शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

रात्र निवारा केंद्रात राजस्थान, गुजरातसह राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरीकांचा आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने गेल्या वर्षी अनेक नागरिक अडकून पडले होते. रेल्वे व बससेवा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने गेल्या वर्षी अनेक नागरिक अडकून पडले होते. रेल्वे व बससेवा बंद असल्याने अनेकांना घराकडे दोन-दोन महिने जाता आले नाही, यंदा काही प्रमाणात परिस्थिती निवळली असली तरी, सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे सुरू झालेली नाही. त्यामुळे या अडकून पडलेल्या नागरिकांना शहरातील मनपाचे रात्र निवारा केंद्र मोठा आधार ठरत आहे. या ठिकाणी राज्यातील नव्हे तर राजस्थान, गुजरात तर थेट नागपूर येथील नागरिक आश्रय घेत असल्याचे 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.

शहरातील नवीन बस स्थानकाच्या पाठीमागे जळगाव मनपा प्रशासनातर्फे तीन वर्षांपासून शहरी बेघर निवारा केंद सुरू केले आहे. सध्या परभणी येथील आदित्य ढवळे पाटील या सेवाभावी संस्थेतर्फे हे रात्र निवारा केंद्र चालविले जात होते. गेल्या वर्षी हे केंद्र जळगावातील केशव स्मृती प्रतिष्ठान तर्फे चालविले गेले. यंदा मात्र मनपातर्फे आदित्य ढवळे पाटील या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना संबंधित संस्थेतर्फे सकाळी चहा, नाश्ता, जेवण व पुन्हा सायंकाळी चहा, नाश्ता जेवण दिले जात आहे. नागरिकांना झोपण्यासाठी स्वतंत्र आसन असून, सकाळी अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधाही करण्यात आली आहे. तसेच करमणुकीसाठी टीव्ही संचही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

इन्फो :

मनपा प्रशासनातर्फे दाखल केले जाते केंद्रात

मनपाच्या महिला व बाल कल्याण विभागाचे कर्मचारी आठवड्यातून एकदा रात्रीच्या वेळी शहरातील विविध भागात फिरत असतात. यामध्ये विशेषतः रेल्वे स्टेशन, बस स्टँड, टॉवर चौक, फुले मार्केट आदी सार्वजनिक ठिकाणी पाहणी करून, या ठिकाणी जे नागरिक रस्त्यावर झोपलेले आढळतील, त्यांना या रात्र निवारा केंद्रात असतात. विशेष सार्वजनिक ठिकाणी आढळून येणाऱ्यांमध्ये बहुतांश नागरिक हे वयोवृद्ध असल्याचे आढळून आले आहेत. या नागरिकांना तात्काळ मनपाच्या वाहनातून या केंद्रात दाखल करण्यात येत आहे.

इन्फो :

लॉकडाऊन काळात ५० हून अधिक जणांनी घेतला आश्रय

शासनातर्फे गेल्या वर्षी आणि आताही लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेक जण या ठिकाणी येऊन आश्रय घेत आहेत. विशेष लॉकडाऊन मध्ये अडकलेले अनेक वयोवृद्ध व नागरिकांनी स्वतःहून या ठिकाणी संपर्क साधून रात्र निवारा केंद्रात आश्रय घेतला. यामध्ये राजस्थान, सुरत, नागपूर, अकोला, मुंबई येथील नागरिकांचा समावेश होता. यातील काही नागरिक घराकडे परतत असून, २० बेघर नागरिक मात्र याच ठिकाणी आश्रय घेत आहेत. दरम्यान, या ठिकाणी नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी होत असून, २४ तास सबंधित संस्थेचे कर्मचारी निवारा केंद्रात मुक्कामी राहत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

या रात्र निवारा केंद्रात लॉकडाऊन काळात अनेकांनी आश्रय घेतला. शहरातील बेघर नागरीकांना या ठिकाणी दाखल केले जाते. त्यांना आम्ही घराप्रमाणे सर्व सुविधा देत असून, एक कुटुंबाप्रमाणे या ठिकाणी नागरिक राहत असतात.

मनीषा पारधी, व्यवस्थापक, रात्र निवारा केंद्र