शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सेंद्रिय खतांचा वापर करून पाच बिघ्यात घेतले सात लाखांचे केळीचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

चोपड्यातील नितीन चौधरींची करामत : पीलबागेचे व्यवस्थापन करून खर्च कमी करण्यावर दिला भर अजय पाटील कृषी दिन विशेष लोकमत ...

चोपड्यातील नितीन चौधरींची करामत : पीलबागेचे व्यवस्थापन करून खर्च कमी करण्यावर दिला भर

अजय पाटील

कृषी दिन विशेष

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शेतीमध्ये शेतकऱ्यांकडून सातत्याने रासायनिक खतांचा वापर करून शेतीची गुणवत्ता कमी होत जात आहे. यामुळे उत्पादनावरदेखील मोठा परिणाम होत आहे. भविष्यात रासायनिक खतांचा वापर अशाचप्रकारे होत राहिला तर सुपीक जमीन सापडणे कठीण होऊन जाईल. रासायनिक शेतीचा धोका ओळखून शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील रहिवासी, मात्र चोपडा येथे वास्तव्याला असलेल्या नितीन धर्मराज चौधरी यांनी केळीच्या पीलबागेची लागवड करून त्यात सेंद्रिय खतांचा वापर करून, कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याची करामत केली आहे. तसेच सेंद्रिय शेतीसाठी युवकांनी पुढे यायला पाहिजे यासाठीदेखील चौधरी चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागात काम करीत आहेत.

कृषी शाखेचे पदवीधर असल्याने नितीन चौधरी यांनी पिकांचे योग्य व्यवस्थापन करीत चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊनच्या काळातदेखील नितीन चौधरी यांच्या शेतातील केळीला बाजारात ५०० ते ६०० रुपये क्विंटल इतका दर मिळाला. खोडवा व्यवस्थापनाचे नियोजन करून, चौधरी चांगले उत्पन्न घेत इतर शेतकऱ्यांनादेखील यासाठी प्रेरणा देत आहेत.

असे केले नियोजन

१. चौधरी यांनी चार एकरातील लागवड सहा बाय पाच फूट अंतरात केली. सुमारे सहा हजार झाडांची लागवड या बागेत केली. अशाप्रकारे लागवड केल्याने काढणी ही ९० टक्क्यांपर्यंत झाली. तसेच पीलबागेतील झाडांची संख्या ९५ टक्क्यांवर राखता आली. लागवड केल्यानंतर त्यांनी २०० लीटर पाण्यात पालापाचोळा कुजविणारे जिवाणू, संवर्धक ३ लीटर मिसळून केळीच्या अवशेषांवर शिंपडले.

२. योग्य वेळेत कुजून जमिनीचा सेंद्रिय कस वाढण्यास मदत झाली. खर्च कमी करण्यासाठी केवळ दोन वेळा बेसल डोस देण्यात आले. यानंतर आवश्यकतेनुसार खते व पाण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच ड्रीपरची पाणी देण्याची क्षमतादेखील प्रती तास चार लीटर एवढी केली. त्यात पीलबाग पावसाळ्यात मोठा काळ राहतो, त्यामुळे सिंचनाव्दारे पाणी देण्याची फारशी गरज पडली नाही.

सेंद्रिय खतांचा वापर करून, एकरी वाचला १८ हजारांचा खर्च

पीलबाग केळीमुळे पुनर्लागवड, पूर्वमशागत व मजुरीचा खर्च वाचला. त्यात नांगरणी, रोटाव्हेटर, बेड निर्मितीचा एकरी किमान २८०० रुपये खर्च वाचला. तसेच घरीच २०० लीटर पाण्यात पालापाचोळा कुजविणारे जिवाणू, संवर्धक ३ लीटर मिसळून लावगडीसाठी वापरली. तसेच जीवामृतांचा वापर करून, इतर खतांचा वापर टाळला. यामुळे रासायनिक खतांचा इतर खर्चदेखील वाचला. एकरी १८ हजारांचा खर्च वाचल्याची माहिती नितीन चौधरी यांनी दिली. तसेच जमिनीतील ऑरगॅनिक कार्बनची वाढ होऊन फळ देखील चांगले येते व उत्पादन देखील चांगले मिळते. शेतकऱ्यांनी व्यवस्थापन, नियोजनाचा वापर केल्यास शेती चांगला व्यवसाय ठरू शकतो असेही चौधरी सांगतात.