शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संकटात - शरद पवार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 13:04 IST

जळगाव जिल्ह्यातील नेरी येथे अमृतराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

जळगाव / जामनेर/नेरी, जि. जळगाव : देशातील ८० टक्के लोक शेती करतात, त्यातील ६० टक्के शेती निसर्गावर अवलंबून आहे. सत्ताधाºयांनी शेतकºयांच्या समस्यांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. कर्जमाफीचा लाभ अजूनही शेवटच्या शेतकºयास मिळालेला नाही ही दुदैर्वी बाब असल्याचे प्रतिपादन माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सकाळी नेरी, ता.जामनेर येथील कार्यक्रमात केले.नेरी येथील ज्येष्ठ समाजवादी नेते, स्व. अमृतराव चिंधूजी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांनी केले. ते पुढे म्हणाले की, १९८० मध्ये शेतकºयाच्या प्रश्नावर सत्ताधाºयांचे लक्ष वेधण्यासाठी जळगावाहून नागपूरला पायी दिंडी काढली होती. नेरी मुक्कामी अमृतदादांनी स्वागताबरोबरच शेतकºयासोबत दिंडीत सहभाग घेतला. सहकार, शिक्षण क्षेत्रात पाटील यांचे जिल्ह्यात मोठे योगदान होते.या जिल्ह्यात पूर्वी प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते होते. सध्या जिल्ह्याचे राजकारण पैशाच्या जोरावर चालले असल्याचे समजले. निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधींच्या खरेदी विक्रीचा बाजार येथे सुरु असल्याचे सांगून पवार म्हणाले, नवीन पिढीला प्रामानिक राजकारणाची सुरुवात करावी लागेल.पवार यांनी भाषणात स्व.प्रल्हादराव पाटील, स्व.गजाननराव गरुड, स्व. ब्रिजलाल पाटील, माजी आमदार गुलाबराव पाटील आदींचा उल्लेख केला.विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, संजय गरुड यांची भाषणे झाली. नेरी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. संभाजी पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalgaonजळगाव