शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

अल्प प्रतिसादामुळे उद्यापासून सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुंबई ते नागपूरदरम्यान धावणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुंबई ते नागपूरदरम्यान धावणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने ही गाडी १९ मेपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे गुजरात येथे सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आलेल्या चार एक्स्प्रेस गाड्या १८ मेपासून पुन्हा त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने याचा परिणाम रेल्वेच्या प्रवासी संख्येवरही झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असलेल्या चार सुपरफास्ट गाड्या रद्द केल्यानंतर, आता पुन्हा विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली मुंबई- नागपूर (गाडी क्रमांक ०२१६९-७०) ही गाडीदेखील बुधवारपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला सध्या कोरोनामुळे व राज्यात लागू असलेल्या संचारबंदीमुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर बोटावर मोजण्या इतक्याच प्रवाशांकडून तिकीट बुकिंग करण्यात येत आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्नही मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही गाडी रेल्वे बोर्डाचे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इन्फो :

‘त्या’ चार गाड्या आजपासून पूर्ववत

‘तौउते’ या चक्रीवादळामुळे रेल्वे प्रशासनातर्फे जळगावमार्गे गुजरातकडे जाणाऱ्या चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये गाडी क्रमांक (०९२०६) हावडा पोरबंदर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०८४०१) पुरी ओखा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०९०९४) पोरबंदर एक्स्प्रेस व गाडी क्रमांक (०९२३८) राजकोट -रेवा एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश होता. हे वादळ थांबल्यामुळे या गाड्या मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

इन्फो :

डाऊनची ओखा एक्स्प्रेस बंद राहणार

या चक्रीवादळामुळे रेल्वे प्रशासनातर्फे अप मार्गावरच्या गाड्या सुरू करण्यात आल्यानंतर, डाऊन मार्गावरची गाडी क्रमांक (०८४०२) ही गाडी चक्रीवादळामुळे मात्र १९ मे रोजी बंद ठेवण्यात आली आहे. अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे.