शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाने जळगावातील सात कंपन्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:15 IST

राज्य सरकारच्या धोरणावर जोरदार टीका

ठळक मुद्देरोजगार बुडण्यासह करोडो रुपयांच्या गुंतवणुकीवर पाणी सोडण्याची वेळबेरोजगारीची कु-हाड कोसळणार

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १७ - प्लॅस्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या व प्लॅस्टिक वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे जळगाव शहरातील सात कंपन्या बंद पडून शेकडोंचा रोजगार बुडण्यासह करोडो रुपयांच्या गुंतवणुकीवर पाणी सोडण्याची वेळ उद्योजकांवर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयासंदर्भात प्लॅस्टिक उद्योग जगतातून संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, प्लॅस्टिक बंदीसंदर्भात महाराष्ट्र प्लॅस्टीक असोसिएशनने न्यायालयात धाव घेतल्यानंतर राज्य सरकारने महिना-दीड महिन्याचा वेळ मागून प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तरीदेखील दोन दिवसात प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीचा निर्णय म्हणजे सरकार न्यायालयाचा अवमान करीत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.प्लॅस्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या व प्लॅस्टिक वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला व गुढीपाडवा, १८ मार्चपासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे घोषित करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत १५ मायक्रॉनपर्यंतच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर असलेली बंदी आता सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर राहणार असून प्लॅस्टिकचे चमचे, प्लेट व अन्य कटलरी वस्तूंवरही बंदी राहणार आहे.बेरोजगारीची कु-हाड कोसळणारजळगावात प्लॅस्टिक उद्योग मोठा असल्याने बंदीच्या या पार्श्वभूमीवर येथील स्थिती जाणून घेतली असता जळगावात प्लॅस्टिकचे ग्लास तयार करणाऱ्या सात कंपन्या असून त्यांना याची झळ बसण्याची चिन्हे आहे. येथे तयार झालेले हे ग्लास देशभरात पाठविले जातात. प्रत्येक कंपनीमध्ये ३० ते ३५ कामगार असून या उद्योगावर अवलंबून असणारे वाहतूकदार तसेच इतर पूरक व्यावसायिक अशा एकूण शेकडो जणांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार असल्याची चिन्हे आहेत.करोडो रुपयांची गुंतवणूकप्लॅस्टिक ग्लास तयार करणाºया प्रत्येक कंपनीमध्ये दोन ते अडीच कोटींची गुंतवणूक संबंधिक उद्योजकाने केली आहे. त्यामुळे त्यावर पाणी तर सोडावेच लागेल सोबतच बँकांचे कर्ज कसे फेडावे, असे संकट उभे राहणार असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.पुनर्वापर कराप्लॅस्टिक हा सर्वात स्वस्त पर्याय असल्याने त्याच्या पुर्नवापरावर सरकारने भर दिल्यास प्लॅस्टिकचा त्रास होणार नाही, असेही उद्योजकांचे म्हणणे आहे.अनमान याचिका दाखल करणारसरकार प्लॅस्टिक बंदी बाबत विचार करीत असल्याने या संदर्भात १५ दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सरकारला त्यांचे म्हणणे सादर करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यात सरकारने वेळ मागून घेत एक ते दीड महिना निर्णय घेणार नाही, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते, अशी माहिती महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशनचे कार्यकारीणी सदस्य व जळगाव जिल्हा इंडस्ट्री असोसिएशनचे (जिंदा) उपाध्यक्ष किरण राणे यांनी दिली. प्रतिज्ञापत्र देऊन एक-दीड महिन्याच्या आत प्लॅस्टिक बंदीचा निर्णय सरकार घेत असेल तर हा न्यायालयाचा अवमान असून सरकार विरोधात अवमान याचिका दाखल करू, असेही राणे यांनी सांगितले.प्लॅस्टिक बंदीच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे जळगावातील प्लॅस्टिक ग्लास उत्पादक कंपन्या संकटात येऊ शकतात. सरकारने प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी घालण्यापेक्षा प्लॅस्टिकचा पुनर्वापर कसा करता येईल, यावर भर दिला पाहिजे.- किरण राणे, कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशन

टॅग्स :JalgaonजळगावPlastic banप्लॅस्टिक बंदी