शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

ईव्हीएमवर टीका ही शरद पवारांना पराभवाची चाहूल - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:34 IST

चार राज्यात विजय झाला त्यावेळी ईव्हीएम कसे चालले

जळगाव : शरद पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करणे म्हणजे त्यांना पराभवाची चाहूल लागली आहे़ त्यांनी २०-२२ जागा लढविल्या पण दोन, तीन ठिकाणी विजय होईल त्यावर ते पंतप्रधान होण्याचे स्वप्न पहात आहेत. पराभवाची कारणे लिहायला त्यांनी सुरूवात केली आहे, अशी बोचरी टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली़महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बुधवारी चंद्रकांत पाटील हे जळगावी आले होते़ त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते़ ते पूढे म्हणाले, बारामतीमध्ये जर भाजपच्या उमेदवार कांचन कूल या निवडून आल्या तर चुकीचा संदेश जाईल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यासंदर्भात चंद्रकांत पाटील बोलत होते़देश कायद्याने चालतोते म्हणाले, ईव्हीएम काँग्रेसने आणले़ चार राज्यात काँग्रेसचा विजय झाला़ त्यावेळेस त्यांना ईव्हीएम चालले़ पण भाजपाचा विजय झाला की, ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचे ही मंडळी बोलते. हा देश कायद्याने चालतो़ या देशाचा निवडणूक आयोग स्वायत्त आहे़न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश द्यावा कि ईव्हीएम बंद करावे़ त्यानंतर चिठ्ठया ही कशाला लोकांचे हातवर करून मतदान घ्यावे़ आमचे काहीही म्हणणे नाही़ या देशाची व्यवस्था नाकारणे हा काँग्रेसने उद्योग चालविला आहे़ घटना त्यांनाच मान्य नसल्याचे यावरून लक्षात येते.हाच आमचा विजयआतापर्यंत बारामतीमध्ये किती मताधिक्याने विजय होणार अशी चर्चा चालायची़ पण यावेळेला सांगता येत नाही बुवा, येथपर्यंत आम्ही निवडणूक आणून ठेवली आहे़ हाच आमचा विजय आहे़ शरद पवार यांनी सर्व गोष्टींचे जपून विश्लेषण करावे़ सर्व विश्लेषण त्यांच्या अंगाशी येत आहे़ पवार कुटूंबातील एकही उमेदवार निवडून येणार नाही़, हे मी ठामपणे सांगत आहे़ बारामतीमध्ये त्यांची मुलगी तसेच मावळात नातू हरणार आहे़ प्रत्येक माणूस शेवटी कुटूंबाचा विचार करतो, अशी खिल्ली उडवत चंद्रकांत पाटील म्हणाले, पवार हे खूप मोठे आहेत. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील गिरणी कामगाराचा मुलगा आहे. ज्या झाडाला आंबे त्याला दगड मारण्याचा प्रकार ते करीत असतात.२-३ जागावरच यशराष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यात २०-२२ जागा लढविल्या पण त्यांना यश दोन-तीन जागांवरच मिळणार आहे, असे असताना पवार हे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पहात आहेत. या देशात कुणालाही काहीही व्हावेसे वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव