शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

तापीचा रावेर तालुक्यातील सहा गावांना वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:35 IST

  भुसावळ/रावेर/ऐनपूर/वरणगाव : तापी नदीला आलेल्या महापूराने रूद्रावतार धारण केला असून बºहाणूपर शहरालगतच्या इंदूर - अमरावती महामार्गावरील जुन्या पुलावरून ...

 

भुसावळ/रावेर/ऐनपूर/वरणगाव : तापी नदीला आलेल्या महापूराने रूद्रावतार धारण केला असून बºहाणूपर शहरालगतच्या इंदूर - अमरावती महामार्गावरील जुन्या पुलावरून पुराचे पाणी जात होते. परिणामत: तालूक्यातील तापी नदी काठच्या नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर गावांचे रस्ते व पुलांवर या धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी शिरून परिसराला वेढा पडल्याने या सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांनी महापूराच्या प्रभावित गावांना भेटी देऊन नदीकाठालगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून संबंधित तलाठी व ग्रामसेवक तथा मंडळाधिकारी यांना मुख्यालयावर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आल्याने भुसावळ परिसरातही नदी पात्रात प्रचंड प्रवाह दिसत आहे.रावेरसह तापी काठच्या गावांना रविवारी रात्री तसेच सोमवारी पाऊस सुरू होता. रावेर तालूक्यात रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने सोमवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत व पुन्हा सायंकाळी झडी सुरूच होती. रावेर तालूक्यात सरासरी ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली.तापी-पूर्णाला पूरतापी व पुर्णा नदीच्या उगमस्थानाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी पहाटे ८ वाजता व त्यानंतर ६४० मि. मी. पावसाची नोंद झाल्याने तापी नदीला महापूर आला. बºहाणपूर इंदूर, अमरावती महामार्गावरील जून्या पुलावरून सुमारे दोन ते तीन पुरूष वरून पाणी वाहत होते.सहा गावांना वेढाया पुरामुळे रावेर तालूक्यातील नेहता, खिरवड, निंभोरासीम,विटवे, निंबोल, ऐनपूर या सहा गावांना तापी नदीतील महापूराच्या बॅकवॉटरचा वेढा पडला असून रावेरशी संपर्क तुटला आहे.हतनूरचे ४१ दरवाजे उघडले४हतनूर धरणाची पुर्ण ४१ दरवाजे उघडून २ लाख १८ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होवूनही तापीच्या महापूराचा रूद्रावतार रात्री उशिरापर्यंत कायम राहण्याची शक्यता हतनूर प्रकल्पाचे उप कार्यकारी अभियंता एम. पी. महाजन यांनी व्यक्त केली. दरम्यान, तापी नदीच्या महापूरातील बॅकवॉटरखाली नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर शिवारातील सुमारे २०० हेक्टर शेतजमीनीतील खरीपाची व बागायती केळी तथा फळबागा बुडाल्याने शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे.काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा४तापी नदीकाठच्या बाधित गावातील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासारखी बिकट परिस्थिती नसली तरी संबंधित रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून तलाठी व ग्रामसेवक यांना मुख्यालयावर हजर राहण्याची सक्त ताकीद तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांनी दिली आहे.४तापी नदीला मोठा पूर आल्याने भुसावळ परिसरातही काही गावांना सतर्कतेच्या सूचना आहेत. हा पूर पहाण्यासाठीं रावेरकडे जाणाºया पुलावर भुसावळकरांची गर्दी झाल्याचे दिसत होते.