शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

बिबा नगरात उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST

सावखेडा ग्रामपंचयतीचे दुर्लक्ष : रहिवाशांना विकतचे घ्यावे लागतेय पाणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील बांभोरी परिसरातील महामार्गाला लागून ...

सावखेडा ग्रामपंचयतीचे दुर्लक्ष : रहिवाशांना विकतचे घ्यावे लागतेय पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील बांभोरी परिसरातील महामार्गाला लागून असलेल्या बिबा नगरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. मनपा व सावखेडा ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे रहिवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.

बिबा नगर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढली. मात्र, आजही येथील पाणी, रस्ते, गटारी व पथदिव्यांच्या समस्या जैसे थे आहे. यातील पाण्याची समस्या गंभीर बनली असून, नागरिकांना उन्हाळ्यात विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सावखेडा ग्रामपंचायतीतर्फे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांना बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअरवेलही आटत असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी अधिकच फिरफिर होत आहे. तसेच या ठिकाणी रस्ते व गटारींची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी चालण्यासाठी रस्ताही राहत नसल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

उन्हाळ्यात तर तीव्र पाणी टंचाई

पाणी टंचाईबाबत येथील रहिवाशांनी सांगितले की, वर्षानुवर्षे या ठिकाणी पाण्याची समस्या आहे. रहिवाशी बोअरवेलच्या पाण्याचा उपयोग करतात. मात्र, उन्हाळ्यात हे पाणीही कमी होते. त्यामुळे पाण्यासाठी फारच फिरफिर करावी लागते. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याचे खूपच हाल होतात. नागरिकांना विकतचे पाणी आणावे लागते, हे पाणी आणतांना खूप त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी ही नित्याचीच समस्या झाली आहे. तक्रारी करूनही लोकप्रतिनिधी यांनी पाण्याची समस्या सोडविली नसल्याची खंत येथील रहिवाशांनी ''लोकमत''कडे व्यक्त केली.

इन्फो :

मनपा किंवा सावखेडा ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन न टाकल्यामुळे बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. उन्हाळ्यात तेही पाणी कमी होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होतात. मनपा व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

वंदना काळे, रहिवासी

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पिण्याच्या पाण्यासह रस्ते व गटारींचीही समस्या सुटलेली नाही. मनपाचे व लोकप्रतिनिधी यांचे येथील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी चालण्यासाठीही रस्ता नसतो.

सुनिता सोनवणे, रहिवासी

गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअर वेलचेही पाणी कमी होत असल्यामुळे,पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या बाबत अनेकदा नागरिकांनी तक्रारी करूनही मनपा प्रशासनाने दखल घेतलेली नाही.

मनिषा बडगुजर,रहिवासी

इन्फो :

मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे खूप हाल होत आहेत. तसेच या ठिकाणी रस्ते, गटारींचीही व्यवस्था नाही. यामुळे नागरिकांना खूपच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही ,मनपा प्रशासन किंवा सावखेडा ग्रामपंचायतीतर्फे पाण्याची समस्या सोडविण्यात आलेली नाही.

शशिकलाबाई भोरे, रहिवासी