शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

जळगावातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल १ मार्चपासून बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:41 IST

रेल्वेकडे ४ निविदा प्राप्त

ठळक मुद्देमनपाकडून प्रतिसाद मिळेनाअर्थसंकल्पात करावी लागणार तरतूदशिवाजीनगर भागात पुलाला दोन रस्ते

जळगाव : सुमारे १०० वर्षांहूनही अधिक जुन्या झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या जागी नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी रेल्वेच्या हिश्शाच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यांनी १ मार्च पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करून तो पाडण्याची परवानगी मनपाकडे पत्र पाठवून केली आहे. मात्र मनपाकडून त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. तर उर्वरित काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून त्यांच्याकडून अंदाजपत्रक व डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र मार्च महिन्यात बजेटमध्ये तरतूद झाल्यानंतरच त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया होणार आहे.बांधकाम विभागाकडून प्रतिसाद नाहीमहिनाभरात निविदा प्रक्रिया अंतिम होऊन १ मार्चपासून हा शिवाजीनगर पूल वाहतुकीसाठी बंद करून नवीन पूल बांधण्यासाठी जुना पूल तोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्याबाबत या पुलाचा वापर बंद करण्याबाबतचे पत्र रेल्वेकडून मनपाला पाठविण्यात आले आहे. मात्र मनपाकडून पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही त्यास प्रतिसाद दिलेला नाही. तसेच रेल्वेने या पत्राची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागालाही दिली असून त्यांच्या हिश्शाच्या पुलाचे बांधकाम करण्याबाबत काय नियोजन झाले? याची विचारणा केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही रेल्वेला प्रतिसाद मिळालेला नाही.अर्थसंकल्पात करावी लागणार तरतूदसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रेल्वे त्यांच्या हद्दीतील पुलाचे काम करेल. तर उर्वरित जोड रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. त्यासाठी सुमारे २५ कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले असून नकाशे करणे सुरू आहे. मात्र या निधीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद होणे आवश्यक आहे. मार्च महिन्यात सादर होणाºया अर्थसंकल्पात याची तरतूद झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम यासाठी निविदा प्रक्रिया करेल. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होऊन मे महिन्यात पुलाला जोडणाºया रस्त्यांच्या कामाला सुरुवात होऊ शकेल, असे सांगितले.शिवाजीनगर भागात पुलाला दोन रस्तेवाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या रेल्वे उड्डाणपुलाच्या शिवाजीनगरकडील भागात एक रस्ता शिवाजीनगर, जिल्हा दूध संघाच्या दिशेने जाणार तर दुसरा रस्ता सरळ खाली ममुराबाद रस्त्याकडे जाईल. तर जिल्हा परिषदच्या टोकाला जागा कमी असल्याने आहे त्या जागेतच पुलाचे बांधकाम करावे लागणार आहे. या पुलाची शेवटची कमान ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच बांधली जाणार आहे. त्याच्या उंचीवरच रेल्वेच्या पुलाची उंची ठरणार आहे. हे पुलाचे काम पूर्ण व्हायला किमान दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.४० कोटींचे अंदाजपत्रक... सुमारे १०० वर्षांहून अधिक जुन्या व जीर्ण झालेल्या शिवाजीनगर पुलाच्या जागी नवीन रेल्वे उड्डाणपूल उभारण्यासाठी रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाने जबाबदारी वाटून घेण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. या पुलासाठी सुमारे ४० कोटींचा खर्च येणार आहे. त्यापैकी रेल्वेने त्यांच्या हद्दीतील मुख्य पुलाचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक, आराखडे तयार करून निविदा प्रक्रियाही केली आहे. चार निविदा प्राप्त झाल्या असून १ महिन्याच्या आत निविदा अंतिम होऊन मक्तेदाराला कार्यादेशही दिले जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.