शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाने जळगावातील सात कंपन्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:15 IST

राज्य सरकारच्या धोरणावर जोरदार टीका

ठळक मुद्देरोजगार बुडण्यासह करोडो रुपयांच्या गुंतवणुकीवर पाणी सोडण्याची वेळबेरोजगारीची कु-हाड कोसळणार

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १७ - प्लॅस्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या व प्लॅस्टिक वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे जळगाव शहरातील सात कंपन्या बंद पडून शेकडोंचा रोजगार बुडण्यासह करोडो रुपयांच्या गुंतवणुकीवर पाणी सोडण्याची वेळ उद्योजकांवर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयासंदर्भात प्लॅस्टिक उद्योग जगतातून संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, प्लॅस्टिक बंदीसंदर्भात महाराष्ट्र प्लॅस्टीक असोसिएशनने न्यायालयात धाव घेतल्यानंतर राज्य सरकारने महिना-दीड महिन्याचा वेळ मागून प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तरीदेखील दोन दिवसात प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीचा निर्णय म्हणजे सरकार न्यायालयाचा अवमान करीत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.प्लॅस्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या व प्लॅस्टिक वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला व गुढीपाडवा, १८ मार्चपासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे घोषित करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत १५ मायक्रॉनपर्यंतच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर असलेली बंदी आता सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर राहणार असून प्लॅस्टिकचे चमचे, प्लेट व अन्य कटलरी वस्तूंवरही बंदी राहणार आहे.बेरोजगारीची कु-हाड कोसळणारजळगावात प्लॅस्टिक उद्योग मोठा असल्याने बंदीच्या या पार्श्वभूमीवर येथील स्थिती जाणून घेतली असता जळगावात प्लॅस्टिकचे ग्लास तयार करणाऱ्या सात कंपन्या असून त्यांना याची झळ बसण्याची चिन्हे आहे. येथे तयार झालेले हे ग्लास देशभरात पाठविले जातात. प्रत्येक कंपनीमध्ये ३० ते ३५ कामगार असून या उद्योगावर अवलंबून असणारे वाहतूकदार तसेच इतर पूरक व्यावसायिक अशा एकूण शेकडो जणांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार असल्याची चिन्हे आहेत.करोडो रुपयांची गुंतवणूकप्लॅस्टिक ग्लास तयार करणाºया प्रत्येक कंपनीमध्ये दोन ते अडीच कोटींची गुंतवणूक संबंधिक उद्योजकाने केली आहे. त्यामुळे त्यावर पाणी तर सोडावेच लागेल सोबतच बँकांचे कर्ज कसे फेडावे, असे संकट उभे राहणार असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.पुनर्वापर कराप्लॅस्टिक हा सर्वात स्वस्त पर्याय असल्याने त्याच्या पुर्नवापरावर सरकारने भर दिल्यास प्लॅस्टिकचा त्रास होणार नाही, असेही उद्योजकांचे म्हणणे आहे.अनमान याचिका दाखल करणारसरकार प्लॅस्टिक बंदी बाबत विचार करीत असल्याने या संदर्भात १५ दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सरकारला त्यांचे म्हणणे सादर करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यात सरकारने वेळ मागून घेत एक ते दीड महिना निर्णय घेणार नाही, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते, अशी माहिती महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशनचे कार्यकारीणी सदस्य व जळगाव जिल्हा इंडस्ट्री असोसिएशनचे (जिंदा) उपाध्यक्ष किरण राणे यांनी दिली. प्रतिज्ञापत्र देऊन एक-दीड महिन्याच्या आत प्लॅस्टिक बंदीचा निर्णय सरकार घेत असेल तर हा न्यायालयाचा अवमान असून सरकार विरोधात अवमान याचिका दाखल करू, असेही राणे यांनी सांगितले.प्लॅस्टिक बंदीच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे जळगावातील प्लॅस्टिक ग्लास उत्पादक कंपन्या संकटात येऊ शकतात. सरकारने प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी घालण्यापेक्षा प्लॅस्टिकचा पुनर्वापर कसा करता येईल, यावर भर दिला पाहिजे.- किरण राणे, कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशन

टॅग्स :JalgaonजळगावPlastic banप्लॅस्टिक बंदी