शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

दोन वर्षांपासून पुलामुळे त्रस्त असलेल्या शिवाजीनगरवासीयांना रस्त्यांनीही केले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST

मोटारसायकलच काय, पायी चालणेदेखील झाले कठीण : अनेक वर्षांची व्यथा ऐकणार तरी कोण? लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ...

मोटारसायकलच काय, पायी चालणेदेखील झाले कठीण : अनेक वर्षांची व्यथा ऐकणार तरी कोण?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील नागरिक गेल्या अडीच वर्षांपासून पुलाचे काम रखडले असल्याने, काही किमीचा फेरा मारून शहरात येत आहेत. हा त्रास कमी होता की काय, त्यात शिवाजीनगर भागातील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे शिवाजीनगरवासीयांची वाट अजून बिकट झाली आहे. ही समस्या ना मनपा प्रशासन सोडायला तयार आहे, ना लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार आहेत. या भागातील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, मोटारसायकल चालविणे तर सोडाच पायी चालणेदेखील कठीण झाले आहे.

शिवाजीनगर भाग हा शहरातील महत्त्वाचा भाग असून, या परिसरातूनच जळगाव तालुक्यातील ३२ गावांमधील नागरिकांसह चोपडा व यावल तालुक्यातील वाहतूकदेखील याच भागातून होत असते. नेहमी वाहतुकीची वर्दळ असलेल्या या परिसरातील रस्त्यांकडे मात्र मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बुधवारी या भागातील अमर चौक परिसरात मालवाहतूक करणारी ट्रक खड्ड्यात फसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. ही परिस्थिती केवळ एक दिवसापुरती नसून गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील नागरिक खराब रस्त्यांच्या समस्येला तोंड देत आहेत.

भुयारी गटार योजनेने लावली रस्त्यांची वाट

शहरात अमृत योजनेंतर्गत झालेल्या भुयारी गटार योजनेचे ४० टक्के काम हे केवळ शिवाजीनगर परिसरात झालेले आहे. त्यात मनपा अधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे निविदेत केलेल्या चुकीमुळे भुयारी गटार योजनेंतर्गत खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारावर न सोपविल्याने ठेकेदाराने रस्ते खोदल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली नाही. ही जबाबदारी महापालिकेने स्वतःवर घेतल्यामुळे महापालिकेनेदेखील या रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे भुयारी गटार योजना शहरासाठी चांगली ठरली असली तरी शिवाजीनगर भागातील नागरिकांना ही योजना चांगलीच त्रासदायक ठरत आहे.

अपघात झाले नित्याचेच

शिवाजीनगर भागाकडून कानळदा व ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यासह शिवाजीनगरातील अंतर्गत रस्त्यांचीदेखील पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यात पाऊस झाल्यानंतर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचत आहे. त्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने व भुयारी गटार योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या चाऱ्यांचीदेखील दुरुस्ती मनपाने न केल्यामुळे या भागातील रस्त्यांवर लहान-मोठे अपघात हे नित्याचेच झाले आहेत.

आंदोलन करून व निवेदने देऊनदेखील झाला नाही फायदा

शिवाजीनगर भागातील रस्त्यांच्या समस्येबाबत महापालिका प्रशासनाकडे आतापर्यंत ५० हून अधिक निवेदने सादर झाली आहेत. तसेच रस्त्यांच्या समस्येबाबत या भागातील नागरिकांनी आतापर्यंत गेल्या तीन वर्षात दहापेक्षा जास्त आंदोलने केली आहेत. मात्र निवेदने देऊन व आंदोलने करूनदेखील महापालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. तसेच मनपा प्रशासनाने काही महिन्यापूर्वी या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती केली होती. मात्र, काही महिन्यातच या रस्त्यांच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

या भागात येणाऱ्या कॉलनी

गेंदालाल मिल, शिवाजीनगर, लाकूड पेठ, दांडेकरनगर या सर्व भागांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

नगरसेवक - ८

लोकसंख्या - ३४ हजार

तीन तालुक्यांची वाहतूक या भागातून होते.