शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महात्मा गांधी मार्केट मधील दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा प्रशासनाकडून गाळेधारकांनी केलेल्या आंदोलनाला केराची टोपली दाखवत अखेर गाळे सील करण्याच्या कारवाईला सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपा प्रशासनाकडून गाळेधारकांनी केलेल्या आंदोलनाला केराची टोपली दाखवत अखेर गाळे सील करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. मंगळवारी महात्मा फुले मार्केट मधील एक दुकान मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांनी सील केले आहे. महापालिकेचे पथक गांधी मार्केट मध्ये पोहोचल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. मनपाने गाळे सील करण्याची कारवाई सुरु केल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी लवकरात लवकर थकीत भाड्याची रक्कम भरली जाईल असे सांगितल्यानंतर महापालिकेने तूर्तास कारवाई थांबवली आहे.

महापालिका प्रशासनाने गेल्या महिन्यात महापालिकेच्या मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळेधारकांना नोटिसा बजावून नुकसानभरपाईची रक्कम भरण्याची सूचना दिली होती. त्यानंतर गाळेधारकांनी मनपाच्या या निर्णयाविरोधात तीन दिवस संप पुकारला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गाळेधारकांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे महापालिका प्रशासनाने देखील कारवाई थांबवली होती. मात्र प्रशासनाने आता पुन्हा कारवाईस सुरुवात केली असून, गाळेधारकांना थकीत भाड्यासह नुकसान भरपाईची रक्कम देखील भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी सकाळी अकरा वाजता महापालिका उपायुक्त प्रशांत पाटील यांचा पथकाकडून महात्मा फुले मार्केटमधील गाळे सील करण्यात आले आहे.

वसुलीवर परिणाम झाल्याने महापालिका आक्रमक

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. अजून काही दिवस शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास गेल्या वर्षाप्रमाणे मालमत्ता कराची वसुली थकीत राहण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने इतर उत्पन्नातून वसुली करण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच मुदत संपलेल्या गाळेधारकांकडून काही रक्कम वसूल करण्यात यावी यासाठी मनपाने आता आक्रमकपणे गाळे सील करण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.

गाळे धोरणाचा प्रस्ताव अजूनही पडूनच

महापालिकेच्या मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळेधारकांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. तसेच हा प्रस्ताव महासभेत आणून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा यासाठी तयारी केली होती. मात्र तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाचा हा प्रस्ताव महासभेत आणला नाही. मात्र आता महापालिका प्रशासनाने या प्रस्तावावर निर्णय घेण्याच्या आधीच कारवाईला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन गाळेधारकांना दिले होते. मात्र याकडेही दुर्लक्ष करून मनपा प्रशासनाने नुकसान भरपाई थकवणाऱ्या गाळेधारकांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.