळ परिसरातही काही गावांना सतर्कतेच्या सूचना आहेत. हा पूर पहाण्यासाठीं रावेरकडे जाणाºया पुलावर भुसावळकरांची गर्दी झाल्याचे दिसत होते.