शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, जळगाव जिल्ह्यात दर दोन दिवसाला तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:59 IST

ब्लॅकस्पॉटवर उपाययोजनाच नाही, सर्वाधिक अपघात पारोळा ते नशिराबाद दरम्यान

सुनील पाटीलजळगाव : जळगाव जिल्ह्यात अपघातांची संख्या भयंकर वाढत चालली असून सरासरी दिवसाला तीन अपघात होत आहेत तर दोन दिवसात तीन जणांचा या अपघातात बळी जात आहे. एका दिवसाला अडीच व्यक्ती जखमी होत आहेत. सर्वाधिक अपघात हे राष्टÑीय महामार्गावर पारोळा ते नशिराबाद या दरम्यान होत आहेत. याच महामार्गावर शहरातील खोटे नगर परिसर व नशिराबादनजीकचा तरसोद फाटा हे दोन ब्लॅक स्पॉट प्रशासनाने जाहीर केलेले आहेत. जिल्ह्यात मागील वर्षभरात ८३५ अपघात झाले तर त्यात ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे.ज्या जागेवर पाच किंवा त्यापेक्षा जास्त अपघात व तीन जणांचा मृत्यू झाला असेल तर तो ब्लॅक स्पॉट समजला जातो. आरटीओ, पोलीस व बांधकाम विभागाच्या संयुक्त समितीने पाच वर्षापूर्वी ब्लॅक स्पॉट निश्चित केले होते. चाळीसगावजवळ मेहुणबारे रस्ता हा एक ब्लॅक स्पॉट जाहीर झाला आहे.पाच वर्षापूवीर् म्हणजे २०१५ मध्ये जिल्ह्यात ९०० अपघात झाले होते, त्यात ४६८ जणांचा मृत्यू झाला होता तर १५०८ जण जखमी झाले होते. त्यानंतर अपघाताची संख्या व ठार झालेल्यांची संख्या आणखीनच वाढली, शिवाय सातत्याने अपघात होण्याच्या ठिकाणातही वाढ झाली आहे. अपघाताची कारणे काहीही असली तरी त्यात जीव जाणाऱ्या व्यक्तींची संख्या नक्कीच चिंताजनक आहे.२०१९ या वर्षात सर्वाधिक २ हजार ८५६ अपघात हे मुंबईत झाले असून त्यात ४०५ जण ठार झाले आहेत. सर्वात जास्त ८७३ जण औरंगाबाद जिल्ह्यात तर त्याखालोखाल ८५५ जण पुणे जिल्ह्यात ठार झाले आहेत. नाशिक जिल्हा राज्यात तिसºया क्रमांकावर असून तेथे ७८३ जण ठार झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात १ हजार ६५ अपघातात ५३१ जण ठार झाले आहेत. जळगाव जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात ८३५ अपघातात ४५४ जण ठार झाले आहेत. २०१८ या वर्षात राज्यात ३५ हजार ७१७ अपघात झाले होते, त्यात १३ हजार २६१ जणांचा मृत्यू तर ३१ हजार २६५ जण जखमी झाले होते.ठार झालेल्यांमध्ये तरुणांचीच सर्वाधिक संख्याआतापर्यंतच्या अपघातात ४० वर्षाच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. घरातील तरुण कर्ता पुरुषच या अपघातात ठार झाल्याची आकडेवारी आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत. समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागणेही त्याला कारण कारणीभूत आहे. यातील काही बळी हे खड्डे, साईडपट्ट्या तर काही अवजड वाहनांच्या धडकेने झाले आहेत.हे आहेत ब्लॅक स्पॉट१) गुजराल पेट्रोल पंप ते इच्छादेवी चौक२) टीव्ही टॉवर ते नशिराबाद३) खडकी फाटा ते चिंचगव्हाण(ता. चाळीसगाव)राज्यात वर्षभरात १२ हजार ५६५ जणांचा मृत्यराज्यात जानेवारी ते डिसेंबर २०१९ या एक वर्षाच्या कालावधीत ३२ हजार ८७६ रस्ते अपघात झाले, त्यात १२ हजार ५६५ जणांचा मृत्यू झाला असून २८ हजार ९८९ जण गंभीर जखमी झाले आहेत. एकट्या जळगाव जिल्ह्यात ८३५ अपघात झाले तर त्यात ४५४ जण ठार झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दरवर्षी अपघातात १० टक्के घट होणे अपेक्षित आहे, राज्यात ८ तर जिल्ह्यात ९ टक्के घट झाली आहे.अपघाताची वाढती संख्या लक्षात घेता चालकांनीच स्वत:साठी नियमांची शिस्त लावावी. पोलीस व इतर विभाग आपले काम करीत राहतील. आपला स्वत:चा जीव व आपल्यावर अवलंबून राहणारे कुटुंब याची जान ठेवून आपणच काळजी घेतली पाहिजे.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षकू

टॅग्स :Jalgaonजळगाव