शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शिवाजीनगर उड्डाणपूल व महामार्ग चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे, मनपा व महावितरणने हातवर केल्याने शासनाकडे ११ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 11:23 IST

विद्युत खांब व जलवाहिनी स्थलांतरासाठी शासन निर्णयाची प्रतीक्षा

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासह महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारे विद्युत खांब व जलवाहिनी स्थलांतराच्या कामासाठी निधी नसल्याचे कारण सांगत मनपा व महावितरणने हात झटकल्याने हे काम रखडले आहे. दोघांकडून नकार घंटा मिळाल्याने अखेर जिल्हा प्रशासनाच्यावतीने यासाठी शासनाकडे ११ कोटींचे प्रस्ताव पाठविले असून त्याची प्रतीक्षा आता या कामासाठी आहे. जो पर्यंत या प्रस्तावांना मंजुरी मिळत नाही व हा निधी मिळत नाही तोपर्यंत हे काम रेंगाळत राहणार असल्याचे चित्र सध्या यामुळे निर्माण झाले आहे.शहरातील दोन महत्त्वाचे व जिव्हाळ््याचे विषय असलेले महामार्ग चौपदरीकरण व शिवाजीनगर उड्डाणपूल ही कामे गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्या न कोणत्या कारणांमुळे रखडत आहे. यामुळे एकतर अपघातात अनेकांना जीव गमवावे लागत आहे व दुसरीकडे शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाअभावी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)च्या कामासाठी अनेक अडथळ््यांनंतर या कामास मंजुरी मिळाली व डिपीआरही मंजूर झाला. हे सर्व होत असताना त्या-त्या विभागांवर त्यांच्याशी संबंधित कामांची जबाबदारी सोपविण्यात आली. यात मनपाने व महावितरणने त्यांच्याकडील विद्युत खांब स्थलांतरीत करावे, अतिक्रमण हटवावे व इतर कामे सोपविण्यात आली. असे झाले तरी मनपाने व महावितरणने या कामांसाठी आपल्याकडे निधी नसल्याचे सांगत हात वर केले.त्या दरम्यान महामार्गाच्या कामासाठी ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग या कामासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार निविदा मिळाल्यानंतर गुडगाव येथील जेसीसी या कंपनीला हे काम देण्यात आले. कंपनीला काम तर दिले आहे मात्र महावितरण व मनपाकडून अद्यापही विद्युत खांब न हटविल्याने ते अडथळे ठरू पाहत आहे.अशाच प्रकारे शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठीदेखील मनपाने जलवाहिनी व महावितरणने विद्युत खांब स्थलांतरीत करणे अपेक्षित होते. मात्र तेथेही तसे न झाल्याने हा प्रकार अडथळा ठरत आहे.अखेर जिल्हा प्रशासनाने पाठविला प्रस्तावशिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे हे शहरवासीयांसाठी महत्त्वाचे असल्याने त्याचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकाºयांनी यासाठी सहा कोटी रुपये देण्याचे मान्य करीत तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हे काम ेहोणार आहे.विशेष बाब म्हणून निधीची मागणीमहामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळे ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरने जिल्हा विकास नियोजन समितीकडे (डीपीडीसी) जवळपास ५ कोटी रुपयांची मागणी केली. मात्र जिल्हा स्तरावरून एवढा निधी तत्काळ देता येणार नसल्याने तसा प्रस्ताव डीपीडीसीमार्फत शासनाकडे पाठविण्यात येऊन ऊर्जा सचिवांकडे विशेष बाब म्हणून या निधीला मंजुरी मिळण्याची मागणी केली आहे.हे दोन्हीही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून ते मंजूर झाल्यानंतरच हे कामे होतील, एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे मनपा व महावितरणच्या अडमुठे धोरणामुळे हे काम रेंगाळत असल्याचे एकूणच चित्र आहे.महामार्गावरील विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरणने निधीची मागणी केली आहे. मात्र जिल्हास्तरावर निधी देता येणार नसल्याने तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून ऊर्जा सचिवांकडे विशेष बाब म्हणून मंजुरीची मागणी केली आहे.प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव