शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

गुरुंच्या संस्कार शिदोरीनेच गाठला यशाचा टप्पा - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:39 IST

शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणारे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आयुष्याला आकार देणारे कोण आहेत ते गुरु ?

जळगाव : मातृदेव, पितृदेवसोबतच ‘गुरुदेव’लादेखील प्रत्येकाच्या आयुष्यात सारखेच महत्त्व असते. त्यानुसार माझ्याही आयुष्यात आई-वडील या पहिल्या गुरुंप्रमाणे मला घडविणाऱ्या गुरुंनाही अनन्य महत्त्व आहे. शाळा, महाविद्यालयात संस्कारक्षम शिक्षक मिळाल्यास आदर्श विद्यार्थी घडतात आणि जे मुले शिक्षकांचे ऐकूण अभ्यास करतात, ते हमखास यशस्वी होतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यातीलच उदाहरण म्हणजे मी सुद्धा आहे. माझ्या गुरुंकडून मिळालेल्या संस्काराच्या शिदोरीनेच मी यशाचा टप्पा गाठू शकलो, असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षक दिनानिमित्त सांगत आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.अहमदनगर जिल्ह्यातील जवळवाडी, ता. पाथर्डी येथे प्राथमिक तर पाथर्डी येथे माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरविल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्या सर्व शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांकडून अनेक मोलाचे सल्ले मिळाले. आजही गावाकडे गेलो तर शिक्षकांना आवर्जून भेटतो. शालेय जीवनाचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्यानंतर मुंबई येथे पशू वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण झाले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि त्यात यशस्वीही झालो. तेथून थेट प्रशासकीय सेवेकडे वळलो. या सर्वांमध्ये मला मार्गदर्शन मिळाले ते अर्थातच सर्व गुरुजनांचे. आज शिक्षक दिनी सर्व गुरुजनांना वंदन...!२९ वर्षांनंतरही गुरुंविषयी तेच प्रेम, तोच जिव्हाळामुंबई येथे पशू वैद्यकीय महाविद्यालयात लाभलेले शिक्षक आज योगायोगाने मी जेथे नोकरी करीत आहे, त्याच शहरात अर्थात जळगावात वास्तव्याला आहे. ते शिक्षक आहेत, डॉ. एम.बी. पाटील. महाविद्यालय सोडून २९ वर्षे झाली तरी आजही या गुरुंविषयी तोच जिव्हाळा असून तेच प्रेम कायम आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आजच त्यांना भेटून आलो. त्यांच्याकडूनही तेच प्रेम मिळाले.शिक्षकांकडून मिळालेल्या प्रेरणेने प्रशासकीय सेवेतशाळेत असल्यापासून इतिहास, नागरिकशास्त्र व भूगोल हे माझे आवडीचे विषय. साहजिक आवडीच्या विषयांचे शिक्षकही आवडीचे शिक्षक ठरतात. सोबतच इतरही शिक्षक माझे आवडीचे आहे. कारण शाळेपासून शिस्त मोडणे मला आवडलेच नाही, त्यामुळे सर्वच शिक्षकांचा मी लाडका विद्यार्थी होतो. या सर्वांकडून तसेच आई-वडिलांकडून मला प्रेरणा मिळाली आणि मी प्रशासकीय सेवेत येऊ शकलो.शाळेत टोपी विरुद्धच्या आंदोलनाना केला विरोधप्रार्थनेच्यावेळी शाळेत गांधी टोपी घालणे सक्तीचे होते. त्याला अनेक विद्यार्थ्यांचा विरोध होता. त्यामुळे एकदा सर्व विद्यार्थ्यांनी गांधी टोपीविरोधात आंदोलन करीत या टोपीच्या वापरास विरोध केला. त्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बोलविले व समजूत काढली. त्या वेळी काही विद्यार्थ्यांनी ऐकले काहींनी ऐकले नाही. त्या वेळी मीदेखील विद्यार्थ्यांना आंदोलन न करण्याचे सूचविले व हा शालेय शिस्तीचा एक भाग असल्याचे सांगितले.जळगाव जिल्हाधिकारी म्हणून ११ फेब्रुवारी २०१९ पासून रुजू झाले आहेत.शिक्षकाविना यशाचा टप्पा अशक्य

टॅग्स :Jalgaonजळगाव