शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

ऐसी यासी शरण जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:21 IST

भगवंताच्या भक्तीचे महात्म्य

साधावया भक्ती काज । नाही लाज धरितऐसी यासी शरण जावे । शक्ती जीवे न वंचीभिष्मापण केला खरा । धनुर्धरा राशीलेतुका म्हणे साक्ष हाती । तो म्या चित्ती धरिलाया अभंगात तुकाराम महाराज भगवंताच्या भक्तीचे महात्म्य सांगतात.भगवंत आपल्या भक्ताच्या कार्यासाठी कधीच लाज धरीत नाही म्हणून आपण त्यास शरण जावून आपली शक्ती त्यांच्या पायावर अर्पण करावी ती इतरत्र वाया घालू नये. यासाठी तुकाराम महाराज भिष्मांचे उदाहरण देवून सांगतात की, एकीकडे अर्जुनाला पण वाचवले व दुसरीकडे भिष्मांची प्रतिज्ञा पूर्ण केली. चोखोबा वारीला गेले. पण पत्नीच्या बाळंतपणासाठी ते बहिणीला पाठवायचे विसरले. मग इकडे वेदना सुरू झाल्या आणि मग तोे चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हाका मारी....अक्षरश: महिनाभर चोखोबांच्या पण बाळंतपणापासून ते सर्व सेवा केली ती एकरूप होवूनच. असा हा देव भक्तासाठी झाला व कार्य केले. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की देव लाज धरीत नाही.साधावया भक्तीकाजनाही लाज धरित ...दुसरे उदाहरण म्हणजे अर्जुनासाठी सुभद्रा झाला. नंतर प्रल्हादासाठी नरसिंह, ब्रह्मासाठी वराह रुप असे अनेक उदाहरण सांगता येतील. सर्वांची भक्तीपण तशीच होती. म्हणून ‘ऐसा भक्ताचा अंकित’ आहे. पांडुरंगाला माझ्या अंत:करणात धरीले.तुकाराम महाराज सांगतात की, विठ्ठल हा भक्ताच्या कार्यासाठी लाज धरत नाही. पण त्यासाठी भक्त ही कसा असावा.भक्त ऐसे जाणा जे देही उदास... एकदा पंढरीच्या वारीचे दिवस आले आणि चोखोबा वारीसाठी तळमळ करू लागणे. पण घरी पत्नी गर्भवती मग काय करावे. वारी चुकायला नकोशेवटी पत्नी म्हणाली, ‘रस्त्यात तुमच्या बहिणीचे घर लागते, त्यांना द्या की माझ्याकडे पाठवून आणि आपण जा वारीला, वारी नका चुकवू ’ त्यासाठी आपण त्याला शरण गेले पाहिजे. लाखो वारकरी जेव्हा वारीत ‘ज्ञानबा तुकाराम’ या जयघोष करत चालतात तेव्हा त्यांची चिंता तोच हरण करतो.-मनोज महाराज कुलकर्णी, पिंप्राळा.

टॅग्स :Jalgaonजळगाव