शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सांड पाण्यामुळे मेहरुण तलावाची होतेय गटार गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:15 IST

२४ सीटीआर ३० मनपाचे दुर्लक्ष : जैवविविधता आणि जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही ...

२४ सीटीआर ३०

मनपाचे दुर्लक्ष : जैवविविधता आणि जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून परिसरातील नागरी वसाहतींचे सांडपाणी या तलावात सोडण्यात येत असल्यामुळे, तलावात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत आहे. असाच प्रकार अजून काही वर्ष सुरू राहिला तर, तलावाची गटार गंगा होण्यास वेळ लागणार नाही. या तलाव परिसरातील जैवविविधता आणि तलावातील जलचर प्राण्यांचे अस्तित्व यामुळे धोक्यात आल्याचे रविवारी 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून समोर आले. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारे तलावाचे प्रदूषण होत असताना मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधी यांचेही याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाच्या संवर्धनासाठी, पर्यावरण प्रेमींकडून विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यात येत आहे. तलाव परिसरातील वाढत्या वृक्ष तोडीचे प्रमाण, गुरांचा तलाव परिसरात मुक्त संचार, तलावात कपडे व वाहने धुणे, अतिक्रमणामुळे तलावाचे जलस्त्रोत आटने, त्यामुळे तलाव अपूर्ण भरणे, तसेच मुख्य म्हणजे सांडपाणी सोडल्यामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. तलावाच्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या नागरी वसाहतींचे सांडपाणी थेट तलावात सोडल्यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन दुर्गंधीही येत आहे.

इन्फो :

दररोज लाखो लीटर सांड पाणी सोडले जाते तलावात

'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत मेहरुण तलावात तीन ठिकाणी मोठ-मोठ्या आकाराचे पाईप टाकून सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे दिसून आले. पावसाळ्या प्रमाणे या पाईपातून सांडपाण्याचा प्रवाह वाहतांना दिसून आला. त्यामुळे दररोज मेहरुण तलावात लाखो लीटर सांड पाणी सोडले जात आहे. तलावात काढण्यात आलेल्या पाईपाच्या ठिकाणी सतत पाणी वाहत असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झालेला दिसून आला. त्यात पाळीव प्राणी बसत असल्यामुळे अधिकच दुर्गंधी पसरलेली दिसून आली.

इन्फो :

तर भविष्यात तलावाचे अस्तित्व नष्ट होणार

तलावात गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरी वसाहतींचे सांडपाणी सोडण्यात येत आहे. यामुळे मोठा दूषित पाण्याचा स्तर तलावात जमा होत आहे. तसेच दुसरीकडे तलावातील पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या दूषित पाण्यामुळे तलावात असणारे विविध प्रकारचे जलचर प्राणी मृत पडत आहे. काही वर्षांपूर्वीही तलावात मासे मृत पडत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सध्या तलावात असलेल्या एकूण साठ्या पैकी निम्मा साठा हा सांड पाण्यामुळे दूषित झाला आहे. दिवसेंदिवस तलावात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे भविष्यात मेहरुण तलावाचे अस्तित्व नष्ट होऊन तलावात गटार गंगा झाल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली असेल, अशी भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

या सांड पाण्यामुळे तलावात मासे मृत पडल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सांड पाण्यामुळे तलावातील जलचर वनस्पती आहेत, त्या दुषित होत आहेत. या दूषित वनस्पती खाल्यामुळे विविध प्रकारच्या पक्ष्यांवर परिणाम होत असल्याने या पक्षांनी आता तलावाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी हे सांडपाणी बंद केले पाहिजे.

राजेंद्र गाडगीळ, पर्यावरण प्रेमी

तलावात गेल्या काही वर्षात सांड पाण्यामुळे तेथील जलचर प्राणी मृत पडत आहेत. वनस्पती नष्ट होत आहेत. तसेच पाणी दूषित होत असल्याने गटार गंगाची परिस्थिती निर्माण होत आहे. जळगावचे वैभव म्हणणाऱ्या या तलावाकडे मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात तलावाचे अस्तित्व नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.

सुजाता देशपांडे, पर्यावरण प्रेमी