शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल प्रशासनाच्या अब्रुचे धिंडवडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 17:17 IST

विश्लेषण

सुशील देवकरवाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या चार दिवसांत पुन्हा तीन ट्रॅक्टर पळवून नेल्याच्या घटनेने महसूल प्रशासनाच्या अब्रुचे धिंडवडे निघाले आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच वाळूची जप्त केलेल वाहने पळवून नेण्याची ही गेल्या काही महिन्यातील तिसरी घटना आहे. त्यापूर्वी तहसील कार्यालयाच्या गेटचे कुलुप तोडूनही जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले होते, एकंदरीत जळगाव शहरातच हा प्रकार चौथ्यांदा घडला आहे. मात्र तरीही असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून काहीही विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. वास्तविक जिल्हा प्रशासनाने ठरविले तर जप्त केलेल्या वाहनांसाठी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी एक वॉचमन ठेवून वाहन नेणे सहज रोखू शकते. मात्र जिल्हा प्रशासनालाच त्यात रस नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवलेल्या वाहनांच्या चाकांमधील हवा सोडलेली असताना वाहन चालक तेथे येवून वाहनांमध्ये हवा भरून वाहन पळवून नेण्याची हिंमत करतात, हे स्पष्ट आहे. वाहन पळवून नेली की मग केवळ कागदोपत्री गुन्हा दाखल करण्याची पूर्तता केली जात आहे. वाळू माफिया मात्र पळविलेल्या वाहनांच्या मदतीने पुन्हा अवैध वाळू उपसा करायला मोकळे, असेच प्रकार सुरू आहेत. वाळू वाहतूक करणाºया वाहनांपैकी जवळपास निम्म्या वाहनांवर वाहनक्रमांकच नाही. त्यामुळे ही वाहने जप्त केल्यावर चेसीस नंबरच्या आधारे वाहन क्रमांक शोधून नंतर दंडाची नोटीस बजवावी लागत आहे. मात्र तरीही आरटीओकडूनही या वाहनांवर कारवाई का होत नाही? असा सवाल आहे. यापूर्वीही जप्त केलेले वाहन आरटीओकडे सोपवून त्याचे फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावर अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. सोयीस्करपणे सगळ्या गोष्टींना, नियमांना फाटा देण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळेच वाळू माफियांचे फावत आहे.