शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

ईव्हीएमवर टीका ही शरद पवारांना पराभवाची चाहूल - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:34 IST

चार राज्यात विजय झाला त्यावेळी ईव्हीएम कसे चालले

जळगाव : शरद पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करणे म्हणजे त्यांना पराभवाची चाहूल लागली आहे़ त्यांनी २०-२२ जागा लढविल्या पण दोन, तीन ठिकाणी विजय होईल त्यावर ते पंतप्रधान होण्याचे स्वप्न पहात आहेत. पराभवाची कारणे लिहायला त्यांनी सुरूवात केली आहे, अशी बोचरी टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली़महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बुधवारी चंद्रकांत पाटील हे जळगावी आले होते़ त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते़ ते पूढे म्हणाले, बारामतीमध्ये जर भाजपच्या उमेदवार कांचन कूल या निवडून आल्या तर चुकीचा संदेश जाईल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यासंदर्भात चंद्रकांत पाटील बोलत होते़देश कायद्याने चालतोते म्हणाले, ईव्हीएम काँग्रेसने आणले़ चार राज्यात काँग्रेसचा विजय झाला़ त्यावेळेस त्यांना ईव्हीएम चालले़ पण भाजपाचा विजय झाला की, ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचे ही मंडळी बोलते. हा देश कायद्याने चालतो़ या देशाचा निवडणूक आयोग स्वायत्त आहे़न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश द्यावा कि ईव्हीएम बंद करावे़ त्यानंतर चिठ्ठया ही कशाला लोकांचे हातवर करून मतदान घ्यावे़ आमचे काहीही म्हणणे नाही़ या देशाची व्यवस्था नाकारणे हा काँग्रेसने उद्योग चालविला आहे़ घटना त्यांनाच मान्य नसल्याचे यावरून लक्षात येते.हाच आमचा विजयआतापर्यंत बारामतीमध्ये किती मताधिक्याने विजय होणार अशी चर्चा चालायची़ पण यावेळेला सांगता येत नाही बुवा, येथपर्यंत आम्ही निवडणूक आणून ठेवली आहे़ हाच आमचा विजय आहे़ शरद पवार यांनी सर्व गोष्टींचे जपून विश्लेषण करावे़ सर्व विश्लेषण त्यांच्या अंगाशी येत आहे़ पवार कुटूंबातील एकही उमेदवार निवडून येणार नाही़, हे मी ठामपणे सांगत आहे़ बारामतीमध्ये त्यांची मुलगी तसेच मावळात नातू हरणार आहे़ प्रत्येक माणूस शेवटी कुटूंबाचा विचार करतो, अशी खिल्ली उडवत चंद्रकांत पाटील म्हणाले, पवार हे खूप मोठे आहेत. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील गिरणी कामगाराचा मुलगा आहे. ज्या झाडाला आंबे त्याला दगड मारण्याचा प्रकार ते करीत असतात.२-३ जागावरच यशराष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यात २०-२२ जागा लढविल्या पण त्यांना यश दोन-तीन जागांवरच मिळणार आहे, असे असताना पवार हे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पहात आहेत. या देशात कुणालाही काहीही व्हावेसे वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव