शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर उड्डाणपूल व महामार्ग चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे, मनपा व महावितरणने हातवर केल्याने शासनाकडे ११ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 11:23 IST

विद्युत खांब व जलवाहिनी स्थलांतरासाठी शासन निर्णयाची प्रतीक्षा

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासह महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारे विद्युत खांब व जलवाहिनी स्थलांतराच्या कामासाठी निधी नसल्याचे कारण सांगत मनपा व महावितरणने हात झटकल्याने हे काम रखडले आहे. दोघांकडून नकार घंटा मिळाल्याने अखेर जिल्हा प्रशासनाच्यावतीने यासाठी शासनाकडे ११ कोटींचे प्रस्ताव पाठविले असून त्याची प्रतीक्षा आता या कामासाठी आहे. जो पर्यंत या प्रस्तावांना मंजुरी मिळत नाही व हा निधी मिळत नाही तोपर्यंत हे काम रेंगाळत राहणार असल्याचे चित्र सध्या यामुळे निर्माण झाले आहे.शहरातील दोन महत्त्वाचे व जिव्हाळ््याचे विषय असलेले महामार्ग चौपदरीकरण व शिवाजीनगर उड्डाणपूल ही कामे गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्या न कोणत्या कारणांमुळे रखडत आहे. यामुळे एकतर अपघातात अनेकांना जीव गमवावे लागत आहे व दुसरीकडे शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाअभावी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)च्या कामासाठी अनेक अडथळ््यांनंतर या कामास मंजुरी मिळाली व डिपीआरही मंजूर झाला. हे सर्व होत असताना त्या-त्या विभागांवर त्यांच्याशी संबंधित कामांची जबाबदारी सोपविण्यात आली. यात मनपाने व महावितरणने त्यांच्याकडील विद्युत खांब स्थलांतरीत करावे, अतिक्रमण हटवावे व इतर कामे सोपविण्यात आली. असे झाले तरी मनपाने व महावितरणने या कामांसाठी आपल्याकडे निधी नसल्याचे सांगत हात वर केले.त्या दरम्यान महामार्गाच्या कामासाठी ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग या कामासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार निविदा मिळाल्यानंतर गुडगाव येथील जेसीसी या कंपनीला हे काम देण्यात आले. कंपनीला काम तर दिले आहे मात्र महावितरण व मनपाकडून अद्यापही विद्युत खांब न हटविल्याने ते अडथळे ठरू पाहत आहे.अशाच प्रकारे शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठीदेखील मनपाने जलवाहिनी व महावितरणने विद्युत खांब स्थलांतरीत करणे अपेक्षित होते. मात्र तेथेही तसे न झाल्याने हा प्रकार अडथळा ठरत आहे.अखेर जिल्हा प्रशासनाने पाठविला प्रस्तावशिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे हे शहरवासीयांसाठी महत्त्वाचे असल्याने त्याचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकाºयांनी यासाठी सहा कोटी रुपये देण्याचे मान्य करीत तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हे काम ेहोणार आहे.विशेष बाब म्हणून निधीची मागणीमहामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळे ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरने जिल्हा विकास नियोजन समितीकडे (डीपीडीसी) जवळपास ५ कोटी रुपयांची मागणी केली. मात्र जिल्हा स्तरावरून एवढा निधी तत्काळ देता येणार नसल्याने तसा प्रस्ताव डीपीडीसीमार्फत शासनाकडे पाठविण्यात येऊन ऊर्जा सचिवांकडे विशेष बाब म्हणून या निधीला मंजुरी मिळण्याची मागणी केली आहे.हे दोन्हीही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून ते मंजूर झाल्यानंतरच हे कामे होतील, एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे मनपा व महावितरणच्या अडमुठे धोरणामुळे हे काम रेंगाळत असल्याचे एकूणच चित्र आहे.महामार्गावरील विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरणने निधीची मागणी केली आहे. मात्र जिल्हास्तरावर निधी देता येणार नसल्याने तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून ऊर्जा सचिवांकडे विशेष बाब म्हणून मंजुरीची मागणी केली आहे.प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव