शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

सांड पाण्यामुळे मेहरुण तलावाची होतेय गटार गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:15 IST

२४ सीटीआर ३० मनपाचे दुर्लक्ष : जैवविविधता आणि जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही ...

२४ सीटीआर ३०

मनपाचे दुर्लक्ष : जैवविविधता आणि जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून परिसरातील नागरी वसाहतींचे सांडपाणी या तलावात सोडण्यात येत असल्यामुळे, तलावात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत आहे. असाच प्रकार अजून काही वर्ष सुरू राहिला तर, तलावाची गटार गंगा होण्यास वेळ लागणार नाही. या तलाव परिसरातील जैवविविधता आणि तलावातील जलचर प्राण्यांचे अस्तित्व यामुळे धोक्यात आल्याचे रविवारी 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून समोर आले. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारे तलावाचे प्रदूषण होत असताना मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधी यांचेही याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाच्या संवर्धनासाठी, पर्यावरण प्रेमींकडून विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यात येत आहे. तलाव परिसरातील वाढत्या वृक्ष तोडीचे प्रमाण, गुरांचा तलाव परिसरात मुक्त संचार, तलावात कपडे व वाहने धुणे, अतिक्रमणामुळे तलावाचे जलस्त्रोत आटने, त्यामुळे तलाव अपूर्ण भरणे, तसेच मुख्य म्हणजे सांडपाणी सोडल्यामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. तलावाच्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या नागरी वसाहतींचे सांडपाणी थेट तलावात सोडल्यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन दुर्गंधीही येत आहे.

इन्फो :

दररोज लाखो लीटर सांड पाणी सोडले जाते तलावात

'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत मेहरुण तलावात तीन ठिकाणी मोठ-मोठ्या आकाराचे पाईप टाकून सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे दिसून आले. पावसाळ्या प्रमाणे या पाईपातून सांडपाण्याचा प्रवाह वाहतांना दिसून आला. त्यामुळे दररोज मेहरुण तलावात लाखो लीटर सांड पाणी सोडले जात आहे. तलावात काढण्यात आलेल्या पाईपाच्या ठिकाणी सतत पाणी वाहत असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झालेला दिसून आला. त्यात पाळीव प्राणी बसत असल्यामुळे अधिकच दुर्गंधी पसरलेली दिसून आली.

इन्फो :

तर भविष्यात तलावाचे अस्तित्व नष्ट होणार

तलावात गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरी वसाहतींचे सांडपाणी सोडण्यात येत आहे. यामुळे मोठा दूषित पाण्याचा स्तर तलावात जमा होत आहे. तसेच दुसरीकडे तलावातील पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या दूषित पाण्यामुळे तलावात असणारे विविध प्रकारचे जलचर प्राणी मृत पडत आहे. काही वर्षांपूर्वीही तलावात मासे मृत पडत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सध्या तलावात असलेल्या एकूण साठ्या पैकी निम्मा साठा हा सांड पाण्यामुळे दूषित झाला आहे. दिवसेंदिवस तलावात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे भविष्यात मेहरुण तलावाचे अस्तित्व नष्ट होऊन तलावात गटार गंगा झाल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली असेल, अशी भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

या सांड पाण्यामुळे तलावात मासे मृत पडल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सांड पाण्यामुळे तलावातील जलचर वनस्पती आहेत, त्या दुषित होत आहेत. या दूषित वनस्पती खाल्यामुळे विविध प्रकारच्या पक्ष्यांवर परिणाम होत असल्याने या पक्षांनी आता तलावाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी हे सांडपाणी बंद केले पाहिजे.

राजेंद्र गाडगीळ, पर्यावरण प्रेमी

तलावात गेल्या काही वर्षात सांड पाण्यामुळे तेथील जलचर प्राणी मृत पडत आहेत. वनस्पती नष्ट होत आहेत. तसेच पाणी दूषित होत असल्याने गटार गंगाची परिस्थिती निर्माण होत आहे. जळगावचे वैभव म्हणणाऱ्या या तलावाकडे मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात तलावाचे अस्तित्व नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.

सुजाता देशपांडे, पर्यावरण प्रेमी