शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

रात्र निवारा केंद्रात राजस्थान, गुजरातसह राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरीकांचा आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने गेल्या वर्षी अनेक नागरिक अडकून पडले होते. रेल्वे व बससेवा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने गेल्या वर्षी अनेक नागरिक अडकून पडले होते. रेल्वे व बससेवा बंद असल्याने अनेकांना घराकडे दोन-दोन महिने जाता आले नाही, यंदा काही प्रमाणात परिस्थिती निवळली असली तरी, सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे सुरू झालेली नाही. त्यामुळे या अडकून पडलेल्या नागरिकांना शहरातील मनपाचे रात्र निवारा केंद्र मोठा आधार ठरत आहे. या ठिकाणी राज्यातील नव्हे तर राजस्थान, गुजरात तर थेट नागपूर येथील नागरिक आश्रय घेत असल्याचे 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.

शहरातील नवीन बस स्थानकाच्या पाठीमागे जळगाव मनपा प्रशासनातर्फे तीन वर्षांपासून शहरी बेघर निवारा केंद सुरू केले आहे. सध्या परभणी येथील आदित्य ढवळे पाटील या सेवाभावी संस्थेतर्फे हे रात्र निवारा केंद्र चालविले जात होते. गेल्या वर्षी हे केंद्र जळगावातील केशव स्मृती प्रतिष्ठान तर्फे चालविले गेले. यंदा मात्र मनपातर्फे आदित्य ढवळे पाटील या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना संबंधित संस्थेतर्फे सकाळी चहा, नाश्ता, जेवण व पुन्हा सायंकाळी चहा, नाश्ता जेवण दिले जात आहे. नागरिकांना झोपण्यासाठी स्वतंत्र आसन असून, सकाळी अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधाही करण्यात आली आहे. तसेच करमणुकीसाठी टीव्ही संचही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

इन्फो :

मनपा प्रशासनातर्फे दाखल केले जाते केंद्रात

मनपाच्या महिला व बाल कल्याण विभागाचे कर्मचारी आठवड्यातून एकदा रात्रीच्या वेळी शहरातील विविध भागात फिरत असतात. यामध्ये विशेषतः रेल्वे स्टेशन, बस स्टँड, टॉवर चौक, फुले मार्केट आदी सार्वजनिक ठिकाणी पाहणी करून, या ठिकाणी जे नागरिक रस्त्यावर झोपलेले आढळतील, त्यांना या रात्र निवारा केंद्रात असतात. विशेष सार्वजनिक ठिकाणी आढळून येणाऱ्यांमध्ये बहुतांश नागरिक हे वयोवृद्ध असल्याचे आढळून आले आहेत. या नागरिकांना तात्काळ मनपाच्या वाहनातून या केंद्रात दाखल करण्यात येत आहे.

इन्फो :

लॉकडाऊन काळात ५० हून अधिक जणांनी घेतला आश्रय

शासनातर्फे गेल्या वर्षी आणि आताही लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेक जण या ठिकाणी येऊन आश्रय घेत आहेत. विशेष लॉकडाऊन मध्ये अडकलेले अनेक वयोवृद्ध व नागरिकांनी स्वतःहून या ठिकाणी संपर्क साधून रात्र निवारा केंद्रात आश्रय घेतला. यामध्ये राजस्थान, सुरत, नागपूर, अकोला, मुंबई येथील नागरिकांचा समावेश होता. यातील काही नागरिक घराकडे परतत असून, २० बेघर नागरिक मात्र याच ठिकाणी आश्रय घेत आहेत. दरम्यान, या ठिकाणी नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी होत असून, २४ तास सबंधित संस्थेचे कर्मचारी निवारा केंद्रात मुक्कामी राहत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

या रात्र निवारा केंद्रात लॉकडाऊन काळात अनेकांनी आश्रय घेतला. शहरातील बेघर नागरीकांना या ठिकाणी दाखल केले जाते. त्यांना आम्ही घराप्रमाणे सर्व सुविधा देत असून, एक कुटुंबाप्रमाणे या ठिकाणी नागरिक राहत असतात.

मनीषा पारधी, व्यवस्थापक, रात्र निवारा केंद्र