शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:19 IST

राजकीय आखाड्यात ‘शिक्षण’

रवींद्र मोराणकर जळगाव : लोकसभा निवडणुकांसाठी रावेर मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. १२ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर चारच उमेदवार पदवीधारक व पदव्युत्तर आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्ये तर एकही पदवीधारक नाही, सर्व दहावी-बारावीच्या आतच आहेत.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. यातील २५ टक्के उमेदवार हे पदवीधर व पदव्युत्तर आहेत. एका उमेदवाराकडे डी.लीट. पदवी आहे. दोघा उमेदवारांनी शिक्षणाच्या कॉलमात निरंक म्हटले आहे. याचा अर्थ ते अशिक्षित आहेत.वैद्यकीय शाखेचे एकमेव उमेदवारएकूण डझनभर उमेदवारांमध्ये वैद्यकीय शाखेचे एकमेव उमेदवार आहेत. ते माजी खासदार तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.उल्हास पाटील आपले भवितव्य पुन्हा आजमावत आहेत. यानंतर विद्यमान खासदार रक्षा खडसे बी.एस्सी. (कॉम्प्यूटर) याही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीसमाजातील उच्चशिक्षित घटकांनी राजकारणात आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण चार उमेदवार अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. यातील एक उमेदवार दहावी पास, एक दहावी नापास, एक अशिक्षित आहे.शिक्षण पाहूनच मतदानभारताच्या सर्वाेच्च सभागृहात आपण आपला खासदार प्रतिनिधी म्हणून पाठवित असतो. त्याला किमान प्रश्न उपस्थित करता आले पाहिजे. यासाठी तो उच्च शिक्षित असावा. म्हणून उमेदवार निवडून देताना त्याचे शिक्षण बघून मी मतदान करतो. उमेदवाराच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य देतो.-अक्षय संजय पाटीलशिक्षित असावालोकसभा निवडणूक लढविणारा उच्चशिक्षित असावा ही अपेक्षा आहेच. कारण त्याच्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग तो मतदारसंघाच्या विकासासाठी करू शकतो. याचबरोबर उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा असावा व तो गुन्हेगारी पार्श्वभुमीचा नसावा. मतदारांच्या अडीअडचणींची जाण असणारा असावा.-डॉ.चंद्रशेखर पाटीलतरुणाईने विचार करावाउमेदवाराच्या शिक्षण पात्रतेसह त्याचे काम करण्याची क्षमता तपासूनच मतदान करणे जागरुक मतदाराचे कर्तव्य आहे. मात्र अलीकडे याबाबत दुर्लक्ष केले जाते. तरुणाईने याचा विचार करणे गरजेचे आहे. शिक्षणासह विकासाभिमुख दृष्टिकोन गरजेचा आहे, असे मला सूचवावेसे वाटते.-संजय सापधरे

टॅग्स :Jalgaonजळगाव