शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, जळगाव जिल्ह्यात दर दोन दिवसाला तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:59 IST

ब्लॅकस्पॉटवर उपाययोजनाच नाही, सर्वाधिक अपघात पारोळा ते नशिराबाद दरम्यान

सुनील पाटीलजळगाव : जळगाव जिल्ह्यात अपघातांची संख्या भयंकर वाढत चालली असून सरासरी दिवसाला तीन अपघात होत आहेत तर दोन दिवसात तीन जणांचा या अपघातात बळी जात आहे. एका दिवसाला अडीच व्यक्ती जखमी होत आहेत. सर्वाधिक अपघात हे राष्टÑीय महामार्गावर पारोळा ते नशिराबाद या दरम्यान होत आहेत. याच महामार्गावर शहरातील खोटे नगर परिसर व नशिराबादनजीकचा तरसोद फाटा हे दोन ब्लॅक स्पॉट प्रशासनाने जाहीर केलेले आहेत. जिल्ह्यात मागील वर्षभरात ८३५ अपघात झाले तर त्यात ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे.ज्या जागेवर पाच किंवा त्यापेक्षा जास्त अपघात व तीन जणांचा मृत्यू झाला असेल तर तो ब्लॅक स्पॉट समजला जातो. आरटीओ, पोलीस व बांधकाम विभागाच्या संयुक्त समितीने पाच वर्षापूर्वी ब्लॅक स्पॉट निश्चित केले होते. चाळीसगावजवळ मेहुणबारे रस्ता हा एक ब्लॅक स्पॉट जाहीर झाला आहे.पाच वर्षापूवीर् म्हणजे २०१५ मध्ये जिल्ह्यात ९०० अपघात झाले होते, त्यात ४६८ जणांचा मृत्यू झाला होता तर १५०८ जण जखमी झाले होते. त्यानंतर अपघाताची संख्या व ठार झालेल्यांची संख्या आणखीनच वाढली, शिवाय सातत्याने अपघात होण्याच्या ठिकाणातही वाढ झाली आहे. अपघाताची कारणे काहीही असली तरी त्यात जीव जाणाऱ्या व्यक्तींची संख्या नक्कीच चिंताजनक आहे.२०१९ या वर्षात सर्वाधिक २ हजार ८५६ अपघात हे मुंबईत झाले असून त्यात ४०५ जण ठार झाले आहेत. सर्वात जास्त ८७३ जण औरंगाबाद जिल्ह्यात तर त्याखालोखाल ८५५ जण पुणे जिल्ह्यात ठार झाले आहेत. नाशिक जिल्हा राज्यात तिसºया क्रमांकावर असून तेथे ७८३ जण ठार झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात १ हजार ६५ अपघातात ५३१ जण ठार झाले आहेत. जळगाव जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात ८३५ अपघातात ४५४ जण ठार झाले आहेत. २०१८ या वर्षात राज्यात ३५ हजार ७१७ अपघात झाले होते, त्यात १३ हजार २६१ जणांचा मृत्यू तर ३१ हजार २६५ जण जखमी झाले होते.ठार झालेल्यांमध्ये तरुणांचीच सर्वाधिक संख्याआतापर्यंतच्या अपघातात ४० वर्षाच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. घरातील तरुण कर्ता पुरुषच या अपघातात ठार झाल्याची आकडेवारी आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत. समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागणेही त्याला कारण कारणीभूत आहे. यातील काही बळी हे खड्डे, साईडपट्ट्या तर काही अवजड वाहनांच्या धडकेने झाले आहेत.हे आहेत ब्लॅक स्पॉट१) गुजराल पेट्रोल पंप ते इच्छादेवी चौक२) टीव्ही टॉवर ते नशिराबाद३) खडकी फाटा ते चिंचगव्हाण(ता. चाळीसगाव)राज्यात वर्षभरात १२ हजार ५६५ जणांचा मृत्यराज्यात जानेवारी ते डिसेंबर २०१९ या एक वर्षाच्या कालावधीत ३२ हजार ८७६ रस्ते अपघात झाले, त्यात १२ हजार ५६५ जणांचा मृत्यू झाला असून २८ हजार ९८९ जण गंभीर जखमी झाले आहेत. एकट्या जळगाव जिल्ह्यात ८३५ अपघात झाले तर त्यात ४५४ जण ठार झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दरवर्षी अपघातात १० टक्के घट होणे अपेक्षित आहे, राज्यात ८ तर जिल्ह्यात ९ टक्के घट झाली आहे.अपघाताची वाढती संख्या लक्षात घेता चालकांनीच स्वत:साठी नियमांची शिस्त लावावी. पोलीस व इतर विभाग आपले काम करीत राहतील. आपला स्वत:चा जीव व आपल्यावर अवलंबून राहणारे कुटुंब याची जान ठेवून आपणच काळजी घेतली पाहिजे.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षकू

टॅग्स :Jalgaonजळगाव