शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:19 IST

राजकीय आखाड्यात ‘शिक्षण’

रवींद्र मोराणकर जळगाव : लोकसभा निवडणुकांसाठी रावेर मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. १२ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर चारच उमेदवार पदवीधारक व पदव्युत्तर आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्ये तर एकही पदवीधारक नाही, सर्व दहावी-बारावीच्या आतच आहेत.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. यातील २५ टक्के उमेदवार हे पदवीधर व पदव्युत्तर आहेत. एका उमेदवाराकडे डी.लीट. पदवी आहे. दोघा उमेदवारांनी शिक्षणाच्या कॉलमात निरंक म्हटले आहे. याचा अर्थ ते अशिक्षित आहेत.वैद्यकीय शाखेचे एकमेव उमेदवारएकूण डझनभर उमेदवारांमध्ये वैद्यकीय शाखेचे एकमेव उमेदवार आहेत. ते माजी खासदार तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.उल्हास पाटील आपले भवितव्य पुन्हा आजमावत आहेत. यानंतर विद्यमान खासदार रक्षा खडसे बी.एस्सी. (कॉम्प्यूटर) याही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीसमाजातील उच्चशिक्षित घटकांनी राजकारणात आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण चार उमेदवार अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. यातील एक उमेदवार दहावी पास, एक दहावी नापास, एक अशिक्षित आहे.शिक्षण पाहूनच मतदानभारताच्या सर्वाेच्च सभागृहात आपण आपला खासदार प्रतिनिधी म्हणून पाठवित असतो. त्याला किमान प्रश्न उपस्थित करता आले पाहिजे. यासाठी तो उच्च शिक्षित असावा. म्हणून उमेदवार निवडून देताना त्याचे शिक्षण बघून मी मतदान करतो. उमेदवाराच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य देतो.-अक्षय संजय पाटीलशिक्षित असावालोकसभा निवडणूक लढविणारा उच्चशिक्षित असावा ही अपेक्षा आहेच. कारण त्याच्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग तो मतदारसंघाच्या विकासासाठी करू शकतो. याचबरोबर उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा असावा व तो गुन्हेगारी पार्श्वभुमीचा नसावा. मतदारांच्या अडीअडचणींची जाण असणारा असावा.-डॉ.चंद्रशेखर पाटीलतरुणाईने विचार करावाउमेदवाराच्या शिक्षण पात्रतेसह त्याचे काम करण्याची क्षमता तपासूनच मतदान करणे जागरुक मतदाराचे कर्तव्य आहे. मात्र अलीकडे याबाबत दुर्लक्ष केले जाते. तरुणाईने याचा विचार करणे गरजेचे आहे. शिक्षणासह विकासाभिमुख दृष्टिकोन गरजेचा आहे, असे मला सूचवावेसे वाटते.-संजय सापधरे

टॅग्स :Jalgaonजळगाव