शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
3
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
4
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
5
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
6
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
7
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
8
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
9
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
10
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
11
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
12
शेअर बाजारात आधी घसरण मग सावरला; सेन्सेक्समध्ये ३५ अंकांची तेजी, निफ्टी २५,९९५ च्या पुढे
13
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
14
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
15
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
16
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
17
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
18
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
19
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
20
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
Daily Top 2Weekly Top 5

रात्र निवारा केंद्रात राजस्थान, गुजरातसह राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरीकांचा आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने गेल्या वर्षी अनेक नागरिक अडकून पडले होते. रेल्वे व बससेवा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने गेल्या वर्षी अनेक नागरिक अडकून पडले होते. रेल्वे व बससेवा बंद असल्याने अनेकांना घराकडे दोन-दोन महिने जाता आले नाही, यंदा काही प्रमाणात परिस्थिती निवळली असली तरी, सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे सुरू झालेली नाही. त्यामुळे या अडकून पडलेल्या नागरिकांना शहरातील मनपाचे रात्र निवारा केंद्र मोठा आधार ठरत आहे. या ठिकाणी राज्यातील नव्हे तर राजस्थान, गुजरात तर थेट नागपूर येथील नागरिक आश्रय घेत असल्याचे 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.

शहरातील नवीन बस स्थानकाच्या पाठीमागे जळगाव मनपा प्रशासनातर्फे तीन वर्षांपासून शहरी बेघर निवारा केंद सुरू केले आहे. सध्या परभणी येथील आदित्य ढवळे पाटील या सेवाभावी संस्थेतर्फे हे रात्र निवारा केंद्र चालविले जात होते. गेल्या वर्षी हे केंद्र जळगावातील केशव स्मृती प्रतिष्ठान तर्फे चालविले गेले. यंदा मात्र मनपातर्फे आदित्य ढवळे पाटील या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना संबंधित संस्थेतर्फे सकाळी चहा, नाश्ता, जेवण व पुन्हा सायंकाळी चहा, नाश्ता जेवण दिले जात आहे. नागरिकांना झोपण्यासाठी स्वतंत्र आसन असून, सकाळी अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधाही करण्यात आली आहे. तसेच करमणुकीसाठी टीव्ही संचही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

इन्फो :

मनपा प्रशासनातर्फे दाखल केले जाते केंद्रात

मनपाच्या महिला व बाल कल्याण विभागाचे कर्मचारी आठवड्यातून एकदा रात्रीच्या वेळी शहरातील विविध भागात फिरत असतात. यामध्ये विशेषतः रेल्वे स्टेशन, बस स्टँड, टॉवर चौक, फुले मार्केट आदी सार्वजनिक ठिकाणी पाहणी करून, या ठिकाणी जे नागरिक रस्त्यावर झोपलेले आढळतील, त्यांना या रात्र निवारा केंद्रात असतात. विशेष सार्वजनिक ठिकाणी आढळून येणाऱ्यांमध्ये बहुतांश नागरिक हे वयोवृद्ध असल्याचे आढळून आले आहेत. या नागरिकांना तात्काळ मनपाच्या वाहनातून या केंद्रात दाखल करण्यात येत आहे.

इन्फो :

लॉकडाऊन काळात ५० हून अधिक जणांनी घेतला आश्रय

शासनातर्फे गेल्या वर्षी आणि आताही लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेक जण या ठिकाणी येऊन आश्रय घेत आहेत. विशेष लॉकडाऊन मध्ये अडकलेले अनेक वयोवृद्ध व नागरिकांनी स्वतःहून या ठिकाणी संपर्क साधून रात्र निवारा केंद्रात आश्रय घेतला. यामध्ये राजस्थान, सुरत, नागपूर, अकोला, मुंबई येथील नागरिकांचा समावेश होता. यातील काही नागरिक घराकडे परतत असून, २० बेघर नागरिक मात्र याच ठिकाणी आश्रय घेत आहेत. दरम्यान, या ठिकाणी नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी होत असून, २४ तास सबंधित संस्थेचे कर्मचारी निवारा केंद्रात मुक्कामी राहत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

या रात्र निवारा केंद्रात लॉकडाऊन काळात अनेकांनी आश्रय घेतला. शहरातील बेघर नागरीकांना या ठिकाणी दाखल केले जाते. त्यांना आम्ही घराप्रमाणे सर्व सुविधा देत असून, एक कुटुंबाप्रमाणे या ठिकाणी नागरिक राहत असतात.

मनीषा पारधी, व्यवस्थापक, रात्र निवारा केंद्र