शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे जलसंपदा मंत्र्यांना विचारणार जाब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:05 IST

विधीमंडळातील कामकाजात जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करतो, जामनेर मतदारसंघात डोकावत नाही. मंत्री गिरीश महाजन हे माझे दुश्मन नाही. पाचोरा तालुक्यातील गावे त्यांच्या मतदारसंघास जोडल्याने तेथे विकास होत नसल्याने खंत वाटते व जलसंपदा मंत्री असून एकही काम अद्याप झाले नसल्याने मी जाब विचारणारच, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देपाचोरा येथे आजी माजी आमदार आमने-सामनेमतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची उभयतांची ग्वाहीआगळ्या-वेगळ्या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थितीदीड तास चाललेल्या कार्यक्रमात एकूण प्रश्नांपैकी १४ प्रश्नच चर्चेला आजी माजी आमदारांचे समर्थक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

पाचोरा, जि.जळगाव : विधीमंडळातील कामकाजात जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करतो, जामनेर मतदारसंघात डोकावत नाही. मंत्री गिरीश महाजन हे माझे दुश्मन नाही. पाचोरा तालुक्यातील गावे त्यांच्या मतदारसंघास जोडल्याने तेथे विकास होत नसल्याने खंत वाटते व जलसंपदा मंत्री असून एकही काम अद्याप झाले नसल्याने मी जाब विचारणारच, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.एका आगळ्या वेगळया कार्यक्रमात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर आमने सामने आणून जनतेच्या सडेतोड प्रश्नांवर उत्तरे देण्यास भाग पाडणारा कार्यक्रम २७ रोजी रात्री ९ वाजता पाचोरा येथील मानसिंघका मैदानावर पार पडला.येथील प्रागतिक विचार मंच संघटनेतर्फे आयोजित ‘लोकशाही महोत्सव’ ह्या कार्यक्रमात ‘प्रश्न जनतेचे, उत्तर लोकप्रतिनिधींचे’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यमान आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांना एकाच मंचावर आमनेसामने बोलावून जनतेच्या लेखी प्रश्नांवर उत्तरे जाणून घेतली.दीड तास चाललेल्या कार्यक्रमात एकूण प्रश्नांपैकी १४ प्रश्नच चर्चेला घेतले गेले. त्यावर उभयतांनी दिलखुलासपणे सडेतोड उत्तरे देऊन मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा दावा केला.यावेळी आयोजकांनी स्वीकारलेल्या लेखी प्रश्नांचे वाचन करून गेल्या १० वर्षातील आजी माजी आमदारांची सत्ताधारी आमदार म्हणून असलेली कारकीर्द मतदारसंघात कोणती कामे कशी केली, भविष्यातील व्हिजन काय? काय करायला हवे होते, असे प्रश्न उपस्थित केले. यावर माजी आमदार दिलीप वाघ यांनी १०० कोटींची कामे केल्याचा दावा केला तर विद्यमान आमदार यांनी चार वर्षात ५०० कोटींची कामे केल्याचा दावा केला.यावेळी विचारलेल्या विविध प्रश्नांना उभयतांनी समर्पक उत्तरे दिली. यात शहराचा पाणीप्रश्न, रोजगार निर्मिती, शहरातील महात्मा फुलेंचा पुतळा, ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न, राजकीय कारकीर्द यावर सडेतोड उत्तरे दिली.यावेळी विचारलेल्या प्रश्नांत प्रामुख्याने पाचोरा शहरातील पाणी प्रश्न सतत भेडसावत असल्याने त्यावर उभयतांनी वेगवेगळे पर्याय दिले. यात दिलीप वाघ यांनी वाघूर प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली, तर किशोर पाटील यांनी गिरणा प्रकल्पातून पाईपलाईन टाकून पाणी आणण्यावर भर दिला. यावर दोघांचीही मतभिन्नता दिसून आली. म.ज्योतीबा फुले यांचा पुतळा उभारणीचे उभयतांचे प्रयत्न असल्याचे दिसले. रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी मंजूर करण्यात आली असून लवकरच हजारो बेरोजगारांना काम मिळवून देण्याची योजना हाती घेतल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी सहकार्य करीत असल्याचे वाघ यांनी स्पष्ट करून कोणत्याही परिस्थितीत पक्षांतर करणार नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी आयोजक प्रागतिक विचार मंचचे नंदकुमार सोनार व सुनील शिंदे यांनी प्रश्नांचे वाचन केले. यावेळी आजी माजी आमदारांचे समर्थक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणPachoraपाचोरा