शहरं
Join us  
Trending Stories
1
उरफाटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
2
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
3
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
4
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
5
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
6
"त्याला कशाला दोष देता?"; सुनील गावसकरांनी घेतली गौतम गंभीरची बाजू, दोषी कोण तेही सांगितलं
7
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
8
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
9
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
12
एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट
13
लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उपराज्यपालांकडून 'हे' अधिकार काढून घेतले...
14
"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला
15
बँक ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद; सलग ५ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामे खोळंबणार!
16
“OBC आरक्षणावरील टांगती तलवार कायम; भाजपा सरकारने दिशाभूल केली”; विजय वडेट्टीवारांची टीका
17
SMAT 2025 : प्रितीच्या संघातील पठ्ठ्याचा स्फोटक अवतार! शाहरुखच्या मिस्ट्री स्पिनरची धुलाई (VIDEO)
18
Meesho IPO: ₹२.८४ कोटींचे होणार ₹५२४५ कोटी; Meesho IPO बदलणार 'या' लोकांचं नशीब
19
Deepika TC : "फेकलेली फळं खाऊन..."; शेतमजूर बापाची लेक वर्ल्ड चॅम्पियन, दीपिका टीसीचा संघर्षमय प्रवास
20
Datta Jayanti 2025: 'दत्त येवोनिया उभा ठाकला' हा अनुभव तुम्हालाही येईल, 'अशी' घाला आर्त साद!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून पुलामुळे त्रस्त असलेल्या शिवाजीनगरवासीयांना रस्त्यांनीही केले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST

मोटारसायकलच काय, पायी चालणेदेखील झाले कठीण : अनेक वर्षांची व्यथा ऐकणार तरी कोण? लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ...

मोटारसायकलच काय, पायी चालणेदेखील झाले कठीण : अनेक वर्षांची व्यथा ऐकणार तरी कोण?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील नागरिक गेल्या अडीच वर्षांपासून पुलाचे काम रखडले असल्याने, काही किमीचा फेरा मारून शहरात येत आहेत. हा त्रास कमी होता की काय, त्यात शिवाजीनगर भागातील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे शिवाजीनगरवासीयांची वाट अजून बिकट झाली आहे. ही समस्या ना मनपा प्रशासन सोडायला तयार आहे, ना लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार आहेत. या भागातील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, मोटारसायकल चालविणे तर सोडाच पायी चालणेदेखील कठीण झाले आहे.

शिवाजीनगर भाग हा शहरातील महत्त्वाचा भाग असून, या परिसरातूनच जळगाव तालुक्यातील ३२ गावांमधील नागरिकांसह चोपडा व यावल तालुक्यातील वाहतूकदेखील याच भागातून होत असते. नेहमी वाहतुकीची वर्दळ असलेल्या या परिसरातील रस्त्यांकडे मात्र मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बुधवारी या भागातील अमर चौक परिसरात मालवाहतूक करणारी ट्रक खड्ड्यात फसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. ही परिस्थिती केवळ एक दिवसापुरती नसून गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील नागरिक खराब रस्त्यांच्या समस्येला तोंड देत आहेत.

भुयारी गटार योजनेने लावली रस्त्यांची वाट

शहरात अमृत योजनेंतर्गत झालेल्या भुयारी गटार योजनेचे ४० टक्के काम हे केवळ शिवाजीनगर परिसरात झालेले आहे. त्यात मनपा अधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे निविदेत केलेल्या चुकीमुळे भुयारी गटार योजनेंतर्गत खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारावर न सोपविल्याने ठेकेदाराने रस्ते खोदल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली नाही. ही जबाबदारी महापालिकेने स्वतःवर घेतल्यामुळे महापालिकेनेदेखील या रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे भुयारी गटार योजना शहरासाठी चांगली ठरली असली तरी शिवाजीनगर भागातील नागरिकांना ही योजना चांगलीच त्रासदायक ठरत आहे.

अपघात झाले नित्याचेच

शिवाजीनगर भागाकडून कानळदा व ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यासह शिवाजीनगरातील अंतर्गत रस्त्यांचीदेखील पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यात पाऊस झाल्यानंतर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचत आहे. त्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने व भुयारी गटार योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या चाऱ्यांचीदेखील दुरुस्ती मनपाने न केल्यामुळे या भागातील रस्त्यांवर लहान-मोठे अपघात हे नित्याचेच झाले आहेत.

आंदोलन करून व निवेदने देऊनदेखील झाला नाही फायदा

शिवाजीनगर भागातील रस्त्यांच्या समस्येबाबत महापालिका प्रशासनाकडे आतापर्यंत ५० हून अधिक निवेदने सादर झाली आहेत. तसेच रस्त्यांच्या समस्येबाबत या भागातील नागरिकांनी आतापर्यंत गेल्या तीन वर्षात दहापेक्षा जास्त आंदोलने केली आहेत. मात्र निवेदने देऊन व आंदोलने करूनदेखील महापालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. तसेच मनपा प्रशासनाने काही महिन्यापूर्वी या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती केली होती. मात्र, काही महिन्यातच या रस्त्यांच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

या भागात येणाऱ्या कॉलनी

गेंदालाल मिल, शिवाजीनगर, लाकूड पेठ, दांडेकरनगर या सर्व भागांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

नगरसेवक - ८

लोकसंख्या - ३४ हजार

तीन तालुक्यांची वाहतूक या भागातून होते.