शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे जलसंपदा मंत्र्यांना विचारणार जाब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:05 IST

विधीमंडळातील कामकाजात जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करतो, जामनेर मतदारसंघात डोकावत नाही. मंत्री गिरीश महाजन हे माझे दुश्मन नाही. पाचोरा तालुक्यातील गावे त्यांच्या मतदारसंघास जोडल्याने तेथे विकास होत नसल्याने खंत वाटते व जलसंपदा मंत्री असून एकही काम अद्याप झाले नसल्याने मी जाब विचारणारच, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देपाचोरा येथे आजी माजी आमदार आमने-सामनेमतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची उभयतांची ग्वाहीआगळ्या-वेगळ्या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थितीदीड तास चाललेल्या कार्यक्रमात एकूण प्रश्नांपैकी १४ प्रश्नच चर्चेला आजी माजी आमदारांचे समर्थक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

पाचोरा, जि.जळगाव : विधीमंडळातील कामकाजात जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करतो, जामनेर मतदारसंघात डोकावत नाही. मंत्री गिरीश महाजन हे माझे दुश्मन नाही. पाचोरा तालुक्यातील गावे त्यांच्या मतदारसंघास जोडल्याने तेथे विकास होत नसल्याने खंत वाटते व जलसंपदा मंत्री असून एकही काम अद्याप झाले नसल्याने मी जाब विचारणारच, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.एका आगळ्या वेगळया कार्यक्रमात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर आमने सामने आणून जनतेच्या सडेतोड प्रश्नांवर उत्तरे देण्यास भाग पाडणारा कार्यक्रम २७ रोजी रात्री ९ वाजता पाचोरा येथील मानसिंघका मैदानावर पार पडला.येथील प्रागतिक विचार मंच संघटनेतर्फे आयोजित ‘लोकशाही महोत्सव’ ह्या कार्यक्रमात ‘प्रश्न जनतेचे, उत्तर लोकप्रतिनिधींचे’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यमान आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांना एकाच मंचावर आमनेसामने बोलावून जनतेच्या लेखी प्रश्नांवर उत्तरे जाणून घेतली.दीड तास चाललेल्या कार्यक्रमात एकूण प्रश्नांपैकी १४ प्रश्नच चर्चेला घेतले गेले. त्यावर उभयतांनी दिलखुलासपणे सडेतोड उत्तरे देऊन मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा दावा केला.यावेळी आयोजकांनी स्वीकारलेल्या लेखी प्रश्नांचे वाचन करून गेल्या १० वर्षातील आजी माजी आमदारांची सत्ताधारी आमदार म्हणून असलेली कारकीर्द मतदारसंघात कोणती कामे कशी केली, भविष्यातील व्हिजन काय? काय करायला हवे होते, असे प्रश्न उपस्थित केले. यावर माजी आमदार दिलीप वाघ यांनी १०० कोटींची कामे केल्याचा दावा केला तर विद्यमान आमदार यांनी चार वर्षात ५०० कोटींची कामे केल्याचा दावा केला.यावेळी विचारलेल्या विविध प्रश्नांना उभयतांनी समर्पक उत्तरे दिली. यात शहराचा पाणीप्रश्न, रोजगार निर्मिती, शहरातील महात्मा फुलेंचा पुतळा, ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न, राजकीय कारकीर्द यावर सडेतोड उत्तरे दिली.यावेळी विचारलेल्या प्रश्नांत प्रामुख्याने पाचोरा शहरातील पाणी प्रश्न सतत भेडसावत असल्याने त्यावर उभयतांनी वेगवेगळे पर्याय दिले. यात दिलीप वाघ यांनी वाघूर प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली, तर किशोर पाटील यांनी गिरणा प्रकल्पातून पाईपलाईन टाकून पाणी आणण्यावर भर दिला. यावर दोघांचीही मतभिन्नता दिसून आली. म.ज्योतीबा फुले यांचा पुतळा उभारणीचे उभयतांचे प्रयत्न असल्याचे दिसले. रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी मंजूर करण्यात आली असून लवकरच हजारो बेरोजगारांना काम मिळवून देण्याची योजना हाती घेतल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी सहकार्य करीत असल्याचे वाघ यांनी स्पष्ट करून कोणत्याही परिस्थितीत पक्षांतर करणार नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी आयोजक प्रागतिक विचार मंचचे नंदकुमार सोनार व सुनील शिंदे यांनी प्रश्नांचे वाचन केले. यावेळी आजी माजी आमदारांचे समर्थक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणPachoraपाचोरा