शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धक्कादायक..फळ्यावर उत्तरे लिहून दिली जातेय संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 21:55 IST

महाराष्ट राज्य विद्या प्राधिकरण पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेची उत्तरे चक्कशिक्षकांकडूनच वर्गातील फळ्यावर लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये सुरु असल्याच ेआहे.

ठळक मुद्दे शिक्षणाचा खेळखंडोबा गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची धडपडसोयीनुसार घेतल्या जात आहेत परीक्षा

आॅनलाईन लोकमत

जळगाव-दि.१०-महाराष्ट राज्य विद्या प्राधिकरण पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेची उत्तरे चक्कशिक्षकांकडूनच वर्गातील फळ्यावर लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये सुरु असल्याच ेआहे.

 शाळेच्या निकालावरुन गुणवत्ता सिद्ध होणार असल्याने हा‘उद्योग’सुरु आहे. त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याची नाराजी सुज्ञ नागरिकाकडून व्यक्त होत आहे.

८ नोव्हेंबरपासून या परीक्षा घेण्यात येत असून, जिल्'ातील५ लाख ६२ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यासाठी विद्यार्थी प्राधिकरणाकडून जिल्'ातील प्रत्येक शाळेत परीक्षेआधी  प्रश्नपत्रिका पोहचविण्यात आल्या होत्या. मात्र परीक्षा सुरु झाल्यानंतर काही शाळांमध्ये शिक्षक सर्व उत्तरे थेट फळ्यावर लिहून देतआहेत. प्रगत शैक्षणिक अभ्यासक्रमाव्दारे विद्यार्थ्यांना प्रगत बनविण्याचे धोरण शासनाने अवलंबिले असताना एकीकडे विद्यार्थ्यांना सर्व उत्तरे लिहूनदिली जात असल्याने संकलित चाचणी परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

विद्यार्थ्यांना ७० टक्के गुण मिळविणे आवश्यकसंकलित चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांना ७० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. शाळेच्या निकालावरुन शाळेची गुणवत्ता सिध्द होणार असल्याने, विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे शिक्षकांकडून दिली जात आहे. शाळेची गुणवत्ता कशाप्रकारे कायम राहिल यासाठीच शिक्षकांचा खटाटोप सुरु आहे. तसेच अनेक शिक्षकांना संकलित चाचणीबाबतचे मूल्यांकन कसे राहिल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे थेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका शिक्षकांकडूनच सोडविल्या जात आहेत.

सोयीनुसार घेतल्या जात आहेत परीक्षा८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान या परीक्षा घेतल्या जात आहेत. परीक्षांसाठी सकाळी ११ ते दुपारी१ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र अनेक शाळांमध्ये या परीक्षा आपल्या सोयीनुसार घेतल्या जात आहेत. काही शाळांमध्ये या परीक्षा सकाळी ७.३० वाजता तर काही शाळांमध्ये दुपारी १२ वाजता देखील घेतल्या जात आहेत. मात्र याबाबत शिक्षण विभागाचे कुठलेही नियंत्रण दिसून येत नाही. शिक्षण विभागाकडून संपर्क अधिकाºयांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीकडून देखील कोणतीही कारवाई याबाबत होताना दिसत नाही.

प्रश्नपत्रिका पोहचविण्यासही आकारले पैसेगेल्या आठ दिवसांपूर्वी संकलित कल चाचणीच्या प्रश्नपत्रिका या जि.प.शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. तर या ठिकाणाहून सर्व तालुक्याचा ठिकाणी प्रश्नपत्रिका पोहचविण्यात आल्या. शाळांपर्यंत या प्रश्नपत्रिका पोहचविण्यासाठी मुख्याध्यापकांकडून २०० ते ५०० रुपये घेण्यात आल्याची माहिती काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी दिली. ज्या उद्देशासाठी संकलित चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. तो उद्देश साध्य होताना दिसत नाही.

कोटसंकलित कल चाचणी परीक्षा सुरळीत व पारदर्शक पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाकडून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. शाळांमध्ये भेटी देखील देण्यात आल्या. मात्र जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत फळ्यावर उत्तरे लिहिली जात असल्याचे आढळून आलेले नाही.-बी.जे.पाटील,शिक्षणाधिकारी, जि.प.प्राथमिक विभाग