शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अल्प प्रतिसादामुळे उद्यापासून सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुंबई ते नागपूरदरम्यान धावणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुंबई ते नागपूरदरम्यान धावणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने ही गाडी १९ मेपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे गुजरात येथे सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आलेल्या चार एक्स्प्रेस गाड्या १८ मेपासून पुन्हा त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने याचा परिणाम रेल्वेच्या प्रवासी संख्येवरही झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असलेल्या चार सुपरफास्ट गाड्या रद्द केल्यानंतर, आता पुन्हा विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली मुंबई- नागपूर (गाडी क्रमांक ०२१६९-७०) ही गाडीदेखील बुधवारपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला सध्या कोरोनामुळे व राज्यात लागू असलेल्या संचारबंदीमुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर बोटावर मोजण्या इतक्याच प्रवाशांकडून तिकीट बुकिंग करण्यात येत आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्नही मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही गाडी रेल्वे बोर्डाचे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इन्फो :

‘त्या’ चार गाड्या आजपासून पूर्ववत

‘तौउते’ या चक्रीवादळामुळे रेल्वे प्रशासनातर्फे जळगावमार्गे गुजरातकडे जाणाऱ्या चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये गाडी क्रमांक (०९२०६) हावडा पोरबंदर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०८४०१) पुरी ओखा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०९०९४) पोरबंदर एक्स्प्रेस व गाडी क्रमांक (०९२३८) राजकोट -रेवा एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश होता. हे वादळ थांबल्यामुळे या गाड्या मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

इन्फो :

डाऊनची ओखा एक्स्प्रेस बंद राहणार

या चक्रीवादळामुळे रेल्वे प्रशासनातर्फे अप मार्गावरच्या गाड्या सुरू करण्यात आल्यानंतर, डाऊन मार्गावरची गाडी क्रमांक (०८४०२) ही गाडी चक्रीवादळामुळे मात्र १९ मे रोजी बंद ठेवण्यात आली आहे. अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे.