शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

शिंदे, फडणवीस यांना प्रचारासाठी वेळ मिळतो, शेतकऱ्यांसाठी नाही; एकनाथ खडसेंची टीका 

By सुनील पाटील | Updated: May 6, 2023 19:50 IST

केळी, पपई, कांदा यासारखी पिके नामशेष झाली. पण अजूनही पंचनामे झालेले नाहीत, असा आरोपही खडसेंनी केला.

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्नाटकमध्ये प्रचाराला जायला वेळ आहे, पण अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे उद‌्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी बैठका घ्यायला, मदत करायला वेळ नसल्याची टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.

गेल्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात, प्रामुख्याने खानदेशात अवकाळी पाऊस, वादळ वारा आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळी, पपई, कांदा यासारखी पिके नामशेष झाली. पण अजूनही पंचनामे झालेले नाहीत, असा आरोपही खडसेंनी केला.  आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. नुकसानग्रस्तांना मदत करु, असे सरकारकडून सांगितले जात आहे, मात्र अजून तरी शेतकऱ्यांना एक रुपयाची देखील मदत झालेली नाही. शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनाम दिल्याच्या प्रकरणात खडसे म्हणाले, या निर्णयामुळे पवारांना मानणाऱ्या वर्गामध्ये अस्वस्थता होती. पवारांच्या निर्णयानंतर पुढे काय हा प्रश्न होता पक्षात विविध चर्चा होती, अलीकडच्या महिना दोन महिन्याच्या काळात विविध घटना घडल्या होत्या. अशा परिस्थितीत शरद पवारांचा निर्णय धक्कादायक होता, असे ते म्हणाले.

बारसू कुणाची खासगी मालमत्ता नाहीबारसू रिफायनरीबद्दल मत भिन्नता असू शकते, परंतु बारसु ही कुणाची मालमत्ता नाही, त्यामुळे तिथं जायला कुणीच मज्जाव घालू शकत नाही. भाजपने आव्हान दिल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे दौरा केला. उद्धव ठाकरेंनी बारसु दौरा केल्याने त्याची सहानुभूती शिवसेनेला मिळेल या भीतीनेच भाजपने मोर्चाची घोषणा केली. प्रकल्प ग्रस्तांची सहानुभूती मिळविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. भाजप या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही खडसे यांनी केली.

कर्नाटकमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळेल असं वाटत नाही. सर्व्हेचे जे रिपोर्ट येत आहेत, त्यात भारतीय जनता पार्टी पूर्वीपेक्षाही मागे जात असल्याचे चित्र आहे.  आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये यश मिळायला पाहिजे, म्हणून भाजपाकडून वेगवेगळे हातखंडे वापरले जात आहेत. एकीकडे हिंदुत्वाचा वापर केला म्हणून काही आमदारांची आमदारकी रद्द होते आणि दुसरीकडे काही नेते मंडळीच यापासून सुरुवात करतात, असा टोलाही खडसेंनी मोदींना लगावला.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसे