शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगरवासियांना आता पुलासाठी ‘टी’ आकारासाठी उपरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम आराखड्यानुसार ‘टी’ आकारात मंजूर असताना, प्रत्यक्षात मात्र हे काम ‘एल’ आकाराप्रमाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम आराखड्यानुसार ‘टी’ आकारात मंजूर असताना, प्रत्यक्षात मात्र हे काम ‘एल’ आकाराप्रमाणे होत असल्याने आता शिवाजीनगर भागातील नागरिकांनी या ‘एल’ आकाराच्या पुलाला विरोध केला आहे. तसेच आराखड्यात मंजुरी असलेल्या ‘टी’ आकाराच्या पुलाप्रमाणेच या पुलाचे बांधकाम करण्यात यावे अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा या भागातील नागरिकांनी व नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी दिला आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक देखील या भागातील नागरिकांनी काढले आहे. एल आकाराचा पूल झाल्यास त्याचा फायदा शिवाजीनगरवासियांना होणार नसल्याचेही म्हटले आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याआधीच या पुलाच्या विविध पर्यायांवरून या पुलाचे काम वादात सापडले होते. शिवानगरवासियांनी या पुलाचे काम ‘वाय’ आकारात करण्यात यावे, अशी मागणी केली होती. तसेच ‘टी’ आकाराच्या पुलाला विरोध केला होता. मात्र, शिवाजीनगर भागातील नागरिकांचा विरोध झुगारून ‘टी’ आकारातच करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पुलाचे काम सुरू झाल्यानंतर शिवाजीनगरवासियांनीही ‘टी’ आकाराच्या पुलाला मंजुरी देत, आपला विरोध कमी केला होता. मात्र, पुलाचे काम सुरू झाल्यानंतर वर्षभरानंतर जेव्हा पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले तेव्हाच सार्वजनिक बांधकाम विभागाने परस्पर निर्णय घेत हा पूल ‘टी’ आकारात न करता अगोदरप्रमाणेच ‘एल’ आकारात पूल करण्याचा निर्णय घेतल्याने आता पुन्हा नवीन वाद निर्माण झाला आहे.

शिवाजीनगरवासियांचे घूमजाव

शिवाजीनगरवासियांनी पुलाचे काम सुरू होण्याआधी ‘वाय’ व ‘एल’ आकाराची मागणी केली. तर ‘टी’ आकाराला विरोध केला. आता मात्र, नवीन पत्रक काढून ‘टी’ आकाराच्या पुलाची मागणी केली आहे. तर ‘एल’ आकाराला विरोध केला आहे. या भागातील नागरिकांच्या घूमजावमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बांधकाम विभागाचेही चुकीचे धोरण

शिवाजीनगरवासियांकडून जेव्हा ‘एल’ आकाराची मागणी केली जात होती. तेव्हा विरोध झुगारून ‘टी’ आकाराचा आराखडा मंजूर करून घेतला. तसेच या पुलाचे काम ‘टी’ आकारातच करण्यास सुरुवात केली. जेव्हा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. कामाला सुरुवात झाली होती, नागरिकांचा विरोध मावळला होता. तेव्हाच सार्वजनिक बांधकाम विभागाला हा पूल ‘एल’ आकारातच करण्याचा शहाणपणा का सुचला? आधी जेव्हा विरोध होत होता तेव्हा का निर्णय घेतला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ‘टी’ आकाराबाबत शिवाजीनगरवासियांची मानसिकता तयार झाली असतानाच, परस्पर आराखड्यात बदल का ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

या अडचणींमुळे शिवाजीनगर भागातील नागरिकांचा विरोध

१. जेव्हा ‘टी’आकाराला विरोध केला जात होता. तेव्हा शिवाजीनगर भागातील नागरिकांनी परिसरातील इमारतींना धोका निर्माण होईल, तसेच शिवाजीनगर भागात अपघातांचे प्रमाण वाढेल, अशी कारणे दिली होती. एल किंवा वाय आकाराचा पूल तयार केल्यास वाहतुकीचा प्रश्न ही सुटेल व शिवाजीनगर भागातील नागरिकांना अडचणी येणार नाही, असे सांगितले.

२. आता मात्र, रेल्वेने तहसील कार्यालयाकडून पायी जाण्याचा रस्ता येत्या काही महिन्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ‘एल’ आकाराचा पूल झाल्यास नागरिकांना शहरात येण्यासाठी हा पूल एकच पर्याय राहणार आहे. तसेच हा फेरादेखील मोठा पडणार असल्याने अमर चौक भागात ‘टी’ आकाराचा पूल आल्यास हा फेरा कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दोन्हीही बाजूंनी शहरात जाणे सोपे ठरणार आहे. या अडचणीमुळे आता शिवाजीनगर भागातील नागरिकांनी ‘टी’ आकाराच्याच पुलाची मागणी केली आहे. याबाबत भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनीही प्रसिद्धीपत्रक काढले आहे.