शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

धक्कादायक..फळ्यावर उत्तरे लिहून दिली जातेय संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 21:55 IST

महाराष्ट राज्य विद्या प्राधिकरण पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेची उत्तरे चक्कशिक्षकांकडूनच वर्गातील फळ्यावर लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये सुरु असल्याच ेआहे.

ठळक मुद्दे शिक्षणाचा खेळखंडोबा गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची धडपडसोयीनुसार घेतल्या जात आहेत परीक्षा

आॅनलाईन लोकमत

जळगाव-दि.१०-महाराष्ट राज्य विद्या प्राधिकरण पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेची उत्तरे चक्कशिक्षकांकडूनच वर्गातील फळ्यावर लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये सुरु असल्याच ेआहे.

 शाळेच्या निकालावरुन गुणवत्ता सिद्ध होणार असल्याने हा‘उद्योग’सुरु आहे. त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याची नाराजी सुज्ञ नागरिकाकडून व्यक्त होत आहे.

८ नोव्हेंबरपासून या परीक्षा घेण्यात येत असून, जिल्'ातील५ लाख ६२ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यासाठी विद्यार्थी प्राधिकरणाकडून जिल्'ातील प्रत्येक शाळेत परीक्षेआधी  प्रश्नपत्रिका पोहचविण्यात आल्या होत्या. मात्र परीक्षा सुरु झाल्यानंतर काही शाळांमध्ये शिक्षक सर्व उत्तरे थेट फळ्यावर लिहून देतआहेत. प्रगत शैक्षणिक अभ्यासक्रमाव्दारे विद्यार्थ्यांना प्रगत बनविण्याचे धोरण शासनाने अवलंबिले असताना एकीकडे विद्यार्थ्यांना सर्व उत्तरे लिहूनदिली जात असल्याने संकलित चाचणी परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

विद्यार्थ्यांना ७० टक्के गुण मिळविणे आवश्यकसंकलित चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांना ७० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. शाळेच्या निकालावरुन शाळेची गुणवत्ता सिध्द होणार असल्याने, विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे शिक्षकांकडून दिली जात आहे. शाळेची गुणवत्ता कशाप्रकारे कायम राहिल यासाठीच शिक्षकांचा खटाटोप सुरु आहे. तसेच अनेक शिक्षकांना संकलित चाचणीबाबतचे मूल्यांकन कसे राहिल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे थेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका शिक्षकांकडूनच सोडविल्या जात आहेत.

सोयीनुसार घेतल्या जात आहेत परीक्षा८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान या परीक्षा घेतल्या जात आहेत. परीक्षांसाठी सकाळी ११ ते दुपारी१ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र अनेक शाळांमध्ये या परीक्षा आपल्या सोयीनुसार घेतल्या जात आहेत. काही शाळांमध्ये या परीक्षा सकाळी ७.३० वाजता तर काही शाळांमध्ये दुपारी १२ वाजता देखील घेतल्या जात आहेत. मात्र याबाबत शिक्षण विभागाचे कुठलेही नियंत्रण दिसून येत नाही. शिक्षण विभागाकडून संपर्क अधिकाºयांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीकडून देखील कोणतीही कारवाई याबाबत होताना दिसत नाही.

प्रश्नपत्रिका पोहचविण्यासही आकारले पैसेगेल्या आठ दिवसांपूर्वी संकलित कल चाचणीच्या प्रश्नपत्रिका या जि.प.शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. तर या ठिकाणाहून सर्व तालुक्याचा ठिकाणी प्रश्नपत्रिका पोहचविण्यात आल्या. शाळांपर्यंत या प्रश्नपत्रिका पोहचविण्यासाठी मुख्याध्यापकांकडून २०० ते ५०० रुपये घेण्यात आल्याची माहिती काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी दिली. ज्या उद्देशासाठी संकलित चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. तो उद्देश साध्य होताना दिसत नाही.

कोटसंकलित कल चाचणी परीक्षा सुरळीत व पारदर्शक पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाकडून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. शाळांमध्ये भेटी देखील देण्यात आल्या. मात्र जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत फळ्यावर उत्तरे लिहिली जात असल्याचे आढळून आलेले नाही.-बी.जे.पाटील,शिक्षणाधिकारी, जि.प.प्राथमिक विभाग