शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:19 IST

राजकीय आखाड्यात ‘शिक्षण’

रवींद्र मोराणकर जळगाव : लोकसभा निवडणुकांसाठी रावेर मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. १२ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर चारच उमेदवार पदवीधारक व पदव्युत्तर आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्ये तर एकही पदवीधारक नाही, सर्व दहावी-बारावीच्या आतच आहेत.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. यातील २५ टक्के उमेदवार हे पदवीधर व पदव्युत्तर आहेत. एका उमेदवाराकडे डी.लीट. पदवी आहे. दोघा उमेदवारांनी शिक्षणाच्या कॉलमात निरंक म्हटले आहे. याचा अर्थ ते अशिक्षित आहेत.वैद्यकीय शाखेचे एकमेव उमेदवारएकूण डझनभर उमेदवारांमध्ये वैद्यकीय शाखेचे एकमेव उमेदवार आहेत. ते माजी खासदार तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.उल्हास पाटील आपले भवितव्य पुन्हा आजमावत आहेत. यानंतर विद्यमान खासदार रक्षा खडसे बी.एस्सी. (कॉम्प्यूटर) याही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीसमाजातील उच्चशिक्षित घटकांनी राजकारणात आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण चार उमेदवार अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. यातील एक उमेदवार दहावी पास, एक दहावी नापास, एक अशिक्षित आहे.शिक्षण पाहूनच मतदानभारताच्या सर्वाेच्च सभागृहात आपण आपला खासदार प्रतिनिधी म्हणून पाठवित असतो. त्याला किमान प्रश्न उपस्थित करता आले पाहिजे. यासाठी तो उच्च शिक्षित असावा. म्हणून उमेदवार निवडून देताना त्याचे शिक्षण बघून मी मतदान करतो. उमेदवाराच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य देतो.-अक्षय संजय पाटीलशिक्षित असावालोकसभा निवडणूक लढविणारा उच्चशिक्षित असावा ही अपेक्षा आहेच. कारण त्याच्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग तो मतदारसंघाच्या विकासासाठी करू शकतो. याचबरोबर उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा असावा व तो गुन्हेगारी पार्श्वभुमीचा नसावा. मतदारांच्या अडीअडचणींची जाण असणारा असावा.-डॉ.चंद्रशेखर पाटीलतरुणाईने विचार करावाउमेदवाराच्या शिक्षण पात्रतेसह त्याचे काम करण्याची क्षमता तपासूनच मतदान करणे जागरुक मतदाराचे कर्तव्य आहे. मात्र अलीकडे याबाबत दुर्लक्ष केले जाते. तरुणाईने याचा विचार करणे गरजेचे आहे. शिक्षणासह विकासाभिमुख दृष्टिकोन गरजेचा आहे, असे मला सूचवावेसे वाटते.-संजय सापधरे

टॅग्स :Jalgaonजळगाव