शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे जलसंपदा मंत्र्यांना विचारणार जाब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:05 IST

विधीमंडळातील कामकाजात जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करतो, जामनेर मतदारसंघात डोकावत नाही. मंत्री गिरीश महाजन हे माझे दुश्मन नाही. पाचोरा तालुक्यातील गावे त्यांच्या मतदारसंघास जोडल्याने तेथे विकास होत नसल्याने खंत वाटते व जलसंपदा मंत्री असून एकही काम अद्याप झाले नसल्याने मी जाब विचारणारच, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देपाचोरा येथे आजी माजी आमदार आमने-सामनेमतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची उभयतांची ग्वाहीआगळ्या-वेगळ्या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थितीदीड तास चाललेल्या कार्यक्रमात एकूण प्रश्नांपैकी १४ प्रश्नच चर्चेला आजी माजी आमदारांचे समर्थक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

पाचोरा, जि.जळगाव : विधीमंडळातील कामकाजात जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करतो, जामनेर मतदारसंघात डोकावत नाही. मंत्री गिरीश महाजन हे माझे दुश्मन नाही. पाचोरा तालुक्यातील गावे त्यांच्या मतदारसंघास जोडल्याने तेथे विकास होत नसल्याने खंत वाटते व जलसंपदा मंत्री असून एकही काम अद्याप झाले नसल्याने मी जाब विचारणारच, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.एका आगळ्या वेगळया कार्यक्रमात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर आमने सामने आणून जनतेच्या सडेतोड प्रश्नांवर उत्तरे देण्यास भाग पाडणारा कार्यक्रम २७ रोजी रात्री ९ वाजता पाचोरा येथील मानसिंघका मैदानावर पार पडला.येथील प्रागतिक विचार मंच संघटनेतर्फे आयोजित ‘लोकशाही महोत्सव’ ह्या कार्यक्रमात ‘प्रश्न जनतेचे, उत्तर लोकप्रतिनिधींचे’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यमान आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांना एकाच मंचावर आमनेसामने बोलावून जनतेच्या लेखी प्रश्नांवर उत्तरे जाणून घेतली.दीड तास चाललेल्या कार्यक्रमात एकूण प्रश्नांपैकी १४ प्रश्नच चर्चेला घेतले गेले. त्यावर उभयतांनी दिलखुलासपणे सडेतोड उत्तरे देऊन मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा दावा केला.यावेळी आयोजकांनी स्वीकारलेल्या लेखी प्रश्नांचे वाचन करून गेल्या १० वर्षातील आजी माजी आमदारांची सत्ताधारी आमदार म्हणून असलेली कारकीर्द मतदारसंघात कोणती कामे कशी केली, भविष्यातील व्हिजन काय? काय करायला हवे होते, असे प्रश्न उपस्थित केले. यावर माजी आमदार दिलीप वाघ यांनी १०० कोटींची कामे केल्याचा दावा केला तर विद्यमान आमदार यांनी चार वर्षात ५०० कोटींची कामे केल्याचा दावा केला.यावेळी विचारलेल्या विविध प्रश्नांना उभयतांनी समर्पक उत्तरे दिली. यात शहराचा पाणीप्रश्न, रोजगार निर्मिती, शहरातील महात्मा फुलेंचा पुतळा, ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न, राजकीय कारकीर्द यावर सडेतोड उत्तरे दिली.यावेळी विचारलेल्या प्रश्नांत प्रामुख्याने पाचोरा शहरातील पाणी प्रश्न सतत भेडसावत असल्याने त्यावर उभयतांनी वेगवेगळे पर्याय दिले. यात दिलीप वाघ यांनी वाघूर प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली, तर किशोर पाटील यांनी गिरणा प्रकल्पातून पाईपलाईन टाकून पाणी आणण्यावर भर दिला. यावर दोघांचीही मतभिन्नता दिसून आली. म.ज्योतीबा फुले यांचा पुतळा उभारणीचे उभयतांचे प्रयत्न असल्याचे दिसले. रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी मंजूर करण्यात आली असून लवकरच हजारो बेरोजगारांना काम मिळवून देण्याची योजना हाती घेतल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी सहकार्य करीत असल्याचे वाघ यांनी स्पष्ट करून कोणत्याही परिस्थितीत पक्षांतर करणार नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी आयोजक प्रागतिक विचार मंचचे नंदकुमार सोनार व सुनील शिंदे यांनी प्रश्नांचे वाचन केले. यावेळी आजी माजी आमदारांचे समर्थक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणPachoraपाचोरा